शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

निधीअभावी हदगावातील ८३ पाणंद रस्ते फसले

By admin | Updated: May 23, 2014 01:11 IST

सुनील चौरे , हदगाव तालुक्यात जनजागृती करून वेगवेगळे कार्यक्रम घेवून शेतकर्‍यांना पाणंद रस्त्यासाठी तयार केले व ८३ पाणंद रस्त्याची कामे युद्धपातळीवर सुरू केले़

सुनील चौरे , हदगाव तालुक्यात जनजागृती करून वेगवेगळे कार्यक्रम घेवून शेतकर्‍यांना पाणंद रस्त्यासाठी तयार केले व ८३ पाणंद रस्त्याची कामे युद्धपातळीवर सुरू केले़ परंतु एका वर्षापासून निधी अभावी हे रस्ते चिखलात रुतले असून शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत़ २००३ पासून पाणंद रस्त्याची संकल्पना समोर आली़ शेतातील माल वाहतूक करण्यासाठी, बी-बियाणे व खतपाणी शेतात नेण्यासाठी शेतकर्‍यांना हक्काचा रस्ता मिळावा, ही त्यामागची संकल्पना होती़ एक एकर जमीन पडीक राहिली तरी चालेल, परंतु धुर्‍यासाठी भांडणे करणार्‍या असंख्य शेतकर्‍यांना त्यांचा हक्काचा पक्का रस्ता मिळावा, यासाठी शासन स्तरावर पहिल्यांदाच प्रयत्न झाला़ यासाठी अनेक गावांनी चांगला प्रतिसाद दिला व पिढ्यान्पिढ्या सुरू असलेला त्रास कायमचा संपला़ ही संकल्पना इतर जिल्ह्याप्रमाणे नांदेडमध्येही राबविली़ हदगाव तालुक्याचे तत्कालीन एसडीएम राजेंद्र खंदारे यांनी तर विशेष प्रयत्न केले़ तालुक्यात ठिकठिकाणी कार्यशाळा घेतल्या़ रस्त्याचे महत्त्व समजावून सांगितले व शेतकर्‍यांची मानसिकताही तशी बनविली़ यासाठी लाखो रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला़ तालुक्यात ८३ रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू झाली़ यामध्ये २४ कामे बांधकाम विभागामार्फत करण्यात आली़ २४ कामे ग्रामपंचायतमार्फत करण्यात आली़ उर्वरित कामे लोकसहभागातून केली गेली़ काही गावात ही कामे १ कि़मी़ अंतराची होती़ तर काही ठिकाणी २ कि़मी़ अंतराची होती़ २३ फुट रुंदीचा हा रस्ता करण्यात आला़ दोन्ही बाजूंनी नाली काढून रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला़ त्यानंतर १२ मि़मी़ गिट्टीचा थर व त्यावर १६ मि़मी़ गिट्टीचा थर असे स्वरूप कामाचे होते़ त्यासाठी सरासरी १५ ते १८ लाख रुपये निधीचा अंदाज करण्यात आला़ अनेक ठिकाणी कामे झाली़ परंतु त्याचे मजबुतीकरण शिल्लक राहिले़ गतवर्षी पावसाळा जास्त झाल्यामुळे या रस्त्याची वाट लागली़ अनेक शेतकर्‍यांच्या शेतात पाणी घुसून पिकाचे बेहाल झाले़ त्याचीच पुनरावृत्ती यावर्षी होवू नये यासाठी या कामाचे मुल्यांकन होवून उर्वरित काम सुरू करणे आवश्यक आहे़ या कामाचे स्वरूप बदलल्यामुळे निधी अडकला असल्याचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी पी़बी़ दबणे, सांगितले़ कुशल कामगार ७० टक्के व अकुशल काम ३० टक्के असे झाले होते़या अर्धवट कामामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे़ अनेक शेतात तळे साचत आहेत़ तर अनेक ठिकाणी रस्ता बंद झाला आहे़ काम करणारे गुत्तेदारही त्रस्त आहेत़ शिल्लक राहिलेला निधी मिळाला तरी कामे मार्गी लागतील असे गावकर्‍यांमध्ये बोलले जात आहे़