शहरं
Join us  
Trending Stories
1
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
2
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
3
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
4
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
5
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
6
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
7
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
8
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
9
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
10
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
11
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
12
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
13
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
14
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
15
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
16
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
17
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
18
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
19
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
20
कॅनडाच्या किनाऱ्यावर 'UFO'? कार्गो जहाजाच्या कॅमेऱ्यात घटना कैद, पाहा VIDEO...
Daily Top 2Weekly Top 5

जातींच्या आकडेवारीसाठी तज्ज्ञगट

By admin | Updated: July 17, 2015 04:39 IST

जात जनगणना जारी करण्यासाठी विरोधकांनी आणलेल्या दबावासमोर झुकत केंद्रीय मंत्रिमंडळाने विविध जातींची आकडेवारी पडताळणीचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी तज्ज्ञ गटाची स्थापना केली आहे.

नवी दिल्ली : जात जनगणना जारी करण्यासाठी विरोधकांनी आणलेल्या दबावासमोर झुकत केंद्रीय मंत्रिमंडळाने विविध जातींची आकडेवारी पडताळणीचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी तज्ज्ञ गटाची स्थापना केली आहे. राज्य सरकारांनीच श्रेणीनिहाय विविध जातींची आकडेवारी संकलित करण्याचे काम पूर्णत्वास नेले नसल्याचा ठपकाही केंद्र सरकारने ठेवला आहे.नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगरिया यांच्या नेतृत्वातील गटाकडे ही जबाबदारी सोपविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जातगणनेच्या आकडेवारीचे वर्गीकरण झाल्यानंतर योग्यवेळी ते जाहीर केले जाईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना स्पष्ट केले. संपुआ सरकारने मे २०११ मध्ये घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवरच आकडेवारीची पडताळणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेससह समाजवादी पक्ष, जेडीयू, राजद आणि द्रमुकने जात गणनेवर आधारित आकडेवारी जारी न केल्याबद्दल आक्रमक पवित्रा घेतला होता. १९१२ नंतर प्रथमच ३ जुलै २०१५ रोजी अशा प्रकारच्या जनगणनेची आकडेवारी जारी करताना सरकारने जातनिहाय आकडेवारी जाहीर करण्याचे टाळले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)आकडेवारीत बिहारच मागेबिहारमधील विधानसभा निवडणुकींमुळे राजकीय कारणास्तव जातनिहाय आकडेवारी टाळण्यात आल्याचा आरोप जेटलींनी फेटाळून लावला. जातींच्या आकडेवारीचे जे राज्य राजकारण करीत आहे त्या राज्याने जातनिहाय संकलित आकडेवारीसंबंधी शिफारस लवकरात लवकर पाठविली तर चांगले राहील, असा टोलाही त्यांनी हाणला. देशाच्या महानिबंधकांनी देशभरातील ४६ लाख जाती, उपजाती, विविध आडनावे आणि वंशांची नावांची वर्गवारी आठ ते नऊ महिन्यांपूर्वीच राज्यांकडे एकत्रित संकलनासाठी पाठविली आहे. पनगरिया यांच्या नेतृत्वातील समितीला पूर्ण आकडेवारी मिळाल्यानंतरच पडताळणी शक्य होईल. ही संकलित आकडेवारीचा तपशील दडवून ठेवत ती जारी करण्याची मागणी केली जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.विरोधकांच्या एकजुटीमुळे अडचणसंसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस, डाव्यांसह सर्व विरोधी पक्ष जात जनगणनेची आकडेवारी जारी करण्याच्या मागणीसाठी एकजूट होत आक्रमक बनल्याने सरकारची अडचण वाढली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एकत्र आलेले राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि जेडीयूचे नेते तथा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जातींच्या आकडेवारीची मागणी करीत दंड थोपटले आहेत.