शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

जनतेला परिवर्तनाची अपेक्षा

By admin | Updated: October 10, 2014 02:57 IST

शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने राजकारण करीत असलेल्या शरद पवारांना गेल्या ४० वर्षांपासून खंबीरपणे साथ दिली.

राष्ट्रवादी कॉँग्रेस सोडण्यामागील कारण काय?- राजर्षी शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने राजकारण करीत असलेल्या शरद पवारांना गेल्या ४० वर्षांपासून खंबीरपणे साथ दिली. त्यामागे स्वत:चा नाही तर केवळ कष्टकरी, कामगार समाजाचा विकास व्हावा हाच हेतू होता. मात्र प्रत्येक वेळी पवारांनी आपला, आंबेडकरी जनतेचा वापर करून घेतला. डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळविण्यासाठी आपण पहिल्यांदा मागणी केली. मात्र त्याला त्यांच्याकडून फारशी साथ मिळाली नाही. तरीही आपण एकट्याने लढा देत जागा मिळविण्यात यशस्वी झालो. प्रत्येक वेळी आपल्याला डावलण्यात येत असल्याचे लक्षात आल्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.आरपीआयचे विविध गट व अन्य पक्ष असताना भाजपामध्ये का प्रवेश केला?- काँग्रेस, राष्ट्रवादी हे भाजपाला जातीयवादी पक्ष म्हणत असले तरी तो सर्व घटकांसाठी काम करणारा पक्ष असल्याचे आपल्याला समजले. जनतेच्या भरभरून प्रतिसादामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात अनेक वर्षांनंतर पूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन झाले. त्यांच्यामुळे देशात व राज्यात विकास, परिवर्तन घडू शकत असल्याने भाजपामध्ये प्रवेश केला. कसलीही अपेक्षा नसताना पक्षाने आपला मान राखत उमेदवारी दिली. आपल्या प्रचारातील मुद्दे काय आहेत?- दलित, कष्टकरी जनतेच्या विकासासाठी आपण कार्यरत राहणार असून राष्ट्रवादीने गेल्या १५ वर्षांत अनेक क्षेत्रांत भ्रष्टाचार करून कोट्यवधीचे घोटाळे केले आहेत. सहकार चळवळ मोडीत काढली. ते आपण जनतेसमोर मांडत आहोत. कुर्ला (पू.) मतदारसंघ राखीव असून इथला विकास रखडला आहे. रखडलेले झोपडपट्टीचे पुनर्वसन, एसआरए योजना मार्गी लावताना वाहतुकीची कोंडी दूर करू, खेळासाठी मैदान उपलब्ध करून देऊ.उपरा उमेदवार असल्याची टीका प्रतिस्पर्ध्याकडून होत आहे?- गेली साडेचार दशके आपण मुंबईत राहून कष्टकरी, कामगारांची मोट बांधून कार्यरत राहिलो आहोत. संघटनेच्या माध्यमातून मुंबईसह पूर्ण राज्यातील मतदारसंघात आपले काम चालू आहे. पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने हा फालतू मुद्दा उपस्थित करीत आहेत. विजयी झाल्यानंतर मी या ठिकाणी घर घेऊन राहणार आहे.