शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

पीक कर्जाच्या विलंबाने शेतकरी अडचणीत शेतकर्‍यांचा आरोप : जिल्हा बँकेकडून सचिवांकडून याद्यांची प्रतीक्षा

By admin | Updated: April 8, 2016 00:03 IST

जळगाव : राज्यातील खरीप व रब्बी हंगामामध्ये ५० टक्के पेक्षा कमी हंगामी पैसेवारी आलेल्या गावांमध्ये दृष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याबाबत शासनाने आदेश दिले असताना जिल्हा बँकेकडून विविध कार्यकारी सोसायटीला कोणत्याही सूचना नसल्याने पीककर्जाच्या वाटपाला विलंब होत असल्याच्या तक्रारी कृउबाचे माजी संचालक शरद लाठी यांनी केली आहे.

जळगाव : राज्यातील खरीप व रब्बी हंगामामध्ये ५० टक्के पेक्षा कमी हंगामी पैसेवारी आलेल्या गावांमध्ये दृष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याबाबत शासनाने आदेश दिले असताना जिल्हा बँकेकडून विविध कार्यकारी सोसायटीला कोणत्याही सूचना नसल्याने पीककर्जाच्या वाटपाला विलंब होत असल्याच्या तक्रारी कृउबाचे माजी संचालक शरद लाठी यांनी केली आहे.
३१ मार्च रोजी शेतकर्‍यांनी कर्जाची परतफेड केल्यानंतर जिल्हा बँकेतर्फे विविध कार्यकारी सोसायटीच्या मार्फत १ एप्रिलपासून पीक कर्जाच्या वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येत असते. मात्र यावर्षी आठवडा उलटला असला तरी पीककर्जाच्या वाटपबाबत तसेच कर्जाच्या पुर्नगठनाबाबत जिल्हा बँकेकडून कोणतीही सूचना विविध कार्यकारी सोसायट्यांना पाठविण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

जिल्हा बँकेला याद्यांची प्रतीक्षा
३१ मार्चपर्यंत कर्जवसुली झाल्यानंतर जिल्हा बँकेकडून व्याज परताव्याच्या दोन व अडीच टक्क्यांच्या शासन परताव्याच्या याद्या सचिवांकडून मागविण्यात आल्या आहेत. तसेच कर्जदार शेतकर्‍यांची विविध कार्यकारी सोसायटी व जिल्हा बँक शाखा या दोघांची खातेबाकी जुळविण्याची सूचना बँकेतर्फे गटसचिवांना देण्यात आली आल्याचे जिल्हा बँक सूत्रांनी सांगितले.

कोट
जिल्हा बँकेतर्फे मागेल त्या शेतकर्‍याला पीक कर्ज देण्यात येणार आहे. काही ठिकाणी पीक कर्जाच्या वाटपाला सुरुवात झाली आहे. उर्वरित ठिकाणी लवकरच पीककर्ज वाटप होणार आहे. ज्या जमिनीवर जो पिकपेरा आहे त्यावर कर्ज देण्यात येणार आहे. त्यातच विकासो व जिल्हा बँक शाखा यांचे खाते जुळविण्याची सूचना सचिवांना देण्यात आली आहे.
-जितेंद्र देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा बँक, जळगाव.


६२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा पीक कर्ज वितरणाबाबत दाखला मिळालेला नाही. ४० वर्षांपासून आपण पीक कर्जाची नियमित फेड करीत आहोत. कर्ज मिळत नसल्यास काय करावे.
-शरद लाठी, जळगाव.

यावर्षी जिल्हा बँकेने शेतातील पिकाचे क्षेत्र पाहून कर्ज वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कमी कर्ज मिळणार आहे. एप्रिलचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. मात्र अद्याप कर्ज वितरणाबाबत आदेश नाहीत.
-सुधाकर सूर्यवंशी, चेअरमन, आमोदे बुद्रुक, ता.जळगाव.