शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पहिलाच विमान प्रवास...आणि खुद्द राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींची भेट

By admin | Updated: June 23, 2017 00:28 IST

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वेगवेगळ्या शाळेतील ३५ विद्यार्थ्यांसाठी २१ जूनची दुपार अविस्मरणीय ठरली. ते प्रथमच विमानाने प्रवास करून दिल्लीत पोहोचले होते

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वेगवेगळ्या शाळेतील ३५ विद्यार्थ्यांसाठी २१ जूनची दुपार अविस्मरणीय ठरली. ते प्रथमच विमानाने प्रवास करून दिल्लीत पोहोचले होते आणि त्यांच्या समोर होते दस्तुरखुद्द राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. ‘राष्ट्रपती भवन’मध्ये मुखर्जी यांना भेटल्यानंतर या विद्यार्थ्यांनी संवाद साधला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याशी. नामवंतांसाठी स्वप्नवत असते अशी ही संधी या ३५ विद्यार्थ्यांना मिळाली ती ‘लोकमत संस्कारांचे मोती’ या उपक्रमामुळे. ‘लोकमत संस्कारांचे मोती’ या उपक्रमाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी या दोघांनी मनापासून कौतुक केले.‘लोकमत संस्कारांचे मोती २०१६’ स्पर्धेत महाराष्ट्रभरातील शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक याप्रमाणे ३५ विजेत्या विद्यार्थ्यांनी बुधवारी २१ जून रोजी नागपूर-दिल्ली-नागपूर व मुंबई-दिल्ली-मुंबई असा विमान प्रवास केला. विद्यार्थ्यांनी बुधवारी दुपारी दीड वाजता राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी या सर्व मुलांचे अभिनंदन केले व दै. ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. मुखर्जी यांची भेट व दिमाखदार ‘राष्ट्रपती भवन’ पाहून हे विद्यार्थी हरखून गेले होते. त्यानंतर उपराष्ट्रपती अन्सारी यांचीही भेट घेतली. या वेळी उपराष्ट्रपतींनी ‘आमचे मित्र विजयबाबू दर्डा येणार होते, ते का आले नाहीत?’ असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला. त्यानंतर त्यांनी सर्व मुलांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली. उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना भविष्यात करिअरचा कोणता मार्ग निवडणार? इंजिनीअर, डॉक्टर, पायलट, समाजसेवक यापैकी तुम्हाला काय व्हायला आवडेल असे विचारले. त्याचबरोबर तुम्हाला सैन्यात जायला आवडेल का? असे त्यांनी विचारले असता आम्हाला सैन्यात भरती व्हायला आवडेल, असे उत्तर बहुतांश विद्यार्थ्यांनी दिले. हे उत्तर ऐकून उपराष्ट्रपतींनी त्यांचे अभिनंदन केले. तुमच्यापैकी किती जणांचा हा पहिलाच विमान प्रवास होता असा प्रश्न अन्सारी यांनी विचारल्यावर सर्व ३५ मुलांनी हात वर केले. त्याचबरोबर पहिल्याच विमान प्रवासाचे मुलांनी उत्स्फूर्तपणे अनुभव कथन केले. अन्सारी यांनी या वेळी महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीचेही कौतुक केले. उपराष्ट्रपतींनी ‘संस्कारांचे मोती’ या उपक्रमाबद्दल माहिती विचारली. तेव्हा ‘लोकमत’चे उपाध्यक्ष वसंत आवारे यांनी या उपक्रमाची संकल्पना विशद केली. ती ऐकून अन्सारी यांनी ‘लोकमत’ व विजय दर्डा यांचे अभिनंदन केले. उपराष्ट्रपतींनी प्रत्येक विद्यार्थ्याला टी-शर्ट, पेन, टोपी या भेटवस्तू दिल्या. ‘लोकमत’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नाश्ता, जेवण तसेच दिल्ली सैरसाठी व्होल्वो बसची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी रेल्वे म्युझियम, गांधी स्मृती भवन, इंदिरा गांधी स्मृती भवन, इंडिया गेट आदी ठिकाणांना भेट दिली.मुंबई आणि नागपूर विमानतळावर विद्यार्थी परतल्यानंतर अनेक पालक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आले होते. सर्व पालकांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक करून ‘लोकमत’चे आभार मानले.