शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

पावसाळी अधिवेशनाची वादळी सांगता

By admin | Updated: August 14, 2015 00:54 IST

ललित मोदी प्रकरण आणि व्यापमं घोटाळ्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे पाण्यात वाहून गेलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची गुरुवारी वादळी सांगता झाली.

नवी दिल्ली : ललित मोदी प्रकरण आणि व्यापमं घोटाळ्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे पाण्यात वाहून गेलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची गुरुवारी वादळी सांगता झाली.अधिवेशन काळात लोकसभेत काँग्रेसच्या ४४ पैकी २५ सदस्यांना गोंधळामुळे पाच दिवस निलंबित करण्यात आले, तर बुधवारचा दिवस सरकार आणि काँग्रेसने एकमेकांवर केलेल्या प्रहारांनी गाजला.२१ जुलैपासून सुरू झालेल्या अधिवेशनात काँग्रेस सदस्यांनी दोन्ही सभागृहात ललित मोदी प्रकरण आणि व्यापमं घोटाळ्यावरून परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून प्रचंड गदारोळ केला. राज्यसभेत कुठलेही कामकाज झाले नाही. लोकसभेत मात्र विरोधी पक्षांच्या अनुपस्थितीत प्रश्नोत्तराचा तास व इतर काही काम झाले. ‘राजीनामा नाही तर चर्चा नाही’ या मागणीवर अडून राहिलेली काँग्रेस अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी लोकसभेत सुषमा स्वराज यांच्याविरुद्ध आणण्यात आलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चेस तयार झाली. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विरोधकांनी लोकसभेत सभात्याग केला. राज्यसभेत नऊ तासांपेक्षा थोडे अधिक कामकाज झाले. अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर रालोआच्या खासदारांनी संसद भवन परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून विजय चौकापर्यंत मार्च काढला आणि काँग्रेसतर्फे कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा मुद्दा उपस्थित केला.