शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाक करताना गॅसची नळी निघाल्याने घरात आग कंजरवाड्यातील घटना : भाट कुटूंब बालंबाल बचावले, तीन लाखाच्यावर नुकसान

By admin | Updated: October 8, 2016 23:51 IST

जळगाव: घरात स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडर गॅसची नळी निघाल्याने आगीचा भडका उडाला. काही क्षणातच संपूर्ण घरात आग लागली. सिलिंडर स्फोट होण्याआधीच घरातील मंडळी बाहेर पडाल्याने ते बालंबाल बचावले. जुनी जोशी कॉलनीला लागून असलेल्या कंजरवाड्यात शनिवारी संध्याकाळी धीरज रमेश भाट यांच्या घरात ही घटना घडली. या घटनेत दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, ७० हजार रुपये रोख व घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य खाक झाले आहे. तीन लाखाच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जळगाव: घरात स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडर गॅसची नळी निघाल्याने आगीचा भडका उडाला. काही क्षणातच संपूर्ण घरात आग लागली. सिलिंडर स्फोट होण्याआधीच घरातील मंडळी बाहेर पडाल्याने ते बालंबाल बचावले. जुनी जोशी कॉलनीला लागून असलेल्या कंजरवाड्यात शनिवारी संध्याकाळी धीरज रमेश भाट यांच्या घरात ही घटना घडली. या घटनेत दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, ७० हजार रुपये रोख व घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य खाक झाले आहे. तीन लाखाच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कंजरवाड्यात अतिशय दाट वस्तीत धीरज भाट हे वरच्या मजल्यावर राहतात. अडीच ते तीनशे चौरस फुटाच्या खोलीत लाकडी दरवाजाच्या बाजूलाच गॅस सिलिंडर, बेड, अंथरुण, कपडे व अन्य साहित्य आहे. पत्नी रंजना भाट या पालक पनीरची भाजी बनवत असताना पती धीरज, मुलगी भूमी, शिरी व मुलगा तनीश हे शेजारी बेडवर बसून टिव्ही पाहत होते. अचानकपणे शेगडीतून नळी निघाल्याने गॅस बाहेर निघाला व आगीचा भडका उडाला. हा प्रकार पाहताच भाट यांनी तातडीने पत्नी व मुलांना सोबत घेत घराबाहेर धाव घेतली.
अन् मोठा अनर्थ टळला
भाट परिवार जोराने आरडाओरड करत असल्याचे पाहून गल्लीतील नागरिकांनी त्यांच्या घरी धाव घेतली. आगीचे लोळ व धूर पाहता घरात आग लागल्याचे आगीची बातमी वार्‍यासारखी पसरुन पळापळ झाली. जग्गू भाट याने पेटती नळी तोडून सिलिंडर घराच्या बाहेर काढले तर समीर तडवी व प्रदीप नेतलेकर यांनी शेजारचा दरवाजा तोडून रस्ता मोकळा केला. विशाल जोशी या तरुणाने अग्निशमन दल, पोलीस नियंत्रण कक्ष व एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. शेजारच्यांच्या घरातून पाणी आणून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.
अग्निशमनचा बंब आला, मात्र उपयोग नाही
घटनेची माहिती दिल्यानंतरही अग्निशमन दलाचा बंब उशिरा पोहचल्याचा आरोप नागरिकांनी केला. उशिरा येऊन बारीक गल्ल्यांमुळे घटनास्थळावर बंब पोहचू शकला नाही. त्यामुळे त्याचा उपयोगच झाला नाही. पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, सहायक निरीक्षक सचिन बागुल, समाधान पाटील यांनी घटनास्थळ गाठून आगीचे कारण जाणून घेत घटनास्थळाचा पंचनामा केला.