शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

नायगाव : दिवसागणीक कांद्याच्या भावात सुरु असलेल्या घसरणीमुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. कांद्याबरोबर सर्वच शेतीमालांना बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.

नायगाव : दिवसागणीक कांद्याच्या भावात सुरु असलेल्या घसरणीमुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. कांद्याबरोबर सर्वच शेतीमालांना बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.
बाजारात सध्या कोबी, फ्लॉवर, टमाटे आदिंसह सर्वच भाजीपाला मातीमोल भावाने विकण्याची प्रसंगी फेकून देण्याची वेळ बळीराजावर येत आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वच शेतीमालास उत्पादन खर्चही हाती पडण्याइतका दर कोणत्याच पिकातून येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या सर्वच पिकांमध्ये शेतकर्‍यांना हमखास उत्पन्न मिळवून देणार्‍या कांद्याच्या दरातही चांगलीच घसरण सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर खर्च करुन प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या कांद्याला सध्या बाजारात ३५० ते ४५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. या भावाने शेतकर्‍यांनी पिकाच्या उत्पादनावर केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
कधी ग्राहकांच्या तर कधी उत्पादकांच्या डोळ्यातून पाणी काढणार्‍या कांद्याचा विषय कायमच चर्चिला जातो. मात्र, अनेकदा कमी बाजार भावामुळे शेतकर्‍यांचा रास्ता रोको होवूनही शासन याकडे गांभिर्याने बघत नाही. कधीतरी कांदा भावात सुधारणा झालीत तर सर्व प्रसार माध्यमांद्वारे ग्राहकांच्या डोळ्यातून कांद्याचे काढलेले पाणी दाखवले जाते व शासनही अशावेळी तात्काळ याची दखल घेवून बाजारभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखते. कोणतेही शासन कधीच शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेत नसल्याचा आजपर्यंतचा उत्पादकांचा अनुभव आहे. सध्या सर्वच शेतीमालास बाजारात मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे शेतकरी वर्गात मोठी कोंडी निर्माण झाली आहे. (वार्ताहर) (जोड)(1)