शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शेतकरी कर्जमाफी उत्तर प्रदेशपुरतीच

By admin | Updated: March 19, 2017 00:21 IST

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या वतीने देण्यात आलेले शेतकरी कर्जमाफी योजनेचे वचन हे राष्ट्रीय धोरण नसून, त्या राज्यापुरतेच मर्यादित होते, असे स्पष्टीकरण

हैदराबाद : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या वतीने देण्यात आलेले शेतकरी कर्जमाफी योजनेचे वचन हे राष्ट्रीय धोरण नसून, त्या राज्यापुरतेच मर्यादित होते, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवरून सरकारला लोकसभेत घेरण्याची तयारी विरोधकांनी चालविली असताना नायडू यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्यात येईल, अशी घोषणा भाजपने उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत दिले होते. तेथे सरकार स्थापन झाल्यानंतर या घोषणेच्या अंमलबजावणीवर सकारात्मक विचार केला जाईल. ही घोषणा उत्तर प्रदेशपुरतीच मर्यादित होती. हे सरकारचे राष्ट्रीय धोरण नाही.लोकसभेतील एका चर्चेत विरोधी पक्ष सदस्यांनी सरसकट सर्व देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. केवळ उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला त्यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्या थांबविण्यासाठी संपूर्ण देशात कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती.केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले की, कर्जमाफी ही राज्याच्या वित्तीय स्थितीवर अवलंबून आहे. प्रत्येक राज्य याबाबत निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. (वृत्तसंस्था)दक्षिणेकडील राज्यांबाबत भेदभावप्रसिद्ध तेलुगू अभिनेते आणि जन सेनेचे संस्थापक पवन कल्याण यांनी केंद्र सरकारवर भेदभावाचा आरोप केला होता. सरकार उत्तरेतील राज्ये आणि दक्षिणेतील राज्ये यांच्यात भेदभाव करीत असून, उत्तरेतील राज्यांना झुकते माप देत आहे, असे पवन कल्याण यांनी म्हटले होते. पवन कल्याण यांचा थेट उल्लेख न करता, नायडू यांनी सरकारची भूमिका मांडली.