शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

शेतकर्‍यांचे कर्ज व अन्य मंत्रिमंडळ निर्णय

By admin | Updated: July 12, 2015 21:58 IST

५०० कोटींच्या कर्जाकरिता नाबार्डला हमी

५०० कोटींच्या कर्जाकरिता नाबार्डला हमी
-मंत्रिमंडळाचा निर्णय: शेतकरी सक्षम करणार, मुख्यमंत्र्यांचा दावा
मुंबई- विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध व्हावे याकरिता नाबार्डला ५०० कोटी रुपयांची हमी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. राज्यातील नऊ बँका आर्थिक डबघाईला आल्याने तेथील शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध होण्यात निर्माण झालेला अडसर दूर झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मागील सरकारने दिलेल्या कर्जमाफीने राष्ट्रवादी काँग्रेसने दिवाळखोरीत काढलेल्या बँकांचे उखळ पांढरे झाले. आमचे सरकार शेतकर्‍यांची आर्थिक पत वाढवण्यावर भर देत असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्ष संपूर्ण कर्जमाफीची मागणी करीत आहे. मात्र २००८ मधील त्यांनी दिलेल्या कर्जमाफीचा बँकांना फायदा झाला होता. त्यावेळी कर्जमाफी दिलेल्या पैशातील २५ टक्के पैसा जरी शेतीत गुंतवला असता, तरी शेतकर्‍यांची क्रयशक्ती वाढली असती. शेतकर्‍यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात आली असून पहिल्या वर्षी शेतकर्‍यांकडून व्याजाची आकारणी केली जाणार नाही. पुढील चार वर्षे सरकार ६ टक्के व्याज भरणार आहे. यामुळे यावर्षी कर्ज मिळणार्‍या शेतकर्‍यांच्या व कर्जापोटी दिल्या जाणार्‍या रकमेत वाढ होणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम देण्याबाबत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ६ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये महाराष्ट्राला १८०० कोटी रुपये मिळणार असून राज्य सरकार ४०० कोटी रुपये देणार असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. (विशेष प्रतिनिधी)
..............................................
आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांकरिता योजना
राज्यातील १३ ते १४ जिल्ह्यांमधील शेतकरी आत्महत्या रोखण्याकरिता ११०० कोटी रुपयांची योजना तयार केली असून यामध्ये उस्मानाबाद, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश केला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
............................................
अपुरा पाऊस- सरकारची योजना तयार
राज्यात अपुरा पाऊस झाला असून हवामान खाते व स्कायमेट यांनी वर्तविलेले अंदाज लक्षात घेऊन दुबार पेरणी व टंचाईच्या संकटावर मात करण्याकरिता योजना तयार करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ९० लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून त्यापैकी २३ लाख हेक्टरवरील पेरण्या अडचणीत आल्या आहेत. आतापर्यंत राज्यात ६७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण येथे परिस्थिती चांगली असली तरी धुळे, नंदूरबार, जळगाव व संपूर्ण मराठवाड्यातील परिस्थिती बिकट आहे. पश्चिम विदर्भात पाच ते सात दिवसांत पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे संकट निर्माण होईल. अशावेळी बियाणे व खते यांची व्यवस्था करण्याचा सरकारचा कृती आराखडा तयार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
.......................................................
ऑगस्टमध्ये कृत्रिम पाऊस
राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी केली असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याकरिता दोन कंपन्यांना मंजुरी दिली असून आणखी एका कंपनीने स्वत:हून प्रयोग करण्याची तयारी दाखवली असल्याचे ते म्हणाले.
...................................................
मराठी राजभाषा विधेयक मंजूर करणार
मराठी ही राज्याची राजभाषा असेल व देवनागरी ही लिपी असेल अशी तरतूद असलेला कायदा या विधिमंडळ अधिवेशनात मंजूर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून मराठी ही राजभाषा असल्याची कायदेशीर तरतूद केली नव्हती, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
.............................................
प्रमोद महाजन कौशल्य प्रशिक्षण योजना
भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नावे कौशल्य प्रशिक्षण योजना सुुरु करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. वेगवेगळ्या विभागांमार्फत राबवण्यात येणार्‍या कौशल्य विकासाच्या योजना यापुढे या योजनेमार्फत राबवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.