शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शेतकऱ्यांचे हाल ; विमा कंपन्या मालामाल ! (भाग १)

By admin | Updated: July 4, 2015 00:06 IST

लोकमत विशेष शेतकरी प्रतीक्षेत : कधी मिळणार विमा लाभ नागपूर : दुष्काळ व अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या पिकांना सुरक्षा कवच मिळावे, या हेतूने केंद्र व राज्य शासनातर्फे राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविली जात आहे. परंतु या योजनेचा शेतकऱ्यांना आजपर्यंत कधीच योग्य लाभ मिळाला नसून, केवळ विमा कंपन्या मालामाल झाल्या ...


लोकमत विशेष
शेतकरी प्रतीक्षेत : कधी मिळणार विमा लाभ
नागपूर : दुष्काळ व अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या पिकांना सुरक्षा कवच मिळावे, या हेतूने केंद्र व राज्य शासनातर्फे राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविली जात आहे. परंतु या योजनेचा शेतकऱ्यांना आजपर्यंत कधीच योग्य लाभ मिळाला नसून, केवळ विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत. त्यामुळे कृषी विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी की, विमा कंपन्यांसाठी असा नेहमीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार मागील वर्षी नागपूर विभागातील सुमारे १ लाख ३५ हजार ३१५ शेतकऱ्यांनी १ लाख ७८ हजार ३७७.०१ हेक्टर क्षेत्रासाठी पिक विमा काढला होता. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वांधिक म्हणजे ६२ हजार ३८६ शेतकऱ्यांचा समावेश होता तर नागपूर जिल्ह्यातील १५ हजार ७६६, वर्धा १० हजार ७४१, भंडारा १५ हजार ८६२, गोंदिया १२ हजार ७२४ व गडचिरोली जिल्ह्यातील १७ हजार ८३६ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. विशेष म्हणजे, यासाठी विमा कंपन्यांच्या खात्यात सुमारे १० कोटी ६६ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला होता. दुसरीकडे मागील वर्षी संपूर्ण विदर्भात जोरदार अतिवृष्टी झाली होती. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे विमाधारक १ लाख ३५ हजार ३१५ शेतकऱ्यांपैकी ५२ हजार ८०२ शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली असून त्यांना २९ कोटी ९ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. मात्र विमा कंपन्यांनी त्यापैकी अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कवडी सुद्धा दिलेली नाही. गत जून महिन्यापासून खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे खत व बी-बियाण्यांची खरेदी करावी लागत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली असती, तर पीक विम्याचा खरा लाभ झाला असता. परंतु विमा कंपन्या मागील काही दिवसांपासून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कृषी व पणन विभागाचे राज्यमंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी विभागातील कृषी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. दरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी पीक विम्याचा मुद्दा उपस्थित करू न, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत विमा लाभ मिळाला नसल्याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले.
......