शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

जातींच्या आकडेवारीसाठी तज्ज्ञगट

By admin | Updated: July 17, 2015 04:39 IST

जात जनगणना जारी करण्यासाठी विरोधकांनी आणलेल्या दबावासमोर झुकत केंद्रीय मंत्रिमंडळाने विविध जातींची आकडेवारी पडताळणीचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी तज्ज्ञ गटाची स्थापना केली आहे.

नवी दिल्ली : जात जनगणना जारी करण्यासाठी विरोधकांनी आणलेल्या दबावासमोर झुकत केंद्रीय मंत्रिमंडळाने विविध जातींची आकडेवारी पडताळणीचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी तज्ज्ञ गटाची स्थापना केली आहे. राज्य सरकारांनीच श्रेणीनिहाय विविध जातींची आकडेवारी संकलित करण्याचे काम पूर्णत्वास नेले नसल्याचा ठपकाही केंद्र सरकारने ठेवला आहे.नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगरिया यांच्या नेतृत्वातील गटाकडे ही जबाबदारी सोपविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जातगणनेच्या आकडेवारीचे वर्गीकरण झाल्यानंतर योग्यवेळी ते जाहीर केले जाईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना स्पष्ट केले. संपुआ सरकारने मे २०११ मध्ये घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवरच आकडेवारीची पडताळणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेससह समाजवादी पक्ष, जेडीयू, राजद आणि द्रमुकने जात गणनेवर आधारित आकडेवारी जारी न केल्याबद्दल आक्रमक पवित्रा घेतला होता. १९१२ नंतर प्रथमच ३ जुलै २०१५ रोजी अशा प्रकारच्या जनगणनेची आकडेवारी जारी करताना सरकारने जातनिहाय आकडेवारी जाहीर करण्याचे टाळले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)आकडेवारीत बिहारच मागेबिहारमधील विधानसभा निवडणुकींमुळे राजकीय कारणास्तव जातनिहाय आकडेवारी टाळण्यात आल्याचा आरोप जेटलींनी फेटाळून लावला. जातींच्या आकडेवारीचे जे राज्य राजकारण करीत आहे त्या राज्याने जातनिहाय संकलित आकडेवारीसंबंधी शिफारस लवकरात लवकर पाठविली तर चांगले राहील, असा टोलाही त्यांनी हाणला. देशाच्या महानिबंधकांनी देशभरातील ४६ लाख जाती, उपजाती, विविध आडनावे आणि वंशांची नावांची वर्गवारी आठ ते नऊ महिन्यांपूर्वीच राज्यांकडे एकत्रित संकलनासाठी पाठविली आहे. पनगरिया यांच्या नेतृत्वातील समितीला पूर्ण आकडेवारी मिळाल्यानंतरच पडताळणी शक्य होईल. ही संकलित आकडेवारीचा तपशील दडवून ठेवत ती जारी करण्याची मागणी केली जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.विरोधकांच्या एकजुटीमुळे अडचणसंसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस, डाव्यांसह सर्व विरोधी पक्ष जात जनगणनेची आकडेवारी जारी करण्याच्या मागणीसाठी एकजूट होत आक्रमक बनल्याने सरकारची अडचण वाढली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एकत्र आलेले राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि जेडीयूचे नेते तथा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जातींच्या आकडेवारीची मागणी करीत दंड थोपटले आहेत.