शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

गुरदासपूरमधील हल्ला हे गुप्तचर यंत्रणेचे अपयशच - काँग्रेस

By admin | Updated: July 27, 2015 16:26 IST

पंजाबमधील गुरदासपूर येथील दहशतवादी हल्ला ही सुरक्षा व्यवस्थेतील मोठी चूक असून या हल्ल्यातून गुप्तचर यंत्रणांचे अपयश दिसून येते अशा शब्दात काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २७ - पंजाबमधील गुरदासपूर येथील दहशतवादी हल्ला ही सुरक्षा व्यवस्थेतील मोठी चूक असून या हल्ल्यातून गुप्तचर यंत्रणांचे अपयश दिसून येते अशा शब्दात काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तर देशाच्या सीमा रेषा सील करणे हे केंद्र सरकारचे काम असल्याचे सांगत पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी मित्रपक्ष भाजपाला घरचा आहेर दिला आहे. 
सोमवारी पंजाबमधील गुरदासपूर येथे दहशतवादी हल्ला झाला असून अद्याप चकमक सुरु आहे. या हल्ल्यावरुन आता राजकारण सुरु झाले असून काँग्रेसने हल्ल्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गुरदासपूर येथे हल्ला करणारे दहशतवादी हे सीमा ओलांडून भारतात आल्याचे समजते, मग हे सुरक्षा व गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही का असा सवाल काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी उपस्थित केला. भारताला यावर चोख प्रत्युत्तर द्यावे, जेणेकरुन असे हल्ले करणा-यांची हिंमत कमी होईल. पंतप्रधानांनी यावर कठोर उपाययोजना राबवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील केंद्र सरकारवर टीका केली आहे. पंजाबमधील हल्ला हे केंद्र सरकारचे अपयश आहे,सरकार जबाबदारीपासून पळू शकत नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी ट्विटरव्दारे दिली आहे. एकीकडे विरोधकांककडून सरकारवर टीका होत असतानाच एनडीएतील घटकपक्ष अकाली दलाचे नेते व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनीदेखील केंद्र सरकारवर टीका केली. देशाच्या सीमा सील करणे हे सरकारचे काम आहे, घुसखोरी रोखण्यात सीमा सुरक्षा दलाला अपयश का आले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.