शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
5
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
6
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
7
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
8
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
9
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
10
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
11
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
12
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
13
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
14
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
15
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
16
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
17
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
18
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
19
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
20
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू

पहिल्याच पावसात आठ बंधारे तुडुंब जलयुक्तशिवार योजना : नशिराबाद परिसरात जलपातळीत वाढ

By admin | Updated: June 30, 2016 18:54 IST

नशिराबाद : जलयुक्त शिवार योजना अंतर्गत नशिराबाद शिवारात सुमारे दीड कोटी रुपयांची आठ बंधार्‍यांची कामे पूर्णत्वास आली आहे. त्यात आणखी तीन बंधारे प्रस्तावित आहे. पहिल्याच पावसात सर्वच बंधारे तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील जलपातळी वाढून शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

नशिराबाद : जलयुक्त शिवार योजना अंतर्गत नशिराबाद शिवारात सुमारे दीड कोटी रुपयांची आठ बंधार्‍यांची कामे पूर्णत्वास आली आहे. त्यात आणखी तीन बंधारे प्रस्तावित आहे. पहिल्याच पावसात सर्वच बंधारे तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील जलपातळी वाढून शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार ए.टी.पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्या एकत्रित प्रयत्नातून नशिराबाद शिवारात सुमारे दीड कोटीची कामे पूर्णत्वास आली आहे. या प्रकल्पा अंतर्गत वाकीनदीवर वेगवेगळ्या ठिकाणी सहा तर हातेड नाल्यावर दोन ठिकाणी असे एकूण आठ साठवण बंधारे बांधण्यात आले आहे. हे सर्वच बंधारे पहिल्याच पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली आहे. पाण्याचा थेंब अन् थेंब जमिनीत जिरवावा व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. आणखी तीन बंधारे प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले.
याठिकाणी झाले बंधारे
जलयुक्त शिवार योजने अंतर्गत पी.टी.पाटील यांच्या मळ्याजवळ १६ लाख रुपयांचा, प्रसाद पाटील यांच्या शेताजवळ १६ लाख रुपयांचा, सुरेश गिरधर रोटे, सुरेश रामकृष्ण रोटे, मधुकर चौबे यांच्या शेताजवळ प्रत्येकी १४ लाख रुपयांचा, पांडुरंग पाटील, बाबुराव माधव पाटील यांच्या मळ्याजवळ प्रत्येकी १३ लाख तर बाबुराव येवले यांच्या शेताजवळ १६ लाख रुपयांचे बंधारे बांधण्यात आले आहे. त्यामुळे शेकडो शेतकर्‍यांना त्याचा लाभ होणार आहे.
शेतकर्‍यांना वरदान
जलयुक्त शिवार बंधार्‍यामुळे परिसरातील सुमारे दोनशे विहिरींच्या जलपातळी वाढण्यास मदत होणार आहे. सर्व बंधारे नशिराबाद परिसरातील शेतकर्‍यांसाठी वरदानच ठरले आहे.
दरम्यान नशिराबादच्या इतिहासात प्रथमच एकाचवेळी इतकी बंधारे बांधण्यात आली आहे. संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बंधारे फलदायी ठरणारे आहे.
आणखी सुमारे १ कोटीची कामे प्रस्तावित
नशिराबाद परिसरातील या प्रकल्पांतर्गत सुमारे १ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहे. सन १९८५ मध्ये बांधण्यात आलेला आतापर्यंत दुर्लक्षित झालेला उबंरझिरा ठिकाणच्या फुटलेल्या पाझर तलावाचे पुनरुर्जीवित करण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष लालचंद पाटील यांनी दिली.
बंधारा कामाच्या पूर्णत्वासाठी माजी खासदार वाय.जी.महाजन, भाजपचे शहराध्यक्ष लालचंद पाटील, माजी सभापती कमलाकर रोटे, राजेंद्र पाचपांडे, योगेश पाटील, विनोद पाटील, सचिन महाजन यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.