शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

गुरदासपूरमधील हल्ला हे गुप्तचर यंत्रणेचे अपयशच - काँग्रेस

By admin | Updated: July 27, 2015 16:26 IST

पंजाबमधील गुरदासपूर येथील दहशतवादी हल्ला ही सुरक्षा व्यवस्थेतील मोठी चूक असून या हल्ल्यातून गुप्तचर यंत्रणांचे अपयश दिसून येते अशा शब्दात काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २७ - पंजाबमधील गुरदासपूर येथील दहशतवादी हल्ला ही सुरक्षा व्यवस्थेतील मोठी चूक असून या हल्ल्यातून गुप्तचर यंत्रणांचे अपयश दिसून येते अशा शब्दात काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तर देशाच्या सीमा रेषा सील करणे हे केंद्र सरकारचे काम असल्याचे सांगत पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी मित्रपक्ष भाजपाला घरचा आहेर दिला आहे. 
सोमवारी पंजाबमधील गुरदासपूर येथे दहशतवादी हल्ला झाला असून अद्याप चकमक सुरु आहे. या हल्ल्यावरुन आता राजकारण सुरु झाले असून काँग्रेसने हल्ल्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गुरदासपूर येथे हल्ला करणारे दहशतवादी हे सीमा ओलांडून भारतात आल्याचे समजते, मग हे सुरक्षा व गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही का असा सवाल काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी उपस्थित केला. भारताला यावर चोख प्रत्युत्तर द्यावे, जेणेकरुन असे हल्ले करणा-यांची हिंमत कमी होईल. पंतप्रधानांनी यावर कठोर उपाययोजना राबवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील केंद्र सरकारवर टीका केली आहे. पंजाबमधील हल्ला हे केंद्र सरकारचे अपयश आहे,सरकार जबाबदारीपासून पळू शकत नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी ट्विटरव्दारे दिली आहे. एकीकडे विरोधकांककडून सरकारवर टीका होत असतानाच एनडीएतील घटकपक्ष अकाली दलाचे नेते व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनीदेखील केंद्र सरकारवर टीका केली. देशाच्या सीमा सील करणे हे सरकारचे काम आहे, घुसखोरी रोखण्यात सीमा सुरक्षा दलाला अपयश का आले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.