शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी हदगावातील ८३ पाणंद रस्ते फसले

By admin | Updated: May 23, 2014 01:11 IST

सुनील चौरे , हदगाव तालुक्यात जनजागृती करून वेगवेगळे कार्यक्रम घेवून शेतकर्‍यांना पाणंद रस्त्यासाठी तयार केले व ८३ पाणंद रस्त्याची कामे युद्धपातळीवर सुरू केले़

सुनील चौरे , हदगाव तालुक्यात जनजागृती करून वेगवेगळे कार्यक्रम घेवून शेतकर्‍यांना पाणंद रस्त्यासाठी तयार केले व ८३ पाणंद रस्त्याची कामे युद्धपातळीवर सुरू केले़ परंतु एका वर्षापासून निधी अभावी हे रस्ते चिखलात रुतले असून शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत़ २००३ पासून पाणंद रस्त्याची संकल्पना समोर आली़ शेतातील माल वाहतूक करण्यासाठी, बी-बियाणे व खतपाणी शेतात नेण्यासाठी शेतकर्‍यांना हक्काचा रस्ता मिळावा, ही त्यामागची संकल्पना होती़ एक एकर जमीन पडीक राहिली तरी चालेल, परंतु धुर्‍यासाठी भांडणे करणार्‍या असंख्य शेतकर्‍यांना त्यांचा हक्काचा पक्का रस्ता मिळावा, यासाठी शासन स्तरावर पहिल्यांदाच प्रयत्न झाला़ यासाठी अनेक गावांनी चांगला प्रतिसाद दिला व पिढ्यान्पिढ्या सुरू असलेला त्रास कायमचा संपला़ ही संकल्पना इतर जिल्ह्याप्रमाणे नांदेडमध्येही राबविली़ हदगाव तालुक्याचे तत्कालीन एसडीएम राजेंद्र खंदारे यांनी तर विशेष प्रयत्न केले़ तालुक्यात ठिकठिकाणी कार्यशाळा घेतल्या़ रस्त्याचे महत्त्व समजावून सांगितले व शेतकर्‍यांची मानसिकताही तशी बनविली़ यासाठी लाखो रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला़ तालुक्यात ८३ रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू झाली़ यामध्ये २४ कामे बांधकाम विभागामार्फत करण्यात आली़ २४ कामे ग्रामपंचायतमार्फत करण्यात आली़ उर्वरित कामे लोकसहभागातून केली गेली़ काही गावात ही कामे १ कि़मी़ अंतराची होती़ तर काही ठिकाणी २ कि़मी़ अंतराची होती़ २३ फुट रुंदीचा हा रस्ता करण्यात आला़ दोन्ही बाजूंनी नाली काढून रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला़ त्यानंतर १२ मि़मी़ गिट्टीचा थर व त्यावर १६ मि़मी़ गिट्टीचा थर असे स्वरूप कामाचे होते़ त्यासाठी सरासरी १५ ते १८ लाख रुपये निधीचा अंदाज करण्यात आला़ अनेक ठिकाणी कामे झाली़ परंतु त्याचे मजबुतीकरण शिल्लक राहिले़ गतवर्षी पावसाळा जास्त झाल्यामुळे या रस्त्याची वाट लागली़ अनेक शेतकर्‍यांच्या शेतात पाणी घुसून पिकाचे बेहाल झाले़ त्याचीच पुनरावृत्ती यावर्षी होवू नये यासाठी या कामाचे मुल्यांकन होवून उर्वरित काम सुरू करणे आवश्यक आहे़ या कामाचे स्वरूप बदलल्यामुळे निधी अडकला असल्याचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी पी़बी़ दबणे, सांगितले़ कुशल कामगार ७० टक्के व अकुशल काम ३० टक्के असे झाले होते़या अर्धवट कामामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे़ अनेक शेतात तळे साचत आहेत़ तर अनेक ठिकाणी रस्ता बंद झाला आहे़ काम करणारे गुत्तेदारही त्रस्त आहेत़ शिल्लक राहिलेला निधी मिळाला तरी कामे मार्गी लागतील असे गावकर्‍यांमध्ये बोलले जात आहे़