शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पहिलाच विमान प्रवास...आणि खुद्द राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींची भेट

By admin | Updated: June 23, 2017 00:28 IST

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वेगवेगळ्या शाळेतील ३५ विद्यार्थ्यांसाठी २१ जूनची दुपार अविस्मरणीय ठरली. ते प्रथमच विमानाने प्रवास करून दिल्लीत पोहोचले होते

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वेगवेगळ्या शाळेतील ३५ विद्यार्थ्यांसाठी २१ जूनची दुपार अविस्मरणीय ठरली. ते प्रथमच विमानाने प्रवास करून दिल्लीत पोहोचले होते आणि त्यांच्या समोर होते दस्तुरखुद्द राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. ‘राष्ट्रपती भवन’मध्ये मुखर्जी यांना भेटल्यानंतर या विद्यार्थ्यांनी संवाद साधला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याशी. नामवंतांसाठी स्वप्नवत असते अशी ही संधी या ३५ विद्यार्थ्यांना मिळाली ती ‘लोकमत संस्कारांचे मोती’ या उपक्रमामुळे. ‘लोकमत संस्कारांचे मोती’ या उपक्रमाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी या दोघांनी मनापासून कौतुक केले.‘लोकमत संस्कारांचे मोती २०१६’ स्पर्धेत महाराष्ट्रभरातील शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक याप्रमाणे ३५ विजेत्या विद्यार्थ्यांनी बुधवारी २१ जून रोजी नागपूर-दिल्ली-नागपूर व मुंबई-दिल्ली-मुंबई असा विमान प्रवास केला. विद्यार्थ्यांनी बुधवारी दुपारी दीड वाजता राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी या सर्व मुलांचे अभिनंदन केले व दै. ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. मुखर्जी यांची भेट व दिमाखदार ‘राष्ट्रपती भवन’ पाहून हे विद्यार्थी हरखून गेले होते. त्यानंतर उपराष्ट्रपती अन्सारी यांचीही भेट घेतली. या वेळी उपराष्ट्रपतींनी ‘आमचे मित्र विजयबाबू दर्डा येणार होते, ते का आले नाहीत?’ असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला. त्यानंतर त्यांनी सर्व मुलांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली. उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना भविष्यात करिअरचा कोणता मार्ग निवडणार? इंजिनीअर, डॉक्टर, पायलट, समाजसेवक यापैकी तुम्हाला काय व्हायला आवडेल असे विचारले. त्याचबरोबर तुम्हाला सैन्यात जायला आवडेल का? असे त्यांनी विचारले असता आम्हाला सैन्यात भरती व्हायला आवडेल, असे उत्तर बहुतांश विद्यार्थ्यांनी दिले. हे उत्तर ऐकून उपराष्ट्रपतींनी त्यांचे अभिनंदन केले. तुमच्यापैकी किती जणांचा हा पहिलाच विमान प्रवास होता असा प्रश्न अन्सारी यांनी विचारल्यावर सर्व ३५ मुलांनी हात वर केले. त्याचबरोबर पहिल्याच विमान प्रवासाचे मुलांनी उत्स्फूर्तपणे अनुभव कथन केले. अन्सारी यांनी या वेळी महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीचेही कौतुक केले. उपराष्ट्रपतींनी ‘संस्कारांचे मोती’ या उपक्रमाबद्दल माहिती विचारली. तेव्हा ‘लोकमत’चे उपाध्यक्ष वसंत आवारे यांनी या उपक्रमाची संकल्पना विशद केली. ती ऐकून अन्सारी यांनी ‘लोकमत’ व विजय दर्डा यांचे अभिनंदन केले. उपराष्ट्रपतींनी प्रत्येक विद्यार्थ्याला टी-शर्ट, पेन, टोपी या भेटवस्तू दिल्या. ‘लोकमत’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नाश्ता, जेवण तसेच दिल्ली सैरसाठी व्होल्वो बसची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी रेल्वे म्युझियम, गांधी स्मृती भवन, इंदिरा गांधी स्मृती भवन, इंडिया गेट आदी ठिकाणांना भेट दिली.मुंबई आणि नागपूर विमानतळावर विद्यार्थी परतल्यानंतर अनेक पालक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आले होते. सर्व पालकांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक करून ‘लोकमत’चे आभार मानले.