शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

‘टीम मोदी’चा विस्तार!

By admin | Updated: July 6, 2016 11:21 IST

मोदी मंत्रिमंडळातील फेरबदल व दुसऱ्या विस्ताराच्या प्रक्रियेत १0 राज्यांमधील १९ नव्या चेहऱ्यांना स्थान मिळाले तर ५ विद्यमान मंत्र्यांना पायउतार व्हावे लागले. राष्ट्रपती भवनाच्या अशोका

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली

मोदी मंत्रिमंडळातील फेरबदल व दुसऱ्या विस्ताराच्या प्रक्रियेत १0 राज्यांमधील १९ नव्या चेहऱ्यांना स्थान मिळाले तर ५ विद्यमान मंत्र्यांना पायउतार व्हावे लागले. राष्ट्रपती भवनाच्या अशोका हॉलमध्ये झालेल्या शपथविधी समारंभात या १९ जणांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली आणि सध्या राज्यमंत्री असलेले प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.त्याचबरोबर रामशंकर कथेरिया, निहालचंद, सांवरलाल जाट, मनसुखभाई वसावा, एम.के. कुंडारिया या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र मिळाला आहे. पर्यावरण व वन विभागाचा स्वतंत्र प्रभार सांभाळणारे प्रकाश जावडेकर हे बढती मिळालेले एकमेव आहेत. त्यांना पूर्ण दर्जाचे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. महाराष्ट्रातून भाजपाचे डॉ. सुभाष भामरे व रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले या दोघांचा मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाला आहे. एनडीएमधील रामदास आठवले (रिपब्लिकन) व अनुप्रिया पटेल (अपना दल) हे दोन राज्यमंत्री वगळता १७ राज्यमंत्री भाजपचेच आहेत. कॅबिनेट विस्तारापूर्वी शिवसेनेने उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र शिवसेनेचे मंत्री अनंत गीते उपस्थित होते.विविध क्षेत्रातील मंडळी या विस्तारात मंत्रीमंडळात असून एम. जे. अकबर (ज्येष्ठ पत्रकार) डॉ. सुभाष भामरे (सर्जन), अर्जुनराम मेघवाल (माजी नोकरशहा), अनिल दवे, फग्गनसिंग कुलस्ते व जसवंतसिंग भाभोर, रामदास आठवले, अजय टम्टा, रमेश जिगजिनगी व कृष्णा राज, एस. एस. अहलुवालिया (अल्पसंख्यांक समुदाय) अनुप्रिया पटेल, सी. आर चौधरी, पी. पी. चौधरी, मनसुखभाई मांडविया, महेंद्र पांडे, पुरुषोत्तम रुपाला, राजन गोहेन, विजय गोयल अशी त्यांची वर्गवारी आहे.फेरबदलात महाराष्ट्राला काय?। प्रकाश जावडेकर यांना मनुष्यबळ विकास खाते, डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे संरक्षण राज्यमंत्रीपद तर रामदास आठवले यांना सामाजिक न्याय व सबलीकरण खात्याचे राज्यमंