शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

शेतकर्‍यांबाबतचा दुजाभाव खपवून घेणार नाही

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

शरद पवार : शेतमालास कमी भाव देण्याचा प्रकारपुणे : मूठभर असलेले स्टील उत्पादक अडचणीत आल्यानंतर त्यांचे कर कमी करण्यासाठी केंद्र सरकार लगेच तयार झाले, मात्र कोट्यवधींच्या संख्येने असलेल्या शेतकर्‍यांसाठीच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यास सरकार तयार नाही. महागाई कमी करण्याच्या नावाखाली शेतमालास कमी भाव देण्याचे प्रकार सरकारकडून सुरू आहेत. हा दुजाभाव खपवून ...


शरद पवार : शेतमालास कमी भाव देण्याचा प्रकार

पुणे : मूठभर असलेले स्टील उत्पादक अडचणीत आल्यानंतर त्यांचे कर कमी करण्यासाठी केंद्र सरकार लगेच तयार झाले, मात्र कोट्यवधींच्या संख्येने असलेल्या शेतकर्‍यांसाठीच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यास सरकार तयार नाही. महागाई कमी करण्याच्या नावाखाली शेतमालास कमी भाव देण्याचे प्रकार सरकारकडून सुरू आहेत. हा दुजाभाव खपवून घेतला जाणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे केले.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघातर्फे आयोजित ५५ व्या अधिवेशनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त द्राक्ष बागाईतदार संघातर्फे ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर व माजी मंत्री विनायक पाटील यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
पवार म्हणाले, महागाई कमी करण्यास आमचा विरोध नाही. शेतकर्‍यांना लागणारी खते, बी-बियाणे यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत़ त्याच्या किंमती शासनाने अगोदर कमी कराव्यात. शेतकर्‍यांना स्वस्तात चांगली आरोग्य सेवा मिळावी, त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण उपलब्ध व्हावे. शेतकर्‍यांच्या गरजेच्या वस्तुंच्या किंमती कमी कराव्यात. शेती अर्थव्यवस्थेचा विचार करणे आवश्यक आहेे. शेतकर्‍यांकडे पैसा आला तर बाजारातील मंदीचे वातावरण दूर होऊ शकेल. दीर्घ मुदतीची कर्जे कमी व्याजदराने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
सध्या शेतीचा सगळ्यात मोठा प्रश्न पाणी हा आहे. जुलै, ऑगस्ट कोरडा गेला आता सगळी मदार सप्टेंबरवर आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये ५० हजार शेततळी उभारण्याचे काम हाती घेतले पाहिजे. हे काम झाले तर पुढील दोन वर्षांत त्याचे चांगले परिणाम दिसून येतील, असेही त्यांनी सांगितले.
कांद्याचे दर वाढले की लगेच त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. मात्र सर्वसामान्य माणसाचा कांद्यावर होणारा दररोजचा खर्च अगदीच नगण्य आहे, याचा विचार केला पाहिजे. शेतमालाला चांगली किंमत मिळणे आवश्यक आहे. द्राक्ष बागायतदार संघासारखेच इतर पिके घेणार्‍या शेतकर्‍यांच्या संघटनांनी काम केले तर देशातील चित्र बदलून जाईल, असे पवार म्हणाले. शेतकर्‍यांसाठी पवार यांचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार ना. धो. महानोर यांनी काढले. संघाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
--------------