शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलन : मध्य प्रदेशात केंद्रानं पाठवले 1100 निमलष्करी दलाचे जवान

By admin | Updated: June 8, 2017 09:07 IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यात उफाळून आलेला हिंसाचार रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यात उफाळून आलेला हिंसाचार रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत, मात्र परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत चाललं आहे.  मंगळवारी (6 जून) पोलिसांच्या गोळीबारात 5 आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलन हिंसक झाले आहे. शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटद्वारे शेतक-यांना शांतता राखण्याचं आवाहन केले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मध्य प्रदेशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली होती. 
 
केंद्र सरकारने मध्य प्रदेशातील मंदसौरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निमलष्करी दलाचे जवळपास 1100 जवान पाठवण्यात आले आहेत.  तसंच केंद्र सरकारनं बुधवारी राज्य सरकारकडून मध्य प्रदेशातील परिस्थितीबाबत अहवालही मागवला आहे. दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी (7 जून) पोलिसांच्या गोळीबारात मृत पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मंदसौर येथे रवाना झाले आहेत. 
 
मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराबाबत बोलताना राहुल म्हणाले की, हे सरकार आमच्या देशातील शेतकऱ्यांशी युद्ध करीत आहे. भाजपाच्या नव्या भारतात आपल्या हक्काची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या बदल्यात गोळ्या मिळत आहेत, असे ट्विट राहुल यांनी केलं होतं. 
 
बुधवारी येथील परिस्थिती अधिक गंभीर झाली कारण शेतक-यांच्या आंदोलनाचे लोण राज्यातील अन्य भागांमध्येही पसरले. 
बुधवारी शेतक-यांनी देवासमधील पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला आणि तेथील वाहनं पेटवून दिली. तर भोपाळ-इंदुरदरम्यान दोन बससहीत जवळपास 10 हून अधिक वाहनांनादेखील शेतक-यांनी आग लावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतक-यांनी पिपलिया पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला, जेथे त्यांनी उग्र स्वरुपात आपला संताप व्यक्त करीत तेथील वाहनांना आगल लावली. यानंतर आंदोलनकर्ते शेतकरी नेवली फाटाकडे वळले, व तेथेही मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली.
 
दरम्यान, केंद्रीय मंत्री व्यकंय्या नायडू यांनी शेतक-यांच्या या आंदोलनाला काँग्रेस पार्टीला जबाबदार धरले. मध्य प्रदेशातील मंदसौरमधील शेतक-यांच्या आंदोलनाच्या नावावर काँग्रेस पार्टी हिंसाचार घडवत असल्याचा आरोप नायडू यांनी बुधवारी केला.
काँग्रेस या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहे. मला फक्त त्यांना हेच सांगायचे आहे की त्यांनी यांचं राजकारण करू नये आणि शेतकरी आंदोलनाच्या नावावर हिंसा भडकवू नये, कारण याचे परिणाम त्यांच्यावर उलटू शकतात, असाही इशारा नायडू यांनी दिला.
 
दरम्यान, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदक करण्याची घोषणा केली. ट्विटर आर्थिक मदतीची घोषणा करताना अखिलेश यांनी भाजपावर निशाणादेखील साधला. ""उत्तर प्रदेशात कर्जमाफीच्या नावाखाली विश्वासघात, महाराष्ट्रातील शेतकरी संपावर. मध्य प्रदेश (मंदसौर)मध्ये गोळीबार करुन 5 शेतक-यांची हत्या"", असे ट्विट करत अखिलेश यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 
 
दरम्यान, गृहमंत्री भूपेंद्रसिंह यांनी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचा इन्कार केला आहे.