शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामक दलाची दुरावस्था: एमआयडीसी केंद्रावरील बंब धक्का स्टार्ट; लोकसंख्या पाच लाख फायरफायटर चार आग लागली..पळा..पळा.. अन् पाणी शोधा

By admin | Updated: March 15, 2016 00:32 IST

जळगाव : आग लागली की पाण्यासाठी धावपळ करा अशी शहरातील अग्निशामक दलाची स्थिती असून चार पैकी केवळ एका केंद्रावर बंबात पाणी भरण्याची सुविधा असून एवढ्या गंभीर बाबीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे लक्षात येते.

जळगाव : आग लागली की पाण्यासाठी धावपळ करा अशी शहरातील अग्निशामक दलाची स्थिती असून चार पैकी केवळ एका केंद्रावर बंबात पाणी भरण्याची सुविधा असून एवढ्या गंभीर बाबीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे लक्षात येते.
शहराची लोकसंख्या जवळपास पाच लाख आहे. शहरालगत १२०० लहान मोठे उद्योग असलेली औद्योगिक वसाहत आहे. तेथे हजारो कामगार काम करत असतात. मोठा व्याप शहर परिसरात असताना अग्निशमन यंत्रणेबाबत उदासिनताच दिसून येत आहे.
असा आहे नियम
शहरातील लोकसंख्यनुसार अग्निशामक दलाची निर्मिती असणे गरजेचे आहे. ५० हजार लोकसंख्येमागे एक फायर फायटर असावा असा शासकीय नियम आहे. मात्र हा नियम जळगावसाठी लागू नसल्याचीच परिस्थिती दिसून येते. पाच लाख लोकसंख्येची मदार केवळ चार फायर फायटरवर असल्याचे लक्षात येते. तेदेखील काय सुस्थितीत आहेत अशी परिस्थिती नाही.
पाण्यासाठी वणवण
शहरात अग्निशामक दलाचे मुख्यालय गोलाणी मार्केटमध्ये आहे. तेथील परिस्थिती फार समाधानकार आहे असे नाही. दुसरे शिवाजीनगरमध्ये, तिसरे एमआयडीसी व चौथे महाबळ रोडला काव्यरत्नावली चौकात आहे. पैकी केवळ शिवाजी नगर अग्निशामक दलाच्या केंद्रावर पाणी भरण्याची व्यवस्था आहे. अन्य तीन ठिकाणी अशी व्यवस्था नाही आणि जेथे होती तीदेखील बंद झाली आहे. गोलाणी केंद्र, एमआयडीसी, महाबळ येथे पाणी भरण्याची व्यवस्था नाही. पाणी भरण्याचे पंपही भक्कम नाहीत त्यामुळे बंब भरण्यास वेळ लागतो.
क्रॉसबारचा अडथळा
शिवाजीनगरच्या अग्निशामक केंद्रावर पाणी भरण्यास जायचे असल्यास पुलाच्या क्रॉसबारचा अडथळा झाला आहे. त्यामुळे गुजराल पेट्रोपंपाकडून म्हणजे जवळपास चार किलो मिटरचा फेरा मारून या केंद्रावर पाणी भरण्यास जावे लागत असते. पाणी भरण्याचे दुसरे केंद्र मेहरूणकडील शिवाजी उद्यानात आहे. तेथेही बंबात गतीने पाणी भरले जात नाही.
कर्मचारीही कमीच
नियमानुसार एका बंबावर सहा कर्मचारी असणे बंधनकारक आहे. अशी परिस्थिती मात्र एकाही केंद्रावर दिसत नाही. या विभागातील ७० कर्मचार्‍यांना पुरेसे प्रशिक्षण नाही. तसेच आगीची एखादी गंभीर घटना घडल्यास पुरेसे संरक्षणाचे कपडेही त्यांच्याकडे नाहीत. त्यासाठीचे प्रस्तावही प्रलंबित असल्याचे समजले.
-----