शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या कर्जाच्या ओझ्यामुळेच

By admin | Updated: February 6, 2017 03:51 IST

निसर्गाची अवकृपा, शेतमालाला भाव न मिळाल्याने येणारे सुलतानी संकट अशा कचाट्यात अडकून कर्जाच्या ओझ्याखाली पिचल्यानेच शेतकरी आत्महत्या करत आहेत

हरिश गुप्ता, नवी दिल्लीनिसर्गाची अवकृपा, शेतमालाला भाव न मिळाल्याने येणारे सुलतानी संकट अशा कचाट्यात अडकून कर्जाच्या ओझ्याखाली पिचल्यानेच शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशी कबुली केंद्र सरकारने दिली आहे. महाराष्ट्रातील आत्महत्येची परिस्थिती भीषण असून, दोन वर्षांत आठ हजार शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती राज्यसभेत सादर करण्यात आली आहे.

भाजपाचेच खासदार अजय संचेती यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, कृषी व शेतकरी कल्याण खात्याचे राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले की, २०१५ मध्ये शेतकरी आणि शेतमजूर मिळून ४२९१ जणांनी आत्महत्या केली. यात ३,०३० शेतकरी तर शेतमजूर १,२६१ होते. ८० टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्या (विशेषत: महाराष्ट्रात) या कर्ज, बँकांकडून घेतलेले कर्ज (खासगी सावकाराकडून नाही) न फेडता आल्यामुळे झाल्या का, असे विचारले असता, रुपाला यांनी ‘वस्तुस्थिती तशीच आहे,’ असे मान्य केले. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची अनेक कारणे आहेत व ती एकमेकांमध्ये गुंतलेलीही आहेत. त्यात कर्जफेड न होणे, पीक न येणे, दुष्काळ आणि वैयक्तिक कर्ज ही आहेत. सरकारने बहुधा प्रथमच असेही कबूल केले की, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांतील बहुतेक जणांनी बँका आणि आर्थिक संस्थांकडून कर्ज घेतले होते, खासगी सावकाराकडून नाही. पुरुषोत्तम रुपाला यांनी संचेती यांना सांगितले की, ‘आत्महत्या केलेल्या ३,०३० शेतकऱ्यांपैकी १,२९३ शेतकऱ्यांनी कर्जफेड न झाल्यामुळे, तर ७९५ शेतकऱ्यांनी शेतीशी संबंधित इतर कारणांनी आणि ९४२ शेतकऱ्यांनी अन्य कारणांनी आत्महत्या केली. ही अन्य कारणे कोणती, हे मंत्र्यांनी स्पष्ट केले नाही. आत्महत्या केलेल्या १,२९३ शेतकऱ्यांपैकी १,२३७ शेतकऱ्यांनी अर्थसंस्थांकडून घेतलेल्या कर्जामुळे आत्महत्या केली. फक्त १४ शेतकऱ्यांनी खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जामुळे आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या ४२ शेतकऱ्यांनी आर्थिक संस्था आणि खासगी सावकार अशा दोघांकडूनही कर्ज घेतले होते, असे रुपाला म्हणाले. म्हणे, केंद्र योजना राबवतेयशेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मृदा आरोग्य कार्ड (एसएचसी), नीम कोटेडे युरिया, परंपरागत कृषी विकास योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय कृषी बाजार योजना, पंतप्रधान पीक विमा योजना आदी वेगवेगळ््या योजना सरकार राबवत आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत खरीप हंगामात १,४१,८८३ कोटी रुपयांनी २८१.६१ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता आल्याचेही रुपाला यांनी सांगितले.