शेतकऱ्यांचे हाल ; विमा कंपन्या मालामाल ! (भाग १)
By admin | Updated: July 4, 2015 00:06 IST
लोकमत विशेष शेतकरी प्रतीक्षेत : कधी मिळणार विमा लाभ नागपूर : दुष्काळ व अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या पिकांना सुरक्षा कवच मिळावे, या हेतूने केंद्र व राज्य शासनातर्फे राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविली जात आहे. परंतु या योजनेचा शेतकऱ्यांना आजपर्यंत कधीच योग्य लाभ मिळाला नसून, केवळ विमा कंपन्या मालामाल झाल्या ...
शेतकऱ्यांचे हाल ; विमा कंपन्या मालामाल ! (भाग १)
लोकमत विशेष शेतकरी प्रतीक्षेत : कधी मिळणार विमा लाभ नागपूर : दुष्काळ व अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या पिकांना सुरक्षा कवच मिळावे, या हेतूने केंद्र व राज्य शासनातर्फे राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविली जात आहे. परंतु या योजनेचा शेतकऱ्यांना आजपर्यंत कधीच योग्य लाभ मिळाला नसून, केवळ विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत. त्यामुळे कृषी विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी की, विमा कंपन्यांसाठी असा नेहमीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार मागील वर्षी नागपूर विभागातील सुमारे १ लाख ३५ हजार ३१५ शेतकऱ्यांनी १ लाख ७८ हजार ३७७.०१ हेक्टर क्षेत्रासाठी पिक विमा काढला होता. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वांधिक म्हणजे ६२ हजार ३८६ शेतकऱ्यांचा समावेश होता तर नागपूर जिल्ह्यातील १५ हजार ७६६, वर्धा १० हजार ७४१, भंडारा १५ हजार ८६२, गोंदिया १२ हजार ७२४ व गडचिरोली जिल्ह्यातील १७ हजार ८३६ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. विशेष म्हणजे, यासाठी विमा कंपन्यांच्या खात्यात सुमारे १० कोटी ६६ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला होता. दुसरीकडे मागील वर्षी संपूर्ण विदर्भात जोरदार अतिवृष्टी झाली होती. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे विमाधारक १ लाख ३५ हजार ३१५ शेतकऱ्यांपैकी ५२ हजार ८०२ शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली असून त्यांना २९ कोटी ९ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. मात्र विमा कंपन्यांनी त्यापैकी अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कवडी सुद्धा दिलेली नाही. गत जून महिन्यापासून खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे खत व बी-बियाण्यांची खरेदी करावी लागत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली असती, तर पीक विम्याचा खरा लाभ झाला असता. परंतु विमा कंपन्या मागील काही दिवसांपासून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कृषी व पणन विभागाचे राज्यमंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी विभागातील कृषी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. दरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी पीक विम्याचा मुद्दा उपस्थित करू न, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत विमा लाभ मिळाला नसल्याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले. ......