शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

अखेर भोर नगरपालिकेची विशेष सभा झाली

By admin | Updated: May 22, 2015 00:25 IST

नगराध्यक्षा मात्र गैरहजर; सुमारे ४ कोटी २८ लाखांच्या विकासकामांना मंजुरी

नगराध्यक्षा मात्र गैरहजर; सुमारे ४ कोटी २८ लाखांच्या विकासकामांना मंजुरी
भोर : भोर नगरपालिकेतील राजकीय वादामुळे शहरातील विकासकामांची कोंडी झाली आहे. सभाच होत नसल्याने कामांना मंजुरी मिळत नव्हती. अखेर जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या विशेष परवानगीने आज विशेष सभा झाली. त्यात विविध कामांसाठी सुमारे ४ कोटी २८ लाख रुपयांच्या विकासकामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली, मात्र, नगराध्यक्षा दीपाली शेटे मात्र या सभेलाही गैरहजर राहिल्या.
१५ दिवसांत सभेचे आयोजन केले नाही. त्यामुळे काँॅग्रेस नगरसेवकांनी वेळोवेळी मागणी करूनही नगराध्यक्षा दीपाली शेटे यांनी सभेचे आयोजन केले नाही. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन सभेचे आयोजन करण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी २० मे रोजी सभेचे आयोजन करून सभेचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांची निवड करण्यात आली होती.
आज दुपारी एक वाजता नगरपालिकेच्या शिवाजी सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. या वेळी काँग्रेसचे सर्व नगरसेवक तर राष्ट्रवादीचे ३ जण हजर होते.
या सभेमुळे भविष्यात शहरातील वीज, पाणी, कचरा हे प्रश्न मार्गी लागणार आहेत. शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सभेलाच नगराध्यक्षा गैरहजर राहिल्या असा आरोप पत्रकार परिषदेत काँग्रेस नगरसेवकांनी केला. या वेळी उपनगराध्यक्ष तानाजी तारु,नगरसेवक चंद्रकांत सागळे, उमेश देशमुख, ॲड. जयश्री शिंदे, डॉ. विजयालक्ष्मी पाठक, गजानन दानवले, तृप्ती किरवे, देविदास गायकवाड उपस्थित होते.
चौकट...........
आजच्या सभेत वैशिष्ट्यपूर्ण योजनेांर्गत मंजूर झालेल्या १ कोटी ३५ लाख रु. निधीमधून स्वागत कमान सुशोभीकरण २० लाख रु., स्मशानभूमी घाट बांधणे २० लाख रु., महाड-पंढरपूर रोड ते वाघजाई मंदिर रस्ता ४५ लाख रु., तर विशेष सर्वसाधारण अनुदानातून अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी २ कोटी २८ लाख रु., नगरपालिकेच्या उर्वरित कामासाठी एक कोटी ३५ लाख रु., असे एकूण ४ कोटी २८ लाखांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. या शिवाय शहरातील आरोग्य, वीज, कचरा, पाण्याचा ठेका या कामांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली.

चौकट : भोर शहराचा विकास आराखडा तयार करून तो शासनाकडे पाठवण्यासाठी नगराध्यक्षांकडे सही करण्यासाठी तो पाठवला. मात्र, त्यावर त्यांनी सही केली नाही . आराखड्यावर त्यांची हरकत होती. हरकत घेण्यासाठी ३ डिसेंबरच्या सभेला हजर नव्हते. आणि आता पाच महिने झाल्यावर आमदार व नगरसेवकांवर सूडबुद्धीने बिनबुडाचे आरोप केले. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत, असे काँग्रेस नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेस नगरसेवकांनी विकास आराखडा समितीत मला घेतले नाही आणि आराखडा बनवताना विश्वासात न घेताच नगरसेवकांचे हितसंबंध जपणारा आराखडा तयार करण्यात आला. शिवाय या संंबंधीचे सर्व अधिकार मुख्याधिकारी यांनाच दिल्याने मी सदरच्या आराखड्यावर सही केली नाही, असे नगराध्यक्षा दीपाली शेटे यांनी सांगितले.