शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

'या' गावाने ७० वर्षात नोंदवली पहिली पोलिस तक्रार

By admin | Updated: May 9, 2016 12:33 IST

देशातील कुठल्याही गाव, तालुक्यामध्ये काही दिवस किंवा महिन्याच्या अंतराने पोलिस स्थानकात विविध प्रकरणांमध्ये तक्रारी दाखल होत असतात.

ऑनलाइन लोकमत

लातेहार, दि. ९ - देशातील कुठल्याही गाव, तालुक्यामध्ये काही दिवस किंवा महिन्याच्या अंतराने पोलिस स्थानकात विविध प्रकरणांमध्ये तक्रारी दाखल होत असतात. गुन्हेगारी मुक्त गाव किंवा तालुका फार दुर्मिळ असतो. झारखंडमधील लालगडही हे असेच गुन्हेगारीपासून कोसो दूर असलेले गाव. 
 
या गावातून १९४७ साली पोलिसात शेवटची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर एक मे रोजी रविवारी तब्बल ७० वर्षानंतर या गावातून पहिली पोलिस तक्रार दाखल झाली. या गावातील एका विवाहीत पुरुष दुस-या महिलेबरोबर पळून गेल्या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. झारखंडच्या लातेहार जिल्ह्यामध्ये हे गाव आहे. 
 
२०१४  मध्ये झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विरेंद्र सिंह यांनी गावाला भेट दिली त्यावेळी लालगडी गाव गुन्हेगारीमुक्त असल्याचे म्हटले होते. गावातील वाद पोलिसात नेण्याऐवजी चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याची या गावची शतकापासूनची परंपरा आहे. त्यामुळे इतक्या वर्षात या गावातून एकही पोलिस तक्रार दाखल झाली नव्हती. 
 
गावच्या प्रमुखासमोर जे वादविवाद येतात त्याचे तोच निवाडे करतो. परंपरेचा भाग सोडला तर, या गावातील लोक गावच्या परिषदेच्या माध्यमातून वाद सोडवण्याचे दुसरे कारण आहे गरीबी. न्यायालयाच्या कायदेशीर लढाईचा खर्च परवडत नसल्याने या गावातील लोक गावच्या परिषदेच्या माध्यमातून वाद सोडवण्याला प्राधान्य देतात.