शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

शेतकरी आत्महत्या दुष्काळामुळे नाही

By admin | Updated: April 29, 2017 00:38 IST

दुष्काळामुळे राज्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, असा दावा तामिळनाडू सरकारने केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या

नवी दिल्ली : दुष्काळामुळे राज्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, असा दावा तामिळनाडू सरकारने केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आत्महत्येमागे वैयक्तिक कारणे होती, असे पलानिस्वामी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जबाबात म्हटले आहे.राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या या जबाबावर आक्षेप घेतला असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे दुष्काळ हेच कारण होते. कर्ज आणि दुष्काळ यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १३ एप्रिल रोजी तामिळनाडू सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत दोन आठवड्यांच्या आत आपले म्हणणे विस्ताराने मांडण्यास सांगितले होते. त्यानंतर सरकारने शुक्रवारी न्यायालयात म्हणणे मांडले. तामिळनाडू सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. आत्महत्यांना आळा घालण्यासाठी पुरेशी पावले न उचलल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. ‘शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि राज्य सरकार काहीही करीत नाही हे दुर्दैवी आहे, असे मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत एका अशासकीय संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तत्पूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज आणि उर्वरित सहकारी सोसायट्या आणि बँकांचे कर्ज माफ करण्याचे आदेश दिले होते.