शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भुतांमुळे शेतकरी आत्महत्या...गृहमंत्रालयाचा अजब दावा

By admin | Updated: July 21, 2016 12:02 IST

मध्यप्रदेशातील सेहोरे जिल्ह्यात 2014 ते 2016 दरम्यान 3 शेतक-यांच्या आत्महत्या करण्यामागे कोणतं आर्थिक कारणं किंवा कौटुंबिक समस्या नसून भूत आहेत असा दावा गृहमंत्रालयाने केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
भोपाळ, दि. 21 - मध्यप्रदेशातील सेहोरे जिल्ह्यात 2014 ते 2016 दरम्यान एकूण 418 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. यातील 3 शेतक-यांच्या आत्महत्या करण्यामागे कोणतं आर्थिक कारणं किंवा कौटुंबिक समस्या नसून भूत आहेत. हा दावा कोणी स्थानिक किंवा गावकरी करत नसून राज्याचं गृहमंत्रालय करत आहे. विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात गृहमंत्रालयाने ही अजब माहिती दिली आहे. 
 
पिकांचं नुकसान झाल्याने सेहोरे जिल्ह्यात अनेक शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा मतदारसंघ याच जिल्ह्यात आहे. काँग्रेस आमदार शैलेंद्र पटेल यांनी सेहोरे जिल्ह्यात 2014 ते 2016 दरम्यान किती शेतक-यांनी आत्महत्या केली याची माहिती मागितली होती. यावर उत्तर देताना सरकारडून ही माहिती देण्यात आली. सरकारने दिलेल्या माहितीवर शैलेंद्र पटेल यांनी सरकार खरोखर भुतांवर विश्वास ठेवतं का ? यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. 
 
'आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरच ही माहिती देण्यात आल्याचं', गृहमंत्री भुपेंद्र सिंग यांनी सांगितलं आहे. 'सेहोरे जिल्ह्यात 2014 पासून 418 शेतक-यांनी आत्महत्या केली असून यातील 117 जणांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही', असंही भुपेंद्र सिंग यांनी सांगितलं. 
 
'पिकांचं नुकसान झाल्याने एकाही शेतक-याने आत्महत्या केली नसल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र मी त्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहे. पिकांचं नुकसान झाल्याने आत्महत्या कऱणा-यांच्या अंत्यसंस्काराला मी स्वत: हजेरी लावलेली आहे', असं काँग्रेस आमदार शैलेंद्र पटेल यांनी म्हटलं आहे.
 
'आत्महत्यांना शेतकरी गंभीरपणे पाहत आहे. विष विक्री करणा-यांना ग्राहकांचे मोबाईल क्रमांक आणि पत्ते घेणे कायद्याने बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याच्रपमाणे या कायद्याचं पालन होत आहे की नाही याचीही तपासणी केली जात आहे', अशी माहिती गृहमंत्री भुपेंद्र सिंग यांनी दिली आहे.