शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

जनतेला परिवर्तनाची अपेक्षा

By admin | Updated: October 10, 2014 02:57 IST

शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने राजकारण करीत असलेल्या शरद पवारांना गेल्या ४० वर्षांपासून खंबीरपणे साथ दिली.

राष्ट्रवादी कॉँग्रेस सोडण्यामागील कारण काय?- राजर्षी शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने राजकारण करीत असलेल्या शरद पवारांना गेल्या ४० वर्षांपासून खंबीरपणे साथ दिली. त्यामागे स्वत:चा नाही तर केवळ कष्टकरी, कामगार समाजाचा विकास व्हावा हाच हेतू होता. मात्र प्रत्येक वेळी पवारांनी आपला, आंबेडकरी जनतेचा वापर करून घेतला. डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळविण्यासाठी आपण पहिल्यांदा मागणी केली. मात्र त्याला त्यांच्याकडून फारशी साथ मिळाली नाही. तरीही आपण एकट्याने लढा देत जागा मिळविण्यात यशस्वी झालो. प्रत्येक वेळी आपल्याला डावलण्यात येत असल्याचे लक्षात आल्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.आरपीआयचे विविध गट व अन्य पक्ष असताना भाजपामध्ये का प्रवेश केला?- काँग्रेस, राष्ट्रवादी हे भाजपाला जातीयवादी पक्ष म्हणत असले तरी तो सर्व घटकांसाठी काम करणारा पक्ष असल्याचे आपल्याला समजले. जनतेच्या भरभरून प्रतिसादामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात अनेक वर्षांनंतर पूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन झाले. त्यांच्यामुळे देशात व राज्यात विकास, परिवर्तन घडू शकत असल्याने भाजपामध्ये प्रवेश केला. कसलीही अपेक्षा नसताना पक्षाने आपला मान राखत उमेदवारी दिली. आपल्या प्रचारातील मुद्दे काय आहेत?- दलित, कष्टकरी जनतेच्या विकासासाठी आपण कार्यरत राहणार असून राष्ट्रवादीने गेल्या १५ वर्षांत अनेक क्षेत्रांत भ्रष्टाचार करून कोट्यवधीचे घोटाळे केले आहेत. सहकार चळवळ मोडीत काढली. ते आपण जनतेसमोर मांडत आहोत. कुर्ला (पू.) मतदारसंघ राखीव असून इथला विकास रखडला आहे. रखडलेले झोपडपट्टीचे पुनर्वसन, एसआरए योजना मार्गी लावताना वाहतुकीची कोंडी दूर करू, खेळासाठी मैदान उपलब्ध करून देऊ.उपरा उमेदवार असल्याची टीका प्रतिस्पर्ध्याकडून होत आहे?- गेली साडेचार दशके आपण मुंबईत राहून कष्टकरी, कामगारांची मोट बांधून कार्यरत राहिलो आहोत. संघटनेच्या माध्यमातून मुंबईसह पूर्ण राज्यातील मतदारसंघात आपले काम चालू आहे. पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने हा फालतू मुद्दा उपस्थित करीत आहेत. विजयी झाल्यानंतर मी या ठिकाणी घर घेऊन राहणार आहे.