शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

शेतीमाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

नायगाव : दिवसागणीक कांद्याच्या भावात सुरु असलेल्या घसरणीमुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. कांद्याबरोबर सर्वच शेतीमालांना बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.

नायगाव : दिवसागणीक कांद्याच्या भावात सुरु असलेल्या घसरणीमुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. कांद्याबरोबर सर्वच शेतीमालांना बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.
बाजारात सध्या कोबी, फ्लॉवर, टमाटे आदिंसह सर्वच भाजीपाला मातीमोल भावाने विकण्याची प्रसंगी फेकून देण्याची वेळ बळीराजावर येत आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वच शेतीमालास उत्पादन खर्चही हाती पडण्याइतका दर कोणत्याच पिकातून येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या सर्वच पिकांमध्ये शेतकर्‍यांना हमखास उत्पन्न मिळवून देणार्‍या कांद्याच्या दरातही चांगलीच घसरण सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर खर्च करुन प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या कांद्याला सध्या बाजारात ३५० ते ४५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. या भावाने शेतकर्‍यांनी पिकाच्या उत्पादनावर केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
कधी ग्राहकांच्या तर कधी उत्पादकांच्या डोळ्यातून पाणी काढणार्‍या कांद्याचा विषय कायमच चर्चिला जातो. मात्र, अनेकदा कमी बाजार भावामुळे शेतकर्‍यांचा रास्ता रोको होवूनही शासन याकडे गांभिर्याने बघत नाही. कधीतरी कांदा भावात सुधारणा झालीत तर सर्व प्रसार माध्यमांद्वारे ग्राहकांच्या डोळ्यातून कांद्याचे काढलेले पाणी दाखवले जाते व शासनही अशावेळी तात्काळ याची दखल घेवून बाजारभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखते. कोणतेही शासन कधीच शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेत नसल्याचा आजपर्यंतचा उत्पादकांचा अनुभव आहे. सध्या सर्वच शेतीमालास बाजारात मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे शेतकरी वर्गात मोठी कोंडी निर्माण झाली आहे. (वार्ताहर) (जोड)(1)