शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सुरक्षा संस्थांमध्ये दोष!

By admin | Updated: May 4, 2016 02:12 IST

दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचा अ‍ॅलर्ट दिला असताना पठाणकोट हवाई दलाच्या तळापर्यंत दहशतवादी पोहोचलेच कसे, असा सवाल करतानाच, दहशतवादी हल्ला रोखण्यास

नवी दिल्ली : दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचा अ‍ॅलर्ट दिला असताना पठाणकोट हवाई दलाच्या तळापर्यंत दहशतवादी पोहोचलेच कसे, असा सवाल करतानाच, दहशतवादी हल्ला रोखण्यास अपयशी ठरले, अशा शब्दांत संसदीय समितीने केंद्र सरकारला फटकारले आहे. देशाच्या दहशतवादविरोधी सुरक्षा संस्थांमध्ये गंभीर दोष असल्याचा व पठाणकोट हवाईतळावर चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला नसल्याचा ठपका या समितीने केंद्र सरकारवर ठेवला आहे.गृहमंत्रालयाशी संबंधित स्थायी समितीने मंगळवारी संसदेत सादर केलेल्या या अहवालात २ जानेवारीच्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पंजाब पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून संशय व्यक्त केला आहे. हल्ल्याबाबत सतर्क करण्यात आल्यानंतरही दहशतवादी उच्च सुरक्षा असलेल्या हवाई तळाचे सुरक्षा कवच भेदून आत कसे शिरले आणि हल्ला केला, हे स्पष्ट होऊ शकले नाही असे म्हटले आहे. दहशतवाद्यांद्वारे अपहृत आणि नंतर सोडण्यात आलेले पठाणकोटचे पोलीस अधीक्षक व त्यांच्या मित्रांकडून मिळालेली विश्वसनीय आणि ठोस गोपनीय सूचना तसेच हल्लेखोर दहशतवादी व त्यांच्या म्होरक्यांदरम्यान हल्ल्याबाबत झालेले संभाषण हाती लागल्यावरही सुरक्षा संस्थांना धोक्याची जाणीव होऊ शकली नाही एवढी त्यांची तयारी वाईट होती. (वृत्तसंस्था)हल्ल्यासंबंधी समितीची निरीक्षणेआमच्या दहशतवादविरोधी सुरक्षा संस्थांमध्ये काही गंभीर दोष आहेत. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या या हवाईदल तळाच्या परिसरातील भिंतीजवळ एकही रस्ता नाही. त्या ठिकाणी उंच उंच झाडेझुडपे पसरली आहेत. यामुळे दहशतवाद्यांना लपण्यास मदत झाली आणि सुरक्षा दलांना दहशतवाद्यांना पिटाळून लावण्यात अडचण निर्माण झाली.समितीची सूचनासीमा क्षेत्रात गस्त वाढवून कुंपण आणि फ्लडलाइट्स बसविण्याच्या कामाची गांभीर्याने दखल घेतली जावी. पठाणकोट हवाईदल तळ उच्च सुरक्षा क्षेत्र घोषित करण्यात यावे, अशी सूचना समितीने केली. सरकारने कुठल्या आधारे या हल्ला प्रकरणाच्या चौकशीत पाकिस्तानची मदत घेण्याचा विचार केला आणि त्या देशाच्या संयुक्त चौकशी पथकाला भारताचे आमंत्रण दिले, हे जाणून घेण्याची इच्छा समितीने व्यक्त केली आहे.1हवाईदल तळावरील सुरक्षा बंदोबस्त चोख नाही. सभोवतालच्या भिंतीची देखरेख व्यवस्था अत्यंत वाईट आहे.2दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात होता याबद्दल दुमत नाही. हल्लेखोर आणि त्यांच्या पाकी म्होरक्यांदरम्यानच्या संभाषणावरून हे सिद्ध होते. दहशतवाद्यांकडून जप्त केलेली शस्त्रास्त्रे व दारुगोळ्यावरही पाकचे चिन्ह.3पाकमधील सुरक्षा व गुप्तचर संस्थांच्या मदतीशिवाय हा हल्ला शक्य नव्हता. सीमेवर कुंपण, फ्लडलाइट्स आणि सीमा सुरक्षा दल जवानांची गस्त असतानाही पाकिस्तानी दहशतवादी सीमा ओलांडून भारतात घुसण्यास यशस्वी ठरले.4 पंजाबच्या सीमा क्षेत्रात सक्रिय अमली पदार्थांच्या सिंडिकेटच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे.