शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर खर्चात हयगय नाही : सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 02:11 IST

महामारी कधी संपणार माहिती नाही; खात्रीशीर लसही नाही

नवी दिल्ली : कोविड-१९ महामारी कधी संपेल याबाबत काहीच सांगता येत नाही, या आजारावर खात्रीशीर लसही नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. खर्चातही कोणतीच हयगय केली जाणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.सीतारामन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मागील सहा महिन्यांत आव्हाने अजिबात कमी झालेली नाहीत. आव्हानांचे स्वरूप मात्र बदलले आहे. वित्त मंत्रालयाने प्रतिसादात्मक कृतीची गती वाढविली आहे.सीतारामन यांनी म्हटले की, प्रतिदशलक्ष रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण यात अनेक कारणांनी घट झाली आहे. लोकांतील जागरूकता आणि खबरदारी हे त्यातील एक कारण आहे; पण चिंता अजूनही कायम आहे. आपल्याकडे अजूनही खात्रीशीर लस उपलब्ध नाही.साथ कधी संपेल याची कोणतीही तारीख सांगता येत नाही. काही ठिकाणाहून बातम्या येत आहेत की, बरे झालेल्या लोकांनाही पुन्हा लागण होत आहे.त्यामुळे सर्व छोट्या व मध्यम व्यावसायिक - उद्यमींच्या मनात अनिश्चितता घोंगावत आहे. त्यांचा जीडीपीतील वाटा ५५ टक्के आहे.उत्पादन क्षेत्राला गती देण्यासाठी प्रयत्न सुरूसरकारकडून केल्या जात असलेल्या खर्चाबाबत सरकारमधील एक गट असंतुष्ट दिसत असल्याचे निदर्शनास आणून दिले असता सीतारामन यांनी सांगितले की, नाही असे काहीही नाही. सरकारकडून प्रोत्साहन जारी केले जात आहे. खर्चातही कोणतीच हयगय केली जात नाही. सरकारी प्रयत्नांचे परिणामही काही प्रमाणात दिसून येत आहेत. वस्तू उत्पादन क्षेत्र पुन्हा झेप घेताना दिसून येत आहे. गावी गेलेले कामगार कार्यस्थळी परतत आहेत. याला आणखी गती देण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन