शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभूंची सुविधा एक्स्प्रेस!

By admin | Updated: February 26, 2016 04:54 IST

कोणत्याही लोकानुनयी घोषणा न करता, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेली भारतीय रेल्वे आर्थिकदृष्ट्या सशक्त करणे आणि वर्षभरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या सात अब्ज प्रवाशांचा

नवी दिल्ली : कोणत्याही लोकानुनयी घोषणा न करता, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेली भारतीय रेल्वे आर्थिकदृष्ट्या सशक्त करणे आणि वर्षभरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या सात अब्ज प्रवाशांचा प्रवास सुखकर, सुरक्षित व आनंददायी करणे असे दुहेरी उद्दिष्ट डोळ्यांपुठे ठेवत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी लोकसभेत लागोपाठ दुसरा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. ५ वर्षांत रेल्वे प्रवास प्रत्येकाला अभिमानास्पद वाटावा, अशा रीतीने रेल्वेचा कायापालट करण्याचा संकल्प सोडत प्रभूंनी कोणतीही भाडेवाढ केली नाही, हे महत्त्वाचे.बिहार आणि त्या आधी दिल्ली विधानसभेत झालेला भाजपाचा पराभव आणि या आर्थिक वर्षात आसाम, केरळ, बंगाल आदी राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका, यामुळे भाडेवाढ करण्याचे रेल्वेमंत्र्यांनी टाळले असावे, अशी चर्चा संसदेत सुरू होती. पंतप्रधानांसह सर्व मंत्री व भाजपा नेत्यांनी या रेल्वे अर्थसंकल्पाचे कौतुक केले, तर काँग्रेस व अन्य विरोधी सदस्यांनी अर्थसंकल्पातून जनतेला काहीच मिळणार नसल्याची टीका केली.रेल्वेचा महसूल वाढविण्यासाठी भाडेवाढ करणे हा एकमेव आणि पुरेसा मार्ग नाही, हे सूत्र रेल्वेमंत्र्यांच्या भाषणातून प्रकर्षाने जाणवले. मात्र मालभाड्याची फेररचना करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. याचा उद्देशही केवळ अधिक महसूल मिळविणे नसून, एकूणच मालवाहतूक क्षेत्रात रेल्वेच्या वाट्याची घसरण रोखून देशाच्या आर्थिक विकासाचे जोमदार इंजिन ही रास्त भूमिका वटविण्यासाठी रेल्वेला मजबूत पायांवर उभे करणे हा असेल, यावर रेल्वेमंत्र्यांनी भर दिला.कोणतेही राजकीय गणित डोळ््यापुढे ठेवून कोणत्याही अमूक ठिकाणाहून तमूक ठिकाणी धावणाऱ्या कोणत्याही नव्या गाड्या प्रभू यांनी जाहीर केल्या नाहीत. त्याऐवजी त्यांनी काही नव्या वर्गातील गाड्या सुरू करण्याची घोषणा केली. त्यात गर्दीच्या मार्गांवर पूर्णपणे अनारक्षित अशी सुपरफास्ट ‘अंत्योदय एक्स्प्रेस’, काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना लावले जाणारे अनारक्षित प्रवाशांसाठीचे ‘दीन दयालू’ डबे, सर्व थर्ड एसीचे आरक्षित आसनांचे डबे असलेली ‘हमसफर’ गाडी, ताशी १३0 किलोमीटर किंवा त्याहूनही अधिक वेगाने धावणारी ‘तेजस’ गाडी, सर्व डबे वातानुकुलित असलेली व सर्वाधिक गर्दीच्या मार्गांवर फक्त रात्री धावणारी ‘उदय’ एक्स्प्रेस’ व महत्वाच्या तीर्थस्थळांची सफर घडवून आणणारी ‘आस्था सर्किट ट्रेन’ याचा समावेश आहे.प्रवासी आणि मालगाड्यांचे वेग वाढवून, प्रवासी डब्यांची रचना बदलून त्यात अधिक आसनव्यवस्था करून आणि अधिक क्षमतेची इंजिने व वाघिणी वापरून आहे त्याच रेल्वेमार्गांवर जास्तीत जास्त प्रवासी आणि मालाची वाहतूक करण्याचे अनेक उपायही रेल्वेमंत्र्यांनी विषद केले. आहे ताच डोलारा कसाबसा चालविण्यावर बहुतांश खर्च होत असल्याने नव्या भांडवली गुंतवणुकीसाठी पैसा नाही, या दुष्टचक्रातून रेल्वेला बाहेर काढण्याच्या दिशेने ठोस वाटचाल, हेही प्रभूंच्या या अर्थसंकल्पाचे आणखी एक गुणवैशिष्ट्य. यासाठी रेल्वेच्या हरतऱ्हेच्या मालमत्तांमधून विशुद्ध व्यापारी दृष्टिकोन ठेवून जास्तीत जास्त पैसा उभा करणे व भांडवली निधीसाठी केवळ स्वत:च्या क्षमतेवर अवलंबून न राहता वित्तउभारणीचे नाविन्यपूर्ण मार्ग चोखाळून अनेक नव्या योजना राबविण्याची घोषणाही प्रभूंनी केली. यात रेल्वेच्या विकासात राज्य सरकारांना भागीदार करून घेणे व खासगी उद्योग आणि वित्तीय संस्थांकडून वितसाह्य घेणे याचा समावेश आहे. महाराष्ट्रासाठी काय?