शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

पहिली, दुसरीतील मुलांना गृहपाठ देऊ नका, ती वेटलिफ्टर नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 04:47 IST

सीबीएसई शाळांतील पहिल्या व दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येऊ नये, असा आदेश

चेन्नई : सीबीएसई शाळांतील पहिल्या व दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येऊ नये, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला दिला. ही लहान मुले म्हणजे वेटलिफ्टर नाहीत. त्यामुळे त्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात यावे, असा आदेश राज्य सरकारांना द्यावा अशा शब्दांत न्यायालयाने केंद्राला सुनावले आहे.एखाद्या मुलाच्या वजनाच्या १० टक्के इतकेच त्याच्या दप्तराचे वजन असायला हवे याबाबत राज्य सरकारांनी कटाक्ष ठेवावा व त्यावर केंद्राने बारीक लक्ष ठेवावे असे सांगून न्यायालयाने म्हटले आहे की, नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्चने (एनसीआरटी) तयार केलेली पुस्तकेच सीबीएससी शाळांत वापरणे बंधनकारक करायला हवे. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन किती असावे याबाबत तेलंगणा व महाराष्ट्र सरकारने आदेश जारी केले आहेत. त्याचा उल्लेख करुन मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. किरुबाकरन यांनी म्हटले आहे की, दप्तराच्या वजनासंदर्भातील धोरण ठरविण्याचा आदेश केंद्राने राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना द्यावा.एम. पुरुषोत्तम या वकिलाने केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेशदिला. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे सचिव व मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, दुसºया इयत्तेपर्यंतच्या मुलांना गृहपाठ देण्यात येऊ नये व तिसºया इयत्तेतील मुलांना आठवड्यातून दोन तासासाठी गृहपाठ देण्यात यावा असे धोरण आहे.पाच ते सहा वर्षे वयाच्या मुलांनाहवी असते अकरा तासांची झोपअंतरिम आदेश देताना न्यायालयाने म्हटले आहे की, वरच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या गृहपाठामुळे त्यांची आकलनशक्ती नक्कीच वाढते.परंतु अगदी लहान वयाचे विद्यार्थी अभ्यासावर नीट लक्ष केंद्रित करु शकत नाहीत, त्यांना इतरांनी दिलेल्या सूचनांचे पालन चटकन करता येत नाही तसेच सगळ््या गोष्टी नीट लक्षात राहतील अशीही त्यांची मानसिक जडणघडण झालेली नसते असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.पाच ते सहा वर्षे वयाच्या मुलांना दिवसभरातकिमान ११ तासाची झोप आवश्यक असते. जर ही मुले सकाळी लवकर शाळेत जात असतील तर त्यांनी रात्री लवकर झोपणे आवश्यक आहे. त्यामुळेच पहिल्या व दुसºया इयत्तेतील मुलांना गृहपाठ देण्यास एनसीआरटीने केलेली मनाई योग्यच आहे.