शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

यंदा अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होण्याची अपेक्षा

By admin | Updated: April 26, 2017 00:54 IST

यंदा देशभर चांगला पाऊस होण्याची खूशखबर असल्याने जुलैपासून सुरू होणाऱ्या २०१७-१८ या कृषीवर्षात देशात अन्नधान्याचे २७३ दशलक्ष टन एवढे न भूतो असे उत्पादन होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे.

नवी दिल्ली : यंदा देशभर चांगला पाऊस होण्याची खूशखबर असल्याने जुलैपासून सुरू होणाऱ्या २०१७-१८ या कृषीवर्षात देशात अन्नधान्याचे २७३ दशलक्ष टन एवढे न भूतो असे उत्पादन होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे.आगामी खरीप हंगामातील पेरण्यांचे नियोजन व धोरण याविषयी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग म्हणाले की, मंत्रालयाने तयार केलेल्या दुसऱ्या सुधारित अंदाजानुसार चालू हंगामातही अन्नधान्याचे उत्पादन २७१.९८ दशलक्ष टन एवढी विक्रमी पातळी गाठेल अशी अपेक्षा आहे.मंत्री म्हणाले की, आगामी कृषीवर्षासाठी याहूनही जास्त म्हणजे २७३ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचे लक्ष्य ठरविण्यात आले असून, चांगल्या पावसामुळे हे लक्ष्य गाठणे शक्य व्हावे, असे दिसते.या कार्यक्रमात कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी खरीप हंगामासाठी बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. उदा. भाताचे ८३.४६ लाख क्विंटल तर तुरीचे ३.७५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. या हंगामासाठी २८.८८ दशलक्ष टन रासायनिक खतांची अपेक्षित गरज असून, ही खतेही उपलब्ध आहेत. खरिपाच्या पेरण्या सुरळीत व्हाव्यात यासाठी राज्य सरकारांनी आवश्यक तेवढी दर्जेदार बियाणी व खते वेळेवर उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी, यावर मंत्री सिंग यांनी भर दिला. ‘प्रधानमंत्री पीक विमा’ योजनेसह शेतकऱ्यांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनाही राज्यांनी नेटाने राबवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.