शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

शेतकरी आत्महत्या दुष्काळामुळे नाही

By admin | Updated: April 29, 2017 00:38 IST

दुष्काळामुळे राज्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, असा दावा तामिळनाडू सरकारने केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या

नवी दिल्ली : दुष्काळामुळे राज्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, असा दावा तामिळनाडू सरकारने केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आत्महत्येमागे वैयक्तिक कारणे होती, असे पलानिस्वामी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जबाबात म्हटले आहे.राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या या जबाबावर आक्षेप घेतला असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे दुष्काळ हेच कारण होते. कर्ज आणि दुष्काळ यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १३ एप्रिल रोजी तामिळनाडू सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत दोन आठवड्यांच्या आत आपले म्हणणे विस्ताराने मांडण्यास सांगितले होते. त्यानंतर सरकारने शुक्रवारी न्यायालयात म्हणणे मांडले. तामिळनाडू सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. आत्महत्यांना आळा घालण्यासाठी पुरेशी पावले न उचलल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. ‘शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि राज्य सरकार काहीही करीत नाही हे दुर्दैवी आहे, असे मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत एका अशासकीय संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तत्पूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज आणि उर्वरित सहकारी सोसायट्या आणि बँकांचे कर्ज माफ करण्याचे आदेश दिले होते.