शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

अग्निशामक दलाची दुरावस्था: एमआयडीसी केंद्रावरील बंब धक्का स्टार्ट; लोकसंख्या पाच लाख फायरफायटर चार आग लागली..पळा..पळा.. अन् पाणी शोधा

By admin | Updated: March 15, 2016 00:32 IST

जळगाव : आग लागली की पाण्यासाठी धावपळ करा अशी शहरातील अग्निशामक दलाची स्थिती असून चार पैकी केवळ एका केंद्रावर बंबात पाणी भरण्याची सुविधा असून एवढ्या गंभीर बाबीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे लक्षात येते.

जळगाव : आग लागली की पाण्यासाठी धावपळ करा अशी शहरातील अग्निशामक दलाची स्थिती असून चार पैकी केवळ एका केंद्रावर बंबात पाणी भरण्याची सुविधा असून एवढ्या गंभीर बाबीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे लक्षात येते.
शहराची लोकसंख्या जवळपास पाच लाख आहे. शहरालगत १२०० लहान मोठे उद्योग असलेली औद्योगिक वसाहत आहे. तेथे हजारो कामगार काम करत असतात. मोठा व्याप शहर परिसरात असताना अग्निशमन यंत्रणेबाबत उदासिनताच दिसून येत आहे.
असा आहे नियम
शहरातील लोकसंख्यनुसार अग्निशामक दलाची निर्मिती असणे गरजेचे आहे. ५० हजार लोकसंख्येमागे एक फायर फायटर असावा असा शासकीय नियम आहे. मात्र हा नियम जळगावसाठी लागू नसल्याचीच परिस्थिती दिसून येते. पाच लाख लोकसंख्येची मदार केवळ चार फायर फायटरवर असल्याचे लक्षात येते. तेदेखील काय सुस्थितीत आहेत अशी परिस्थिती नाही.
पाण्यासाठी वणवण
शहरात अग्निशामक दलाचे मुख्यालय गोलाणी मार्केटमध्ये आहे. तेथील परिस्थिती फार समाधानकार आहे असे नाही. दुसरे शिवाजीनगरमध्ये, तिसरे एमआयडीसी व चौथे महाबळ रोडला काव्यरत्नावली चौकात आहे. पैकी केवळ शिवाजी नगर अग्निशामक दलाच्या केंद्रावर पाणी भरण्याची व्यवस्था आहे. अन्य तीन ठिकाणी अशी व्यवस्था नाही आणि जेथे होती तीदेखील बंद झाली आहे. गोलाणी केंद्र, एमआयडीसी, महाबळ येथे पाणी भरण्याची व्यवस्था नाही. पाणी भरण्याचे पंपही भक्कम नाहीत त्यामुळे बंब भरण्यास वेळ लागतो.
क्रॉसबारचा अडथळा
शिवाजीनगरच्या अग्निशामक केंद्रावर पाणी भरण्यास जायचे असल्यास पुलाच्या क्रॉसबारचा अडथळा झाला आहे. त्यामुळे गुजराल पेट्रोपंपाकडून म्हणजे जवळपास चार किलो मिटरचा फेरा मारून या केंद्रावर पाणी भरण्यास जावे लागत असते. पाणी भरण्याचे दुसरे केंद्र मेहरूणकडील शिवाजी उद्यानात आहे. तेथेही बंबात गतीने पाणी भरले जात नाही.
कर्मचारीही कमीच
नियमानुसार एका बंबावर सहा कर्मचारी असणे बंधनकारक आहे. अशी परिस्थिती मात्र एकाही केंद्रावर दिसत नाही. या विभागातील ७० कर्मचार्‍यांना पुरेसे प्रशिक्षण नाही. तसेच आगीची एखादी गंभीर घटना घडल्यास पुरेसे संरक्षणाचे कपडेही त्यांच्याकडे नाहीत. त्यासाठीचे प्रस्तावही प्रलंबित असल्याचे समजले.
-----