शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

पत्नीचे आर्थिक स्वावलंबन हिंदू धर्मशास्त्रात न बसणारे - हायकोर्ट

By admin | Updated: July 15, 2016 02:41 IST

पत्नीने नोकरी-धंदा करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे आणि तिने पतीवर अवलंबून न राहता स्वत:चा चरितार्थ चालवावा, अशी अपेक्षा हिंदू पतीने बाळगणे हे हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानात न बसणारे आहे

मदुराई : पत्नीने नोकरी-धंदा करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे आणि तिने पतीवर अवलंबून न राहता स्वत:चा चरितार्थ चालवावा, अशी अपेक्षा हिंदू पतीने बाळगणे हे हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानात न बसणारे आहे, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचे न्यायाधीश न्या. पी. देवदास यांनी एका पोस्टमनने केलेली पुनरिक्षण याचिका फेटाळताना हे मत नोंदविले. या पोस्टमनने त्याच्या घटस्फोटित पत्नीस व दोन वर्षांच्या मुलीस दरमहा पाच हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश येथील कुटुंब न्यायालयाने दिला होता. त्याविरुद्ध या पोस्टमनने ही पुनरिक्षण याचिका केली होती.कुटुंब न्यायालयाच्या निकालास आव्हान देताना या पोस्टमनने इतर मुद्द्यांखेरीज एक असा मुद्दा मांडला होता की, त्याची पत्नी एका दुकानात नोकरी करते व स्वत:चा चरितार्थ चालविण्यासाठी तिची कमाई पुरेशी आहे. न्या. देवदास यांनी वरीलप्रमाणे मत नोंदवित हा मुद्दा फेटाळताना म्हटले की, एकतर पत्नी नोकरी करते याचे अर्जदाराने पुरावे दिलेले नाहीत. अर्जदार हिंदू असल्याने पत्नीने नोकरी करणे अथवा न करणे गैरलागू आहे, कारण हिंदू व्यक्तिगत कायद्यानुसार पत्नीच्या चरितार्थाची जबाबदारी पतीवरच असते. पत्नीने नोकरी-धंदा करून चरितार्थ स्वत: चालवावा, असे हिंदू पती म्हणू शकत नाही.तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध : न्या. देवदास म्हणतात की, तू कामधंदा करून स्वत:पुरते कमावणार असशील तरच लग्न करीन, अशी अट लग्नाआधी पत्नीला घालून तिच्याशी विवाह करण्याची सोय हिंदू कायद्यात कुठेही नाही. पतीने असा विचार करून लग्न करणे किंवा लग्नानंतर पत्नीकडून अशी अपेक्षा करणे हे हिंदू धर्मशास्त्राच्या तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध आहे.किमान गरजांना कात्री नको : माझा पगार तुटपुंजा आहे; शिवाय घरात म्हातारी आई, विधवा बहीण व तिची मुलेही आहेत व त्यांचा खर्चही माझ्यावरच आहे. त्यामुळे पत्नी व मुलीला दरमहा पाच हजार रुपये उचलून देणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे, असेही या पोस्टमनचे म्हणणे होते. यावर न्यायालयाने म्हटले की, मदुराईसारख्या शहरात दोन माणसांच्या महिन्याच्या खर्चासाठी पाच हजार रुपये ही रक्कम अव्वाच्या सव्वा नाही; शिवाय घरातील इतर लोकांचीही जबाबदारी आहे असे म्हणून पत्नी व मुलीच्या किमान गरजांना कात्री लावता येणार नाही.