शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

पहिलाच विमान प्रवास...आणि खुद्द राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींची भेट

By admin | Updated: June 23, 2017 00:28 IST

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वेगवेगळ्या शाळेतील ३५ विद्यार्थ्यांसाठी २१ जूनची दुपार अविस्मरणीय ठरली. ते प्रथमच विमानाने प्रवास करून दिल्लीत पोहोचले होते

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वेगवेगळ्या शाळेतील ३५ विद्यार्थ्यांसाठी २१ जूनची दुपार अविस्मरणीय ठरली. ते प्रथमच विमानाने प्रवास करून दिल्लीत पोहोचले होते आणि त्यांच्या समोर होते दस्तुरखुद्द राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. ‘राष्ट्रपती भवन’मध्ये मुखर्जी यांना भेटल्यानंतर या विद्यार्थ्यांनी संवाद साधला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याशी. नामवंतांसाठी स्वप्नवत असते अशी ही संधी या ३५ विद्यार्थ्यांना मिळाली ती ‘लोकमत संस्कारांचे मोती’ या उपक्रमामुळे. ‘लोकमत संस्कारांचे मोती’ या उपक्रमाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी या दोघांनी मनापासून कौतुक केले.‘लोकमत संस्कारांचे मोती २०१६’ स्पर्धेत महाराष्ट्रभरातील शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक याप्रमाणे ३५ विजेत्या विद्यार्थ्यांनी बुधवारी २१ जून रोजी नागपूर-दिल्ली-नागपूर व मुंबई-दिल्ली-मुंबई असा विमान प्रवास केला. विद्यार्थ्यांनी बुधवारी दुपारी दीड वाजता राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी या सर्व मुलांचे अभिनंदन केले व दै. ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. मुखर्जी यांची भेट व दिमाखदार ‘राष्ट्रपती भवन’ पाहून हे विद्यार्थी हरखून गेले होते. त्यानंतर उपराष्ट्रपती अन्सारी यांचीही भेट घेतली. या वेळी उपराष्ट्रपतींनी ‘आमचे मित्र विजयबाबू दर्डा येणार होते, ते का आले नाहीत?’ असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला. त्यानंतर त्यांनी सर्व मुलांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली. उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना भविष्यात करिअरचा कोणता मार्ग निवडणार? इंजिनीअर, डॉक्टर, पायलट, समाजसेवक यापैकी तुम्हाला काय व्हायला आवडेल असे विचारले. त्याचबरोबर तुम्हाला सैन्यात जायला आवडेल का? असे त्यांनी विचारले असता आम्हाला सैन्यात भरती व्हायला आवडेल, असे उत्तर बहुतांश विद्यार्थ्यांनी दिले. हे उत्तर ऐकून उपराष्ट्रपतींनी त्यांचे अभिनंदन केले. तुमच्यापैकी किती जणांचा हा पहिलाच विमान प्रवास होता असा प्रश्न अन्सारी यांनी विचारल्यावर सर्व ३५ मुलांनी हात वर केले. त्याचबरोबर पहिल्याच विमान प्रवासाचे मुलांनी उत्स्फूर्तपणे अनुभव कथन केले. अन्सारी यांनी या वेळी महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीचेही कौतुक केले. उपराष्ट्रपतींनी ‘संस्कारांचे मोती’ या उपक्रमाबद्दल माहिती विचारली. तेव्हा ‘लोकमत’चे उपाध्यक्ष वसंत आवारे यांनी या उपक्रमाची संकल्पना विशद केली. ती ऐकून अन्सारी यांनी ‘लोकमत’ व विजय दर्डा यांचे अभिनंदन केले. उपराष्ट्रपतींनी प्रत्येक विद्यार्थ्याला टी-शर्ट, पेन, टोपी या भेटवस्तू दिल्या. ‘लोकमत’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नाश्ता, जेवण तसेच दिल्ली सैरसाठी व्होल्वो बसची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी रेल्वे म्युझियम, गांधी स्मृती भवन, इंदिरा गांधी स्मृती भवन, इंडिया गेट आदी ठिकाणांना भेट दिली.मुंबई आणि नागपूर विमानतळावर विद्यार्थी परतल्यानंतर अनेक पालक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आले होते. सर्व पालकांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक करून ‘लोकमत’चे आभार मानले.