कर्जास कंटाळून शेतकर्याची आत्महत्या पळसोदची घटना : राहत्या घरी केले विषारी पदार्थाचे सेवन
By admin | Updated: April 26, 2016 00:15 IST
जळगाव : कर्जबाजारीपणास कंटाळून पळसोद (ता.जळगाव) येथील जिजाबराव दमा पाटील (वय ४५) या शेतकर्याने विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना २४ एप्रिल रोजी घडली.
कर्जास कंटाळून शेतकर्याची आत्महत्या पळसोदची घटना : राहत्या घरी केले विषारी पदार्थाचे सेवन
जळगाव : कर्जबाजारीपणास कंटाळून पळसोद (ता.जळगाव) येथील जिजाबराव दमा पाटील (वय ४५) या शेतकर्याने विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना २४ एप्रिल रोजी घडली.दुष्काळामुळे आलेली नापिकी तसेच डोक्यावर वाढत जाणार्या कर्जास कंटाळून जिजाबराव पाटील यांनी विषारी पदार्थाचे सेवन केले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर खासगी सावकारी, विकास सोसायटी व बॅँक मिळून अडीच ते तीन लाख रुपये कर्ज होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात प्राथमिक स्वरुपात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती मिळाली.