शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
3
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
4
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
5
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
6
अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
7
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
8
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
9
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
10
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
12
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
13
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
14
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
17
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
18
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
19
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
20
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

शेतकरी आंदोलन : मध्य प्रदेशात केंद्रानं पाठवले 1100 निमलष्करी दलाचे जवान

By admin | Updated: June 8, 2017 09:07 IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यात उफाळून आलेला हिंसाचार रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यात उफाळून आलेला हिंसाचार रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत, मात्र परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत चाललं आहे.  मंगळवारी (6 जून) पोलिसांच्या गोळीबारात 5 आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलन हिंसक झाले आहे. शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटद्वारे शेतक-यांना शांतता राखण्याचं आवाहन केले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मध्य प्रदेशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली होती. 
 
केंद्र सरकारने मध्य प्रदेशातील मंदसौरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निमलष्करी दलाचे जवळपास 1100 जवान पाठवण्यात आले आहेत.  तसंच केंद्र सरकारनं बुधवारी राज्य सरकारकडून मध्य प्रदेशातील परिस्थितीबाबत अहवालही मागवला आहे. दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी (7 जून) पोलिसांच्या गोळीबारात मृत पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मंदसौर येथे रवाना झाले आहेत. 
 
मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराबाबत बोलताना राहुल म्हणाले की, हे सरकार आमच्या देशातील शेतकऱ्यांशी युद्ध करीत आहे. भाजपाच्या नव्या भारतात आपल्या हक्काची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या बदल्यात गोळ्या मिळत आहेत, असे ट्विट राहुल यांनी केलं होतं. 
 
बुधवारी येथील परिस्थिती अधिक गंभीर झाली कारण शेतक-यांच्या आंदोलनाचे लोण राज्यातील अन्य भागांमध्येही पसरले. 
बुधवारी शेतक-यांनी देवासमधील पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला आणि तेथील वाहनं पेटवून दिली. तर भोपाळ-इंदुरदरम्यान दोन बससहीत जवळपास 10 हून अधिक वाहनांनादेखील शेतक-यांनी आग लावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतक-यांनी पिपलिया पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला, जेथे त्यांनी उग्र स्वरुपात आपला संताप व्यक्त करीत तेथील वाहनांना आगल लावली. यानंतर आंदोलनकर्ते शेतकरी नेवली फाटाकडे वळले, व तेथेही मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली.
 
दरम्यान, केंद्रीय मंत्री व्यकंय्या नायडू यांनी शेतक-यांच्या या आंदोलनाला काँग्रेस पार्टीला जबाबदार धरले. मध्य प्रदेशातील मंदसौरमधील शेतक-यांच्या आंदोलनाच्या नावावर काँग्रेस पार्टी हिंसाचार घडवत असल्याचा आरोप नायडू यांनी बुधवारी केला.
काँग्रेस या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहे. मला फक्त त्यांना हेच सांगायचे आहे की त्यांनी यांचं राजकारण करू नये आणि शेतकरी आंदोलनाच्या नावावर हिंसा भडकवू नये, कारण याचे परिणाम त्यांच्यावर उलटू शकतात, असाही इशारा नायडू यांनी दिला.
 
दरम्यान, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदक करण्याची घोषणा केली. ट्विटर आर्थिक मदतीची घोषणा करताना अखिलेश यांनी भाजपावर निशाणादेखील साधला. ""उत्तर प्रदेशात कर्जमाफीच्या नावाखाली विश्वासघात, महाराष्ट्रातील शेतकरी संपावर. मध्य प्रदेश (मंदसौर)मध्ये गोळीबार करुन 5 शेतक-यांची हत्या"", असे ट्विट करत अखिलेश यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 
 
दरम्यान, गृहमंत्री भूपेंद्रसिंह यांनी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचा इन्कार केला आहे.