शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

शौर्य पुरस्कार विजेत्याला अखेर छत्रछाया

By admin | Updated: September 15, 2015 01:34 IST

दीड महिन्यांपूर्वीपर्यंत रस्त्यावर राहणारा दिल्ली बॉम्बस्फोट मालिकेतील महत्त्वाचा साक्षीदार आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त तरुण राहुल काळे उपेक्षा अखेर थांबली आहे.

- प्रमोद गवळी, नवी दिल्लीदीड महिन्यांपूर्वीपर्यंत रस्त्यावर राहणारा दिल्ली बॉम्बस्फोट मालिकेतील महत्त्वाचा साक्षीदार आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त तरुण राहुल काळे उपेक्षा अखेर थांबली आहे. नोबेल पुरस्कारप्राप्त कैलाश सत्यार्थी यांच्या ‘बचपन बचाओ आंदोलन’ या संस्थेने त्याला आश्रय दिला आहे. हिंगोलीचे खासदार राजीव सातव त्याला दरमहा वरखर्चसाठी तीन हजार रुपये देत आहेत. गेल्या मार्च महिन्यात राहुलला१८ वर्षे पूर्ण झाल्याने बालगृहसोडावे लागले होते. तेव्हापासूनतो आपल्या मातापित्यांसह कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिर परिसरात दिवस कंठत होता. ‘लोकमत’ने सर्वप्रथम ३० जून रोजी याकडे लक्ष वेधले होते.‘बचपन बचाओ’ आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना राहुलच्या परिस्थितीची कल्पना येताच ते त्याला आपल्या सोबत घेऊन गेले. तूर्तास बुराडी क्षेत्रातील मुक्ती आश्रमात त्याची राहण्याची सोय करण्यात आली असून कैलाश सत्यार्थी फाऊंडेशन त्याचा खर्च करीत आहे. ‘बचपन बचाओ’चे धनंजय टिंगल यांनी सांगितले की, ‘आम्हाला राहुलची माहिती मिळाली तेव्हा त्याची मुक्ती आश्रमात राहण्याची व्यवस्था केली. शिक्षण पूर्ण करून नोकरी लागेपर्यंत तो तिथे राहू शकतो. राहुल हा दिल्ली बॉम्बस्फोट मालिकेतील महत्त्वाचा साक्षीदार असून त्याला पोलीस संरक्षण आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल अधिक माहिती देता येणार नाही.’राहुलचे वडील बजरंग काळे हे मूळ सोलापूर जिल्ह्णातील मोहोळ तालुक्यातील आहेत. १९७२ च्या भीषण दुष्काळामुळे ते दिल्लीला आले आणि तेव्हापासून झोपडपट्टीत राहात होते.पंतप्रधान, मुख्यमंत्री मदत करू शकले असते -सातवराहुलच्या मदतीसाठी मी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी मीच दर महिन्याला तीन हजार रुपये देण्याचे ठरविले. तसे धनादेशही त्याला दिले, असे खा. राजीव सातव यांनी सांगितले.राहुलला हवे घर- माझे आईवडील आजही रस्त्यावर राहतात. खेळणी विकून उदरनिर्वाह करतात. अर्थात मंदिराकडून त्यांची जेवणाची सोय केली जाते. इ.स. २००२ पर्यंत आम्ही मोतिया खान झोपडपट्टीत राहात होतो. तेथून हटविल्यावर रोहिणीमध्ये आम्हाला घर मिळणार होते. माझ्या वडिलांनी (बजरंग काळे) दहा हजार रुपये जमाही केले होते.परंतु पावती हरवल्याने अद्याप घर मिळालेले नाही. आईवडील दोघेही साठीच्या घरात आहेत. अशात त्यांच्या राहण्याची व्यवस्था झाली तर समाधान वाटेल, अशी कळकळीची विनंती राहुलने केली आहे.राहुलने केली होती पोलिसांना मदत- राहुल हा १३ सप्टेंबर २००८ ला दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेला महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्याच्या सांगण्यावरूनच आरोपींची रेखाचित्रे काढण्यात आली होती आणि चार जिवंत बॉम्ब जप्त करण्यातही त्याने पोलिसांना मदत केली होती. या धाडसाबद्दल राहुलला २००९ साली राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.