शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा

By admin | Updated: May 11, 2015 04:38 IST

मोबदला देण्याचा कायदा त्यांनी आणायला हवा. हमी भावाच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांची पंतप्रधानांकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा आहे.

मिलिंद मुरुगकर भूमीअधिग्रहण कायद्यातील कलमामुळे हे सरकार शेतीविकासाला दुय्यम महत्त्व देणारे आहे आणि कॉर्पाेरेट क्षेत्राला प्राधान्य देणारे आहे अशी प्रतिमा तयार झाली आहे. ती बदलणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना खाजगी प्रकल्पासाठी जमिनी द्याव्या लागतील त्यांना प्रकल्पाच्या आसपास पर्यायी जमीन विकत घेता येईल, एवढा मोबदला देण्याचा कायदा त्यांनी आणायला हवा. हमी भावाच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांची पंतप्रधानांकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा आहे. ---------------नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले आणि त्यामुळे त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्तता किती प्रमाणात झाली, असा प्रश्न आत्ताच उपस्थित करणे कदाचित उचित ठरणार नाही. एक वर्ष हा तसा खूप छोटा कालावधी आहे. पण तरीही आपण आजवरच्या मोदी सरकारच्या वाटचालीवरून भविष्यातील काही अंदाज बांधू शकतो. शेतकऱ्यांची एक ठोस अपेक्षा अशी असणार की मोदी सरकारने भूमी अधिग्रहणासंदर्भात जो वटहुकूम काढला आहे त्यातील सर्वांत वादग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधी असलेले कलम सरकारने मागे घ्यावे. याआधीच्या काँग्रेस प्रणीत यूपीए सरकारने जमीन अधिग्रहणाचा जो कायदा संमत केला त्यात ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांची संमती असणे बंधनकारक होते. खरेतर, नरेंद्र मोदींकडून अपेक्षा जास्त वेगळी होती. पण दुर्दैवाने तसे न घडता शेतकऱ्यांच्या संमतीचे कलमही त्यांनी काढून टाकले. शेतीमालाचा हमी भाव हा अत्यंत संवेदनशील आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. मोदी सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांना गोंधळात टाकणारी आहे. कारण त्यांनी प्रचार सभांमध्ये शेतमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा देणारे हमी भाव आम्ही देऊ, असे स्पष्ट आश्वासन दिले होते. परंतु निवडून आल्यावर सुप्रीम कोर्टात आम्हाला असे हमी भाव देणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. ही भूमिका निवडणुकीतील आश्वासनाच्या एकदम विरोधी आहे. जो आदेश काढला आहे त्यात राज्य सरकारांना त्यांच्या स्वत:च्या तिजोरीतूनदेखील केंद्र सरकारच्या हमी भावावर बोनस देण्यावर बंदी घातली. तेव्हा हमी भावासंदर्भात शेतकऱ्यांची पंतप्रधानांकडून प्रामाणिक अपेक्षा आहे.शेतीला दुय्यम स्थान!भूमीअधिग्रहण कायद्यातील कलमामुळे हे सरकार शेतीविकासाला दुय्यम महत्त्व देणारे आहे आणि कॉर्पोरेट क्षेत्राला प्राधान्य देणारे आहे अशी प्रतिमा तयार झाली आहे. ती बदलण्याची आवश्यकता आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे झपाट्याने औद्योगिकीकरण व्हायचे असेल तर औद्योगिक उत्पादनांची मागणी वाढणे गरजेचे आहे. लोकांची क्र यशक्ती वाढल्याखेरीज ही गोष्ट शक्य नाही; आणि ते घडण्याचा मुख्य मार्ग म्हणजे शेतीविकास. पावसाचे प्रमाण थोडेदेखील बदलले की त्याचा शेअर बाजाराच्या निर्देशांकावर मोठा परिणाम होतो. यावरूनच शेतीक्षेत्राचे औद्योगिकीकरणामधील योगदान लक्षात येते. केंद्र सरकारने आपल्या धोरणात आद्योगिक विकासाबरोबरच शेतीविकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.