शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

शेतकरी कर्जमाफी उत्तर प्रदेशपुरतीच

By admin | Updated: March 19, 2017 00:21 IST

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या वतीने देण्यात आलेले शेतकरी कर्जमाफी योजनेचे वचन हे राष्ट्रीय धोरण नसून, त्या राज्यापुरतेच मर्यादित होते, असे स्पष्टीकरण

हैदराबाद : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या वतीने देण्यात आलेले शेतकरी कर्जमाफी योजनेचे वचन हे राष्ट्रीय धोरण नसून, त्या राज्यापुरतेच मर्यादित होते, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवरून सरकारला लोकसभेत घेरण्याची तयारी विरोधकांनी चालविली असताना नायडू यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्यात येईल, अशी घोषणा भाजपने उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत दिले होते. तेथे सरकार स्थापन झाल्यानंतर या घोषणेच्या अंमलबजावणीवर सकारात्मक विचार केला जाईल. ही घोषणा उत्तर प्रदेशपुरतीच मर्यादित होती. हे सरकारचे राष्ट्रीय धोरण नाही.लोकसभेतील एका चर्चेत विरोधी पक्ष सदस्यांनी सरसकट सर्व देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. केवळ उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला त्यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्या थांबविण्यासाठी संपूर्ण देशात कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती.केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले की, कर्जमाफी ही राज्याच्या वित्तीय स्थितीवर अवलंबून आहे. प्रत्येक राज्य याबाबत निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. (वृत्तसंस्था)दक्षिणेकडील राज्यांबाबत भेदभावप्रसिद्ध तेलुगू अभिनेते आणि जन सेनेचे संस्थापक पवन कल्याण यांनी केंद्र सरकारवर भेदभावाचा आरोप केला होता. सरकार उत्तरेतील राज्ये आणि दक्षिणेतील राज्ये यांच्यात भेदभाव करीत असून, उत्तरेतील राज्यांना झुकते माप देत आहे, असे पवन कल्याण यांनी म्हटले होते. पवन कल्याण यांचा थेट उल्लेख न करता, नायडू यांनी सरकारची भूमिका मांडली.