शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

करांमध्ये सूट अपेक्षित

By admin | Updated: January 28, 2017 01:00 IST

रोजगार बाजारपेठेत भारतात दरवर्षी १ कोटी २0 लाख तरुण प्रवेश करतात. देशातील ६५ टक्के लोकसंख्येचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे.

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीरोजगार बाजारपेठेत भारतात दरवर्षी १ कोटी २0 लाख तरुण प्रवेश करतात. देशातील ६५ टक्के लोकसंख्येचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन लाखो तरुणांसाठी नव्या संधी निर्माण करण्यासाठी यंदाच्या बजेटमध्ये विविध क्षेत्रांसाठी सरकार मोठे पॅकेज देण्याच्या विचारात असल्याची सूत्रांनी सांगितले. नोटाबंदीनंतर उत्पादन क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात श्रमशक्तीला अधिकाधिक संधी देणाऱ्या उद्योगांना खास प्रोत्साहन देण्याचा विचार आहे. देशाच्या सागरी तटावरील भागांना नव्या रोजगारांचे नवे क्षेत्र बनवण्यास सरकार रोजगार निर्मितीच्या प्रमाणात करांमधे सूट देण्याच्या विचारात आहे. यंदा चर्मोद्योग, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन व जेम्स अँड ज्वेलरीसारख्या क्षेत्रांमध्ये रोजगार वृध्दीसाठी विविध प्रकारचे प्रोत्साहन देणाऱ्या योजनांबरोबरच करांमधेही खास सूट देण्याचा सरकारचा विचार आहे. केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात बेरोजगारांचे वार्षिक सर्वेक्षण जाहीर केले. यानुसार ७७ टक्के कुटुंबांमधे नोकरीद्वारे नियमित उत्पन्न मिळवणारी एकही व्यक्ती नाही. हे लक्षात घेत केंद्रीय श्रम मंत्रालयाने सरकारला प्रस्ताव दिला की ज्या उद्योगांना श्रम शक्तीची अधिकाधिक आवश्यकता आहे, त्यांना निश्चित कालावधीच्या मुदतीचे रोजगार आकर्षक सुविधांसह पुरवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. नोकरीत हंगामींना कामाचे तास, वेतन भत्ते, व अन्य सुविधा स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळतील याची दक्षता घेतली पाहिजे. दरमहा १५ हजारांपेक्षा कमी पगार मिळवणाऱ्या कामगाराला प्रॉव्हिडंड फंडात अंशदान न भरण्याची सूट असली पाहिजे, असेही प्रस्तावात म्हटले आहे.