शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे सूर बदलले? पंतप्रधान शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू म्हटले पण...
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
4
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...
5
कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग
6
Virender Sehwag Birthday: 'नजफगडचा नवाब' 47 वर्षांचा! वीरेंद्र सेहवागचे 4 महारेकॉर्ड्स, जे आजपर्यंत कुणीच तोडू शकलं नाही!
7
NSE Holidays 2025: उद्या शेअर बाजारात कामकाज सुरू राहणार का? स्टॉक मार्केटला कधी-कधी आहेत सुट्ट्या, पाहा यादी
8
अभिनेता अंकुर वाढवे दुसऱ्यांदा झाला बाबा; फोटो पोस्ट करत म्हणाला, "यावेळी मुलगा..."
9
"अणुयुद्ध झाले असते, मी २००% टॅरिफ लावण्याची धमकी दिली म्हणून..."; भारत-पाकिस्तान युद्धावर काय म्हणाले ट्रम्प?
10
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
11
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
12
Laxmi Pujan 2025 Puja Vidhi: लक्ष्मीपूजन कसे करावे? पहा साहित्याची यादी, शुभ मुहूर्त आणि विधी
13
Bank FD मध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा २ लाखांपेक्षा अधिक व्याज; ही बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
14
न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया
15
Cough Syrup : "पप्पा, हॉस्पिटलवाले सोडत नाहीत, पोलिसांना बोलवा...", कफ सिरपमुळे मृत्यू, शेवटची इच्छा अपूर्ण
16
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
17
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
18
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
19
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
20
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...

गुरदासपूरमधील हल्ला हे गुप्तचर यंत्रणेचे अपयशच - काँग्रेस

By admin | Updated: July 27, 2015 16:26 IST

पंजाबमधील गुरदासपूर येथील दहशतवादी हल्ला ही सुरक्षा व्यवस्थेतील मोठी चूक असून या हल्ल्यातून गुप्तचर यंत्रणांचे अपयश दिसून येते अशा शब्दात काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २७ - पंजाबमधील गुरदासपूर येथील दहशतवादी हल्ला ही सुरक्षा व्यवस्थेतील मोठी चूक असून या हल्ल्यातून गुप्तचर यंत्रणांचे अपयश दिसून येते अशा शब्दात काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तर देशाच्या सीमा रेषा सील करणे हे केंद्र सरकारचे काम असल्याचे सांगत पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी मित्रपक्ष भाजपाला घरचा आहेर दिला आहे. 
सोमवारी पंजाबमधील गुरदासपूर येथे दहशतवादी हल्ला झाला असून अद्याप चकमक सुरु आहे. या हल्ल्यावरुन आता राजकारण सुरु झाले असून काँग्रेसने हल्ल्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गुरदासपूर येथे हल्ला करणारे दहशतवादी हे सीमा ओलांडून भारतात आल्याचे समजते, मग हे सुरक्षा व गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही का असा सवाल काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी उपस्थित केला. भारताला यावर चोख प्रत्युत्तर द्यावे, जेणेकरुन असे हल्ले करणा-यांची हिंमत कमी होईल. पंतप्रधानांनी यावर कठोर उपाययोजना राबवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील केंद्र सरकारवर टीका केली आहे. पंजाबमधील हल्ला हे केंद्र सरकारचे अपयश आहे,सरकार जबाबदारीपासून पळू शकत नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी ट्विटरव्दारे दिली आहे. एकीकडे विरोधकांककडून सरकारवर टीका होत असतानाच एनडीएतील घटकपक्ष अकाली दलाचे नेते व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनीदेखील केंद्र सरकारवर टीका केली. देशाच्या सीमा सील करणे हे सरकारचे काम आहे, घुसखोरी रोखण्यात सीमा सुरक्षा दलाला अपयश का आले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.