शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

पहिल्याच पावसात आठ बंधारे तुडुंब जलयुक्तशिवार योजना : नशिराबाद परिसरात जलपातळीत वाढ

By admin | Updated: June 30, 2016 18:54 IST

नशिराबाद : जलयुक्त शिवार योजना अंतर्गत नशिराबाद शिवारात सुमारे दीड कोटी रुपयांची आठ बंधार्‍यांची कामे पूर्णत्वास आली आहे. त्यात आणखी तीन बंधारे प्रस्तावित आहे. पहिल्याच पावसात सर्वच बंधारे तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील जलपातळी वाढून शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

नशिराबाद : जलयुक्त शिवार योजना अंतर्गत नशिराबाद शिवारात सुमारे दीड कोटी रुपयांची आठ बंधार्‍यांची कामे पूर्णत्वास आली आहे. त्यात आणखी तीन बंधारे प्रस्तावित आहे. पहिल्याच पावसात सर्वच बंधारे तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील जलपातळी वाढून शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार ए.टी.पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्या एकत्रित प्रयत्नातून नशिराबाद शिवारात सुमारे दीड कोटीची कामे पूर्णत्वास आली आहे. या प्रकल्पा अंतर्गत वाकीनदीवर वेगवेगळ्या ठिकाणी सहा तर हातेड नाल्यावर दोन ठिकाणी असे एकूण आठ साठवण बंधारे बांधण्यात आले आहे. हे सर्वच बंधारे पहिल्याच पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली आहे. पाण्याचा थेंब अन् थेंब जमिनीत जिरवावा व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. आणखी तीन बंधारे प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले.
याठिकाणी झाले बंधारे
जलयुक्त शिवार योजने अंतर्गत पी.टी.पाटील यांच्या मळ्याजवळ १६ लाख रुपयांचा, प्रसाद पाटील यांच्या शेताजवळ १६ लाख रुपयांचा, सुरेश गिरधर रोटे, सुरेश रामकृष्ण रोटे, मधुकर चौबे यांच्या शेताजवळ प्रत्येकी १४ लाख रुपयांचा, पांडुरंग पाटील, बाबुराव माधव पाटील यांच्या मळ्याजवळ प्रत्येकी १३ लाख तर बाबुराव येवले यांच्या शेताजवळ १६ लाख रुपयांचे बंधारे बांधण्यात आले आहे. त्यामुळे शेकडो शेतकर्‍यांना त्याचा लाभ होणार आहे.
शेतकर्‍यांना वरदान
जलयुक्त शिवार बंधार्‍यामुळे परिसरातील सुमारे दोनशे विहिरींच्या जलपातळी वाढण्यास मदत होणार आहे. सर्व बंधारे नशिराबाद परिसरातील शेतकर्‍यांसाठी वरदानच ठरले आहे.
दरम्यान नशिराबादच्या इतिहासात प्रथमच एकाचवेळी इतकी बंधारे बांधण्यात आली आहे. संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बंधारे फलदायी ठरणारे आहे.
आणखी सुमारे १ कोटीची कामे प्रस्तावित
नशिराबाद परिसरातील या प्रकल्पांतर्गत सुमारे १ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहे. सन १९८५ मध्ये बांधण्यात आलेला आतापर्यंत दुर्लक्षित झालेला उबंरझिरा ठिकाणच्या फुटलेल्या पाझर तलावाचे पुनरुर्जीवित करण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष लालचंद पाटील यांनी दिली.
बंधारा कामाच्या पूर्णत्वासाठी माजी खासदार वाय.जी.महाजन, भाजपचे शहराध्यक्ष लालचंद पाटील, माजी सभापती कमलाकर रोटे, राजेंद्र पाचपांडे, योगेश पाटील, विनोद पाटील, सचिन महाजन यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.