शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

जनतेला परिवर्तनाची अपेक्षा

By admin | Updated: October 10, 2014 02:57 IST

शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने राजकारण करीत असलेल्या शरद पवारांना गेल्या ४० वर्षांपासून खंबीरपणे साथ दिली.

राष्ट्रवादी कॉँग्रेस सोडण्यामागील कारण काय?- राजर्षी शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने राजकारण करीत असलेल्या शरद पवारांना गेल्या ४० वर्षांपासून खंबीरपणे साथ दिली. त्यामागे स्वत:चा नाही तर केवळ कष्टकरी, कामगार समाजाचा विकास व्हावा हाच हेतू होता. मात्र प्रत्येक वेळी पवारांनी आपला, आंबेडकरी जनतेचा वापर करून घेतला. डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळविण्यासाठी आपण पहिल्यांदा मागणी केली. मात्र त्याला त्यांच्याकडून फारशी साथ मिळाली नाही. तरीही आपण एकट्याने लढा देत जागा मिळविण्यात यशस्वी झालो. प्रत्येक वेळी आपल्याला डावलण्यात येत असल्याचे लक्षात आल्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.आरपीआयचे विविध गट व अन्य पक्ष असताना भाजपामध्ये का प्रवेश केला?- काँग्रेस, राष्ट्रवादी हे भाजपाला जातीयवादी पक्ष म्हणत असले तरी तो सर्व घटकांसाठी काम करणारा पक्ष असल्याचे आपल्याला समजले. जनतेच्या भरभरून प्रतिसादामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात अनेक वर्षांनंतर पूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन झाले. त्यांच्यामुळे देशात व राज्यात विकास, परिवर्तन घडू शकत असल्याने भाजपामध्ये प्रवेश केला. कसलीही अपेक्षा नसताना पक्षाने आपला मान राखत उमेदवारी दिली. आपल्या प्रचारातील मुद्दे काय आहेत?- दलित, कष्टकरी जनतेच्या विकासासाठी आपण कार्यरत राहणार असून राष्ट्रवादीने गेल्या १५ वर्षांत अनेक क्षेत्रांत भ्रष्टाचार करून कोट्यवधीचे घोटाळे केले आहेत. सहकार चळवळ मोडीत काढली. ते आपण जनतेसमोर मांडत आहोत. कुर्ला (पू.) मतदारसंघ राखीव असून इथला विकास रखडला आहे. रखडलेले झोपडपट्टीचे पुनर्वसन, एसआरए योजना मार्गी लावताना वाहतुकीची कोंडी दूर करू, खेळासाठी मैदान उपलब्ध करून देऊ.उपरा उमेदवार असल्याची टीका प्रतिस्पर्ध्याकडून होत आहे?- गेली साडेचार दशके आपण मुंबईत राहून कष्टकरी, कामगारांची मोट बांधून कार्यरत राहिलो आहोत. संघटनेच्या माध्यमातून मुंबईसह पूर्ण राज्यातील मतदारसंघात आपले काम चालू आहे. पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने हा फालतू मुद्दा उपस्थित करीत आहेत. विजयी झाल्यानंतर मी या ठिकाणी घर घेऊन राहणार आहे.