शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

खते, कीटकनाशके विक्रेत्यांचा आजपासून बंद केंद्राच्या शासन निर्णयास विरोध : कोट्यवधींचा व्यवहार होणार ठप्प

By admin | Updated: February 8, 2016 22:55 IST

जळगाव- रासायनिक खते विक्रेता कृषि पदविकाधारक नसल्यास त्याने आपल्या दुकानात कृषि पदविकाधारक कर्मचारी नियुक्त करावा आणि किटकनाशके विक्रेता बीएसस्सी (बॉटनी, केमिस्ट्री किंवा कृषि) असावा. तसे नसल्यास त्याने संबंधित अर्हताधारक कर्मचारी नियुक्त करावा. याशिवाय परवाना नूतनीकरण होणार नाही व नवीन परवाने मिळणार नाहीत, असा आदेश केंद्रीय कृषि व खतेसंबंधीच्या मंत्रालयाने काढला आहे. याविरोधात जिल्हाभरातील खते व किटकनाशक विक्रेते, वितरक ९ रोजी निषेध म्हणून बंद पुकारणार आहेत, अशी माहिती खते व किटकनाशके विक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष विनोद तराळ यांनी दिली.

जळगाव- रासायनिक खते विक्रेता कृषि पदविकाधारक नसल्यास त्याने आपल्या दुकानात कृषि पदविकाधारक कर्मचारी नियुक्त करावा आणि किटकनाशके विक्रेता बीएसस्सी (बॉटनी, केमिस्ट्री किंवा कृषि) असावा. तसे नसल्यास त्याने संबंधित अर्हताधारक कर्मचारी नियुक्त करावा. याशिवाय परवाना नूतनीकरण होणार नाही व नवीन परवाने मिळणार नाहीत, असा आदेश केंद्रीय कृषि व खतेसंबंधीच्या मंत्रालयाने काढला आहे. याविरोधात जिल्हाभरातील खते व किटकनाशक विक्रेते, वितरक ९ रोजी निषेध म्हणून बंद पुकारणार आहेत, अशी माहिती खते व किटकनाशके विक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष विनोद तराळ यांनी दिली.
केंद्राने वेगवेगळ्या तारखांना दोन शासनादेश किटकनाशके व खते विक्रेते, वितरकांसाठी आदेश काढले. खते विक्रेता हा कृषि पदविकाधारक असावा किंवा त्याने तत्सम शिक्षण असलेला कर्मचारी नेमावा. तर किटकनाशके विक्रेता हा कृषि, बॉटनी किंवा केमिस्ट्री या विषयातील पदीधारक असावा. तसे नसले तर त्याने ही अर्हता प्राप्त कर्मचारी नेमावा. त्याशिवाय दुकान चालविता येणार नाही. २०१७ पर्यंत याबाबत कार्यवाही पूर्ण करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

विक्रेत्यांची अडचण
अनेक विक्रेते किंवा वितरक हे कृषि पदवी व पदविकाधारक नाहीत. त्यांना आता हे शिक्षण घ्यायचे म्हटले तरी किमान तीन वर्षे किंवा चार वर्षे लागतील. त्यामुळे२०१७ पर्यंत पदवीका व पदवी घेणे शक्य नाही. त्यामुळे हा आदेश मागे घेतला जावा. शेतीची अवस्था बिकट आहे. शेतीची स्थिती बरी असली तर खत विक्रेते, वितरकांचा व्यवसाय होतो. अशात जाचक नियम, आदेश अधिक त्रासदायक आहेत. याबाबत शासनाने तातडीने विचार करून आदेश मागे घ्यावा, अशी मागणी असोसिएशनचे तराळ, कैलास मालू आदींनी केली आहे. या आदेशांच्यासंदर्भात असोसिएशन जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहे. तसेच राज्य शासनाच्या प्रतिनिधींची भेटही घेणार आहे.