शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

'फेसबुक किलर'मुळे दहशतीत वाढ

By admin | Updated: February 5, 2017 13:07 IST

भारतात दिवसेंदिवस सोशल मीडियाचा गैरवापर करण्याचे प्रकार समोर आले आहेत

ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 5 - भारतात दिवसेंदिवस सोशल मीडियाचा गैरवापर करण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यातच आता फेसबुक किलरमुळे सगळीकडेच दहशत पसरली आहे. स्वतःच्या घरच्यांपासून विभक्त राहणा-या जोडीदाराचा खून करून तो जिवंत असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांना भासवायचं. जेणेकरून त्यांना संशय येणार नाही. तसेच त्यासाठी फेसबुक, ई-मेल, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करायचा, अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचं समोर आलं आहे. पश्चिम बंगालमधील एका प्रकरणामुळे फेसबुक किलर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील उदयन दास या व्यक्तीने सोबत राहणा-या आकांक्षा शर्मा हिची गेल्या वर्षी हत्या केली. त्यानंतर या विकृतानं तिचा मृतदेह गाडून आकांक्षा जिवंत असल्याचं तिच्या कुटुंबीयांना भासवत होता. आकांक्षाच्या कुटुंबीयांना तो दररोड व्हॉट्सअपवरून मॅसेज करत होता. मात्र त्याचा हा बनाव आता उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शीना बोरा हत्याकांडाच्या आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या आहेत. शीना बोराची हत्या झाल्यानंतरही सोशल नेटवर्किंगवर ती जिवंत असल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र अशा प्रकारांवर आळा घालण्याची गरज असल्याचं मत मानसोपचारतज्ज्ञांनी मांडलं आहे.