शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पहिली, दुसरीतील मुलांना गृहपाठ देऊ नका, ती वेटलिफ्टर नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 04:47 IST

सीबीएसई शाळांतील पहिल्या व दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येऊ नये, असा आदेश

चेन्नई : सीबीएसई शाळांतील पहिल्या व दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येऊ नये, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला दिला. ही लहान मुले म्हणजे वेटलिफ्टर नाहीत. त्यामुळे त्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात यावे, असा आदेश राज्य सरकारांना द्यावा अशा शब्दांत न्यायालयाने केंद्राला सुनावले आहे.एखाद्या मुलाच्या वजनाच्या १० टक्के इतकेच त्याच्या दप्तराचे वजन असायला हवे याबाबत राज्य सरकारांनी कटाक्ष ठेवावा व त्यावर केंद्राने बारीक लक्ष ठेवावे असे सांगून न्यायालयाने म्हटले आहे की, नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्चने (एनसीआरटी) तयार केलेली पुस्तकेच सीबीएससी शाळांत वापरणे बंधनकारक करायला हवे. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन किती असावे याबाबत तेलंगणा व महाराष्ट्र सरकारने आदेश जारी केले आहेत. त्याचा उल्लेख करुन मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. किरुबाकरन यांनी म्हटले आहे की, दप्तराच्या वजनासंदर्भातील धोरण ठरविण्याचा आदेश केंद्राने राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना द्यावा.एम. पुरुषोत्तम या वकिलाने केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेशदिला. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे सचिव व मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, दुसºया इयत्तेपर्यंतच्या मुलांना गृहपाठ देण्यात येऊ नये व तिसºया इयत्तेतील मुलांना आठवड्यातून दोन तासासाठी गृहपाठ देण्यात यावा असे धोरण आहे.पाच ते सहा वर्षे वयाच्या मुलांनाहवी असते अकरा तासांची झोपअंतरिम आदेश देताना न्यायालयाने म्हटले आहे की, वरच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या गृहपाठामुळे त्यांची आकलनशक्ती नक्कीच वाढते.परंतु अगदी लहान वयाचे विद्यार्थी अभ्यासावर नीट लक्ष केंद्रित करु शकत नाहीत, त्यांना इतरांनी दिलेल्या सूचनांचे पालन चटकन करता येत नाही तसेच सगळ््या गोष्टी नीट लक्षात राहतील अशीही त्यांची मानसिक जडणघडण झालेली नसते असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.पाच ते सहा वर्षे वयाच्या मुलांना दिवसभरातकिमान ११ तासाची झोप आवश्यक असते. जर ही मुले सकाळी लवकर शाळेत जात असतील तर त्यांनी रात्री लवकर झोपणे आवश्यक आहे. त्यामुळेच पहिल्या व दुसºया इयत्तेतील मुलांना गृहपाठ देण्यास एनसीआरटीने केलेली मनाई योग्यच आहे.