शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे मार्ग सांगा

By admin | Updated: March 28, 2017 01:44 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी काय पावले उचलण्यात येणार आहेत याची माहिती द्या

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी काय पावले उचलण्यात येणार आहेत याची माहिती द्या, अशी विचारणा सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली. सरन्यायाधीश जे. एस. केहर यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड व न्या. एस. के. कौल यांच्या पीठाने म्हटले आहे की, हा मुद्दा गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास राज्यांनी काय पावले उचलली आहेत त्याची माहिती केंद्र सरकारने चार आठवड्यांच्या आत न्यायालयास द्यावी. न्यायालयाने म्हटले आहे की, शेतकरी असे टोकाचे पाऊल का उचलतात यामागच्या कारणांचा शोध घेऊन त्याचे निराकरण करणारे धोरण सरकारने आणायला हवे. यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पी. एस. नरसिम्हा यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना थेट धान्य उपलब्ध करुन देणे, विम्याचे संरक्षण वाढविणे, कर्ज देणे, नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देणे यासारखे पाऊले सरकार उचलत आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार एक धोरण आणत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, कृषी हा राज्यांचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे शोधून त्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्राने राज्यांशी समन्वय करावा आणि संबंधित योजना आणाव्यात. याचिकाकर्ती एनजीओ ‘सिटीजन्स रिसोर्स अँड अ‍ॅक्शन अँड इनिशिएटिव्ह’ची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कोलिन गोन्सालविस यांनी सांगितले की, वर्षभरात ३००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सरकारने यावर विचार करून एक निश्चित धोरण आखायला हवे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर चिंता व्यक्त करताना न्यायालयाने अगोदर म्हटले होते की, मूळ समस्या सोडविण्यास सरकार चुकीच्या दिशेने जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)