शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

अर्थमंत्री अरुण जेटलींनी केले रेल्वे भाडेवाढीचे समर्थन

By admin | Updated: June 21, 2014 17:12 IST

रेल्वे प्रवाशांना भाडेवाढीचा शॉक दिल्याने चारही बाजूंनी मोदी सरकारवर टीका होत असतानाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे भाडेवाढीचे समर्थन केले आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २१-  रेल्वे प्रवाशांना भाडेवाढीचा शॉक दिल्याने चारही बाजूंनी मोदी सरकारवर टीका होत असतानाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे भाडेवाढीचे समर्थन केले आहे. रेल्वेमंत्र्यांनी भाडेवाढीसारखा कठोर पण अत्यंत आवश्यक असलेला निर्णय घेतल्याचे अरुण जेटलींनी म्हटले आहे. 

रेल्वेची वाढती वित्तीय तूट भरुन काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी रेल्वेच्या प्रवासी भाड्यात तब्बल १४. २ टक्के तर मालवाहतूक भाड्यात ६.५ टक्क्यांनी वाढ केली होती. या भाडेवाढीवरुन देशभरातून संताप व्यक्त होत असून केंद्र सरकारविरोधात विविध राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरुन निदर्शनेही केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र या भाडेवाढीचे समर्थन केले आहे. फेसबुकवर अरुण जेटलींनी भाडेवाढीविषयी त्यांचे मत व्यक्त केले आहे. 'गेली काही वर्ष रेल्वे तोट्यात धावत होती. आता हे नुकसान भरुन काढणे गरजेचे असून प्रवाशांनी त्यांना मिळणा-या सुविधेनुसार पैसे मोजणे गरजेचे आहे. रेल्वेमंत्र्यांनी घेतलेला भाडेवाढीचा निर्णय योग्यच आहे' अशा शब्दात त्यांनी भाडेवाढीचे समर्थन केले. यूपीए सरकारच्या कारकिर्दीतच हा निर्णय घेण्यात आला होता. आम्ही फक्त त्याची अंमलबजावणी केली आहे. आता प्रवाशांनीच ठरवावे की त्यांना रेल्वेत जागतिकदर्जाचा सुविधा हव्यात की नको असेही जेटलींनी म्हटले आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील या भाडेवाढीची समर्थन केले आहे.
दरम्यान, या भाडेवाढीविरोधात देशभरात संताप व्यक्त होत आहे. समाजवादी पक्षाने लखनौत तर काँग्रेसने दिल्लीत या भाडेवाढीविरोधात निदर्शने केली. काही ठिकाणी मोदी सरकारच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. मुंबई, ठाणे, घाटकोपर येथे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांनी रेल्वेवाढीविरोधात धरणेआंदोलन केले. मुंबईतील लोकल सेवेचे मासिक पास दुप्पटीने वाढणार आहे. मुंबईतील डबेवाल्यांनी व प्रवासी संघटनेनेही याला विरोध दर्शवला आहे. रेल्वे व डबेवाले यांचे अतूट नाते आहे. मासिक पास वाढल्याने याचा फटका डबेवाल्यांसह प्रवाशांनाही बसेल. ऐरवी वारंवार ट्रॅक आणि रस्त्यावर उतरणारे भाजप खासदार किरीट सोमेय्या आता मुंबईकरांसाठी आवाज का उठवत नाही असा सवाल डबेवाल्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईसह देशभरातील प्रवासी संघटनांनी याचा कडाडून विरोध केला आहे.