शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

देशभरातील शेतकरी नेते ‘बुढा’ गावात

By admin | Updated: July 5, 2017 20:22 IST

शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती आणि उत्पादन खर्चावर दीडपट दाम मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे उद्या ६ जुलै

- रमाकांत पाटील/ ऑनलाइन लोकमत

बुढा (मध्यप्रदेश), दि. 05 -  शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती आणि उत्पादन खर्चावर दीडपट दाम मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे उद्या ६ जुलै पासून मध्यप्रदेशातील मंदसौर ते दिल्ली अशी किसान मुक्ती यात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील शेतकरी नेते बुढा गावात एकत्र झाले आहे. गेल्या महिनाभरापासून देशभरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विविध ठिकाणी संतापाचे वातावरण आहे. विशेषत: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संप आणि मध्यप्रदेशातील पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेला गोळीबार या पार्श्वभूमीवर देशभरातील शेतकरी संघटनांनी एकत्र येवून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची स्थापना केली आहे. या समितीतर्फे ६ ते १८ जुलै या दरम्यान मंदसौर ते दिल्ली किसान मुक्ती यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी पूर्वसंध्येला या सर्व शेतकरी संघटनांचे नेते बुढा या गावात मुक्कामी आले आहे. यात महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे मुख्य संयोजक व्ही.एम.सिंग, आॅल इंडिया किसान सभेचे हन्नान मौला, जन आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक माजी आमदार सुनिलम्, जय किसान आंदोलनाचे नेते योगेंद्र यादव यांच्यासह विविध संघटनांचा नेत्यांचा समावेश आहे.- या यात्रेच्या पूर्वसंध्येलाच मध्यप्रदेशातील मुख्य शेतकरी नेते सुनिलम् यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.श्रद्धांजली सभेला परवानगी नाकारली...- गेल्या महिन्यात मंदसौर येथे शेतकरी आंदोलनावर मध्यप्रदेश पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर किसान मुक्ती यात्रेची सुुरुवात मंदसौरपासून होत आहे. सुरुवातीला बही चौपाटीवर ६ जुलैला सकाळी ११ वाजता श्रद्धांजली सभा होणार होती. त्यास मध्यप्रदेश पोलिसांनी परवानगी नाकारली असून सर्वत्र चोख बंदोबस्त आहे. दरम्यान सरकारचा विरोध असला तरी श्रद्धांजली सभा होणारच असा निर्धार शेतकरी नेत्यांनी घेतला आहे.