पुणे-नाशिक (अंतर २६५ कि.मी. अंदाजे खर्च २४२५ कोटी), वैभववाडी-कोल्हापूर (अंतर १0७ कि.मी. अंदाजे खर्च २७५0 कोटी), इंदोर-मनमाड व्हाया मालेगाव (अंतर ३६८ कि.मी. अंदाजे खर्च ९९६८ कोटी), जेउर-आष्टी (अंतर ७८ कि.मी. अंदाजे खर्च १५६0 कोटी), लातूर-नांदेड व्हाया लोहा (अंतर १५५ कि.मी. अंदाजे खर्च १५६0 कोटी), गडचिंदूर-आदिलाबाद (अंतर ७0 कि.मी. अंदाजे खर्च १५00 कोटी), जालना-खामगाव (अंतर १५५ कि.मी. अंदाजे खर्च ३000 कोटी), दौंड-मनमाड दुपदरीकरण (अंतर २३६ कि.मी. अंदाजे खर्च १८७५ कोटी) अशा आठ नव्या लोहमार्गाच्या निर्मितीला मान्यता देण्याची घोषणा प्रभूंनी केली. याखेरीज पाचोरा-जामनेर- मलकापूर (अंतर १0४ कि.मी.), बोधन-जळकोट (अंतर ६७ कि.मी.), नरखेड -वाशिम (अंतर १३0 कि.मी.), मानवत-परळी वैजनाथ (अंतर ६७ कि.मी.), श्रीरामपूर-परळी (अंतर २३0 कि.मी.), टिटवाळा-मुरबाड (अंतर २२ कि.मी.), गुलबर्गा-लातूर (अंतर १४८ कि.मी.) या नव्या मार्गांचे सर्वेक्षण करण्याची घोषणा.अशा आहेत सुविधा...- 2020 पर्यंत सर्वांना कन्फर्म तिकिटाची व्यवस्था. - साडेचार हजारपेक्षा अधिक कोचमध्ये - 17 हजार नवे बायोटॉयलेट बसविण्यात येणार.- रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थाचे स्टॉल्स स्थानिकांना तसेच अनुसूचित जाती, जमाती आदींना देणार. त्यातही महिलांना ३३ टक्के आरक्षण. - वृद्ध आणि दिव्यांग (अपंग) नागरिकांसाठी सारथी सेवेअंतर्गत व्हीलचेअरची सुविधा आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवर या नागरिकांना स्वच्छतागृहाची सुविधा. - नांदेड, नाशिकसह अनेक स्थानकांचे सौंदर्यीकरण. - प्रवाशांसाठी एफ एम रेडिओ स्टेशन स्थापन करण्याचा प्रस्ताव. - लांब पल्ल्याच्या रेल्वेत तीन अनारक्षित कोच. मोबाइल चार्जिंग व पेयजलाची व्यवस्था.- पूर्णत: वातानुकूलित तीन हमसफर रेल्वे ताशी - 130 किमी वेगाने धावणार- 130किमी ताशी वेगाने धावणाऱ्या ‘तेजस’चा प्रस्ताव.- 100 स्थानकांवर वाय-फाय- 30000 नवी जैव स्वच्छतागृहे- 2000 स्थानकांवर वीस हजार स्क्रीन डिस्प्ले - 120 लोअर बर्थ ज्येष्ठ व महिलांसाठी राखीव - मुंबईत रेल्वे कॉरीडॉर : चर्चगेट-विरार आणि सीएसटी -पनवेल या रेल्वेमार्गांवर ही योजना.- रेल्वे बंधू पत्रिका आता अनेक प्रादेशिक भाषेत. नवे स्मार्ट कोच बनणार. या अंतर्गत स्वयंचलित दरवाजे, बार कोड रीडर, सूचना बोर्ड आदी सुविधा देण्यात येणार.- प्रवाशांना आरक्षण सहजपणे करता यावे, यासाठी वेबसाइट, मोबाइल अ‍ॅपवरून ई-तिकीट सुविधेचा विस्तार.------------------------------------कोणतीही दरवाढ नसलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटक सामावलेले आहेत. गतिमान रेल्वे देतानाच सुरक्षेवर भर दिला गेला आहे. त्यातून राष्ट्रीय वाहतुकीचे माध्यम असलेल्या रेल्वेला पुनर्संघटित आणि पुनरुज्जीवित करण्याचा उद्देश दिसून येतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान रेल्वे अर्थसंकल्पाने काहीही न देता, लोकांची फसवणूक केली आहे. अर्थसंकल्पात सुरक्षेच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अर्थसंकल्प रुळावरून घसरला आहे. त्यात नवे काहीही नाही.- लालूप्रसाद यादव, माजी रेल्वेमंत्री