शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या करणारे शेतकरी भेकड !

By admin | Updated: April 30, 2015 02:13 IST

आत्महत्या करणारे शेतकरी भेकड आणि गुन्हेगार असतात, असे वादग्रस्त अणि असंवेदनशील वक्तव्य हरियाणाचे कृषिमंत्री ओ. पी. धनकर यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

हरियाणाच्या कृषिमंत्र्यांचा जावईशोध : भाजपाच्या आणखी एका मंत्र्याचा वाचाळपणाचंदीगड : आत्महत्या करणारे शेतकरी भेकड आणि गुन्हेगार असतात, असे वादग्रस्त अणि असंवेदनशील वक्तव्य हरियाणाचे कृषिमंत्री आणि भाजपाच्या शेतकरी मंचचे माजी अध्यक्ष ओ. पी. धनकर यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींकडून वारंवार ‘सांभाळून बोला’ अशी ताकीद दिली जात असतानाही या पक्षाच्या नेत्यांचा वाचाळपणा अद्याप थांबायचे नाव नाही, हेही यातून अधोरेखित झाले. धनकर यांच्यावर टीकेची झोड उठली असून, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही बुधवारी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला.काँग्रेसने धनकर यांच्या वक्तव्याची निंदा करताना त्यांना मंत्रिपदावरून हटविण्याची मागणी केली आहे. कृषिमंत्री मात्र आपल्या विधानावर कायम आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विनाकारण गाजावाजा केला जातो, असे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी दिल्लीत ‘आप’च्या रॅलीत गजेंद्रसिंह नामक शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येचा हवाला दिला. धनकर यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना भारतीय कायद्यानुसार आत्महत्या करणे गुन्हा आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळते आणि हे ओझे आपली पत्नी व निष्पाप मुलांवर टाकत असते. हे लोक फार भेकड असतात, असे वक्तव्य केले होते. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीबाबत विचारले असता कृषिमंत्री म्हणाले, की सरकार अशा भेकडांच्या (आत्महत्या करणारे) आणि गुन्हेगारांच्या पाठीशी उभे राहू शकत नाही.भारतीय कायद्यानुसार आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती ही जबाबदाऱ्यांपासून दूर पळते आणि हे ओझे आपली पत्नी व निष्पाप मुलांवर टाकत असते. हे लोक फार भेकड असतात. -धनकरशेतकरी पिकवितात ते ‘मेक इन इंडिया’ नाही का ?काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मैदानात उतरले असून, केंद्र सरकारवर त्यांनी हल्लाबोल सुरू केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेवर टीका करताना या देशातील शेतकरी जे पिकवितात ते ‘मेक इन इंडिया’ नाही का, असा सवाल त्यांनी बुधवारी लोकसभेत उपस्थित केला. सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असून, त्यांच्या वेदनांकडे सरकार डोळझाक करीत असल्याचा आरोपही गांधी यांनी केला.