शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलन : मध्य प्रदेशात केंद्रानं पाठवले 1100 निमलष्करी दलाचे जवान

By admin | Updated: June 8, 2017 09:07 IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यात उफाळून आलेला हिंसाचार रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यात उफाळून आलेला हिंसाचार रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत, मात्र परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत चाललं आहे.  मंगळवारी (6 जून) पोलिसांच्या गोळीबारात 5 आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलन हिंसक झाले आहे. शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटद्वारे शेतक-यांना शांतता राखण्याचं आवाहन केले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मध्य प्रदेशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली होती. 
 
केंद्र सरकारने मध्य प्रदेशातील मंदसौरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निमलष्करी दलाचे जवळपास 1100 जवान पाठवण्यात आले आहेत.  तसंच केंद्र सरकारनं बुधवारी राज्य सरकारकडून मध्य प्रदेशातील परिस्थितीबाबत अहवालही मागवला आहे. दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी (7 जून) पोलिसांच्या गोळीबारात मृत पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मंदसौर येथे रवाना झाले आहेत. 
 
मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराबाबत बोलताना राहुल म्हणाले की, हे सरकार आमच्या देशातील शेतकऱ्यांशी युद्ध करीत आहे. भाजपाच्या नव्या भारतात आपल्या हक्काची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या बदल्यात गोळ्या मिळत आहेत, असे ट्विट राहुल यांनी केलं होतं. 
 
बुधवारी येथील परिस्थिती अधिक गंभीर झाली कारण शेतक-यांच्या आंदोलनाचे लोण राज्यातील अन्य भागांमध्येही पसरले. 
बुधवारी शेतक-यांनी देवासमधील पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला आणि तेथील वाहनं पेटवून दिली. तर भोपाळ-इंदुरदरम्यान दोन बससहीत जवळपास 10 हून अधिक वाहनांनादेखील शेतक-यांनी आग लावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतक-यांनी पिपलिया पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला, जेथे त्यांनी उग्र स्वरुपात आपला संताप व्यक्त करीत तेथील वाहनांना आगल लावली. यानंतर आंदोलनकर्ते शेतकरी नेवली फाटाकडे वळले, व तेथेही मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली.
 
दरम्यान, केंद्रीय मंत्री व्यकंय्या नायडू यांनी शेतक-यांच्या या आंदोलनाला काँग्रेस पार्टीला जबाबदार धरले. मध्य प्रदेशातील मंदसौरमधील शेतक-यांच्या आंदोलनाच्या नावावर काँग्रेस पार्टी हिंसाचार घडवत असल्याचा आरोप नायडू यांनी बुधवारी केला.
काँग्रेस या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहे. मला फक्त त्यांना हेच सांगायचे आहे की त्यांनी यांचं राजकारण करू नये आणि शेतकरी आंदोलनाच्या नावावर हिंसा भडकवू नये, कारण याचे परिणाम त्यांच्यावर उलटू शकतात, असाही इशारा नायडू यांनी दिला.
 
दरम्यान, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदक करण्याची घोषणा केली. ट्विटर आर्थिक मदतीची घोषणा करताना अखिलेश यांनी भाजपावर निशाणादेखील साधला. ""उत्तर प्रदेशात कर्जमाफीच्या नावाखाली विश्वासघात, महाराष्ट्रातील शेतकरी संपावर. मध्य प्रदेश (मंदसौर)मध्ये गोळीबार करुन 5 शेतक-यांची हत्या"", असे ट्विट करत अखिलेश यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 
 
दरम्यान, गृहमंत्री भूपेंद्रसिंह यांनी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचा इन्कार केला आहे.