शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे हाल ; विमा कंपन्या मालामाल ! (भाग १)

By admin | Updated: July 4, 2015 00:06 IST

लोकमत विशेष शेतकरी प्रतीक्षेत : कधी मिळणार विमा लाभ नागपूर : दुष्काळ व अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या पिकांना सुरक्षा कवच मिळावे, या हेतूने केंद्र व राज्य शासनातर्फे राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविली जात आहे. परंतु या योजनेचा शेतकऱ्यांना आजपर्यंत कधीच योग्य लाभ मिळाला नसून, केवळ विमा कंपन्या मालामाल झाल्या ...


लोकमत विशेष
शेतकरी प्रतीक्षेत : कधी मिळणार विमा लाभ
नागपूर : दुष्काळ व अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या पिकांना सुरक्षा कवच मिळावे, या हेतूने केंद्र व राज्य शासनातर्फे राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविली जात आहे. परंतु या योजनेचा शेतकऱ्यांना आजपर्यंत कधीच योग्य लाभ मिळाला नसून, केवळ विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत. त्यामुळे कृषी विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी की, विमा कंपन्यांसाठी असा नेहमीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार मागील वर्षी नागपूर विभागातील सुमारे १ लाख ३५ हजार ३१५ शेतकऱ्यांनी १ लाख ७८ हजार ३७७.०१ हेक्टर क्षेत्रासाठी पिक विमा काढला होता. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वांधिक म्हणजे ६२ हजार ३८६ शेतकऱ्यांचा समावेश होता तर नागपूर जिल्ह्यातील १५ हजार ७६६, वर्धा १० हजार ७४१, भंडारा १५ हजार ८६२, गोंदिया १२ हजार ७२४ व गडचिरोली जिल्ह्यातील १७ हजार ८३६ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. विशेष म्हणजे, यासाठी विमा कंपन्यांच्या खात्यात सुमारे १० कोटी ६६ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला होता. दुसरीकडे मागील वर्षी संपूर्ण विदर्भात जोरदार अतिवृष्टी झाली होती. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे विमाधारक १ लाख ३५ हजार ३१५ शेतकऱ्यांपैकी ५२ हजार ८०२ शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली असून त्यांना २९ कोटी ९ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. मात्र विमा कंपन्यांनी त्यापैकी अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कवडी सुद्धा दिलेली नाही. गत जून महिन्यापासून खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे खत व बी-बियाण्यांची खरेदी करावी लागत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली असती, तर पीक विम्याचा खरा लाभ झाला असता. परंतु विमा कंपन्या मागील काही दिवसांपासून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कृषी व पणन विभागाचे राज्यमंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी विभागातील कृषी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. दरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी पीक विम्याचा मुद्दा उपस्थित करू न, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत विमा लाभ मिळाला नसल्याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले.
......