शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

शेतीमाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

नायगाव : दिवसागणीक कांद्याच्या भावात सुरु असलेल्या घसरणीमुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. कांद्याबरोबर सर्वच शेतीमालांना बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.

नायगाव : दिवसागणीक कांद्याच्या भावात सुरु असलेल्या घसरणीमुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. कांद्याबरोबर सर्वच शेतीमालांना बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.
बाजारात सध्या कोबी, फ्लॉवर, टमाटे आदिंसह सर्वच भाजीपाला मातीमोल भावाने विकण्याची प्रसंगी फेकून देण्याची वेळ बळीराजावर येत आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वच शेतीमालास उत्पादन खर्चही हाती पडण्याइतका दर कोणत्याच पिकातून येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या सर्वच पिकांमध्ये शेतकर्‍यांना हमखास उत्पन्न मिळवून देणार्‍या कांद्याच्या दरातही चांगलीच घसरण सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर खर्च करुन प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या कांद्याला सध्या बाजारात ३५० ते ४५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. या भावाने शेतकर्‍यांनी पिकाच्या उत्पादनावर केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
कधी ग्राहकांच्या तर कधी उत्पादकांच्या डोळ्यातून पाणी काढणार्‍या कांद्याचा विषय कायमच चर्चिला जातो. मात्र, अनेकदा कमी बाजार भावामुळे शेतकर्‍यांचा रास्ता रोको होवूनही शासन याकडे गांभिर्याने बघत नाही. कधीतरी कांदा भावात सुधारणा झालीत तर सर्व प्रसार माध्यमांद्वारे ग्राहकांच्या डोळ्यातून कांद्याचे काढलेले पाणी दाखवले जाते व शासनही अशावेळी तात्काळ याची दखल घेवून बाजारभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखते. कोणतेही शासन कधीच शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेत नसल्याचा आजपर्यंतचा उत्पादकांचा अनुभव आहे. सध्या सर्वच शेतीमालास बाजारात मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे शेतकरी वर्गात मोठी कोंडी निर्माण झाली आहे. (वार्ताहर) (जोड)(1)