शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

मध्य प्रदेशात शेतकरी आंदोलनाची धग कायम

By admin | Updated: June 8, 2017 00:17 IST

मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात संचारबंदी लागू असूनही शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन बुधवारीही सुरूच राहिले.

भोपाळ/इंदोर : मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात संचारबंदी लागू असूनही शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन बुधवारीही सुरूच राहिले. संतापाने धुमसत असलेल्या आंदोलकांनी बँका आणि कारखान्यांसह अनेक वाहने पेटवून दिली. शेतकऱ्यांची समजूत काढण्यास गेलेले जिल्हाधिकारी स्वतंत्रकुमार सिंह यांनाही आंदोलकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. नीमच जिल्ह्यात पोलीस ठाण्यात उभी असलेली वाहने पेटवून देण्यात आली. शेतकऱ्यांनी सरकारवरील राग रेल्वे रुळावर काढत मंदसौरजवळ रेल्वे रूळ उखडून टाकले. राज्यातील हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा आजही बंद होती. मंदसौर शहर आणि पिपलिया मंडीतील संचारबंदी बुधवारी कायम होती. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे कुटुंबीय आणि शेतकऱ्यांनी बरखेडा पंत येथे रास्ता रोको आंदोलन केले. दुसरीकडे राष्ट्रीय किसान मजदूर संघ आणि काँग्रेसनेही बुधवारी बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. संचारबंदी लागू असूनही शेतकऱ्यांनी पिपलिया मंडी येथील कारखाना पेटवून दिला, तसेच बही चौपाटी परिसरात तीन मोठ्या वाहनांना आगीच्या हवाली केले. जिल्ह्याच्या कयामपूर येथे शेतकऱ्यांनी युको, जिल्हा सहकारी बँक आणि कृषक सेवा सहकारी समितीच्या शाखांना आगीच्या हवाली केले. शेतमालाला रास्त भाव मिळावा, यांसह विविध मागण्यांसाठी मध्यप्रदेशातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मंदसौर जिल्ह्यात आंदोलकांनी ग्रामपंचायत कार्यालयही पेटवून दिले. बरखेडा पंत गावातून जाणारा मार्गही रोखला. गोळीबारात मृृत्युमुखी पडलेला विद्यार्थी अभिषेक पाटीदार याचा मृतदेह रस्त्यावर ठेवून शेतकऱ्यांनी आंदोलन केले.>८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा मंगळवारी झालेल्या गोळीबारात ५ नव्हे, तर ८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, असा दावा राष्ट्रीय किसान मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार शर्मा यांनी इंदोरमध्ये एका पत्रकार परिषदेत केला आहे. या वेळी किसान युनियन, भारतीय किसान युनियनसह अन्य संघटनांच्या नेत्यांनीही हाच दावा केला. शेतकऱ्यांवरील कारवाई रोखण्यात आली नाही तर शेतकरी जेलभरो आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंंह चौहान यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.इंदोरहून भोपाळला येणाऱ्या बससह या मार्गावरील दहापेक्षा अधिक वाहने आंदोलकांनी पेटवून दिली. तर देवासमध्ये हाट पिपल्लया ठाण्यावर धडक देऊन शेतकऱ्यांनी येथील वाहने जाळली. यानंतर आंदोलक नेवली फाट्याकडे गेले. तेथेही अनेक वाहनांची तोडफोड केली. याशिवाय या भागातून जाणारे दहापेक्षा अधिक वाहने जाळली आणि दगडफेक केली. मंदसौरच्या पिपल्यामंडी येथेही आंदोलकांनी अनेक वाहनांना आगीच्या हवाली केले.