शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

आत्महत्या करणारे शेतकरी भेकड !

By admin | Updated: April 30, 2015 02:13 IST

आत्महत्या करणारे शेतकरी भेकड आणि गुन्हेगार असतात, असे वादग्रस्त अणि असंवेदनशील वक्तव्य हरियाणाचे कृषिमंत्री ओ. पी. धनकर यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

हरियाणाच्या कृषिमंत्र्यांचा जावईशोध : भाजपाच्या आणखी एका मंत्र्याचा वाचाळपणाचंदीगड : आत्महत्या करणारे शेतकरी भेकड आणि गुन्हेगार असतात, असे वादग्रस्त अणि असंवेदनशील वक्तव्य हरियाणाचे कृषिमंत्री आणि भाजपाच्या शेतकरी मंचचे माजी अध्यक्ष ओ. पी. धनकर यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींकडून वारंवार ‘सांभाळून बोला’ अशी ताकीद दिली जात असतानाही या पक्षाच्या नेत्यांचा वाचाळपणा अद्याप थांबायचे नाव नाही, हेही यातून अधोरेखित झाले. धनकर यांच्यावर टीकेची झोड उठली असून, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही बुधवारी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला.काँग्रेसने धनकर यांच्या वक्तव्याची निंदा करताना त्यांना मंत्रिपदावरून हटविण्याची मागणी केली आहे. कृषिमंत्री मात्र आपल्या विधानावर कायम आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विनाकारण गाजावाजा केला जातो, असे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी दिल्लीत ‘आप’च्या रॅलीत गजेंद्रसिंह नामक शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येचा हवाला दिला. धनकर यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना भारतीय कायद्यानुसार आत्महत्या करणे गुन्हा आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळते आणि हे ओझे आपली पत्नी व निष्पाप मुलांवर टाकत असते. हे लोक फार भेकड असतात, असे वक्तव्य केले होते. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीबाबत विचारले असता कृषिमंत्री म्हणाले, की सरकार अशा भेकडांच्या (आत्महत्या करणारे) आणि गुन्हेगारांच्या पाठीशी उभे राहू शकत नाही.भारतीय कायद्यानुसार आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती ही जबाबदाऱ्यांपासून दूर पळते आणि हे ओझे आपली पत्नी व निष्पाप मुलांवर टाकत असते. हे लोक फार भेकड असतात. -धनकरशेतकरी पिकवितात ते ‘मेक इन इंडिया’ नाही का ?काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मैदानात उतरले असून, केंद्र सरकारवर त्यांनी हल्लाबोल सुरू केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेवर टीका करताना या देशातील शेतकरी जे पिकवितात ते ‘मेक इन इंडिया’ नाही का, असा सवाल त्यांनी बुधवारी लोकसभेत उपस्थित केला. सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असून, त्यांच्या वेदनांकडे सरकार डोळझाक करीत असल्याचा आरोपही गांधी यांनी केला.