शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या दुष्काळामुळे नाही

By admin | Updated: April 29, 2017 00:38 IST

दुष्काळामुळे राज्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, असा दावा तामिळनाडू सरकारने केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या

नवी दिल्ली : दुष्काळामुळे राज्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, असा दावा तामिळनाडू सरकारने केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आत्महत्येमागे वैयक्तिक कारणे होती, असे पलानिस्वामी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जबाबात म्हटले आहे.राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या या जबाबावर आक्षेप घेतला असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे दुष्काळ हेच कारण होते. कर्ज आणि दुष्काळ यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १३ एप्रिल रोजी तामिळनाडू सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत दोन आठवड्यांच्या आत आपले म्हणणे विस्ताराने मांडण्यास सांगितले होते. त्यानंतर सरकारने शुक्रवारी न्यायालयात म्हणणे मांडले. तामिळनाडू सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. आत्महत्यांना आळा घालण्यासाठी पुरेशी पावले न उचलल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. ‘शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि राज्य सरकार काहीही करीत नाही हे दुर्दैवी आहे, असे मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत एका अशासकीय संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तत्पूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज आणि उर्वरित सहकारी सोसायट्या आणि बँकांचे कर्ज माफ करण्याचे आदेश दिले होते.