शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या करणारे शेतकरी भेकड !

By admin | Updated: April 30, 2015 02:13 IST

आत्महत्या करणारे शेतकरी भेकड आणि गुन्हेगार असतात, असे वादग्रस्त अणि असंवेदनशील वक्तव्य हरियाणाचे कृषिमंत्री ओ. पी. धनकर यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

हरियाणाच्या कृषिमंत्र्यांचा जावईशोध : भाजपाच्या आणखी एका मंत्र्याचा वाचाळपणाचंदीगड : आत्महत्या करणारे शेतकरी भेकड आणि गुन्हेगार असतात, असे वादग्रस्त अणि असंवेदनशील वक्तव्य हरियाणाचे कृषिमंत्री आणि भाजपाच्या शेतकरी मंचचे माजी अध्यक्ष ओ. पी. धनकर यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींकडून वारंवार ‘सांभाळून बोला’ अशी ताकीद दिली जात असतानाही या पक्षाच्या नेत्यांचा वाचाळपणा अद्याप थांबायचे नाव नाही, हेही यातून अधोरेखित झाले. धनकर यांच्यावर टीकेची झोड उठली असून, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही बुधवारी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला.काँग्रेसने धनकर यांच्या वक्तव्याची निंदा करताना त्यांना मंत्रिपदावरून हटविण्याची मागणी केली आहे. कृषिमंत्री मात्र आपल्या विधानावर कायम आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विनाकारण गाजावाजा केला जातो, असे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी दिल्लीत ‘आप’च्या रॅलीत गजेंद्रसिंह नामक शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येचा हवाला दिला. धनकर यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना भारतीय कायद्यानुसार आत्महत्या करणे गुन्हा आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळते आणि हे ओझे आपली पत्नी व निष्पाप मुलांवर टाकत असते. हे लोक फार भेकड असतात, असे वक्तव्य केले होते. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीबाबत विचारले असता कृषिमंत्री म्हणाले, की सरकार अशा भेकडांच्या (आत्महत्या करणारे) आणि गुन्हेगारांच्या पाठीशी उभे राहू शकत नाही.भारतीय कायद्यानुसार आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती ही जबाबदाऱ्यांपासून दूर पळते आणि हे ओझे आपली पत्नी व निष्पाप मुलांवर टाकत असते. हे लोक फार भेकड असतात. -धनकरशेतकरी पिकवितात ते ‘मेक इन इंडिया’ नाही का ?काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मैदानात उतरले असून, केंद्र सरकारवर त्यांनी हल्लाबोल सुरू केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेवर टीका करताना या देशातील शेतकरी जे पिकवितात ते ‘मेक इन इंडिया’ नाही का, असा सवाल त्यांनी बुधवारी लोकसभेत उपस्थित केला. सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असून, त्यांच्या वेदनांकडे सरकार डोळझाक करीत असल्याचा आरोपही गांधी यांनी केला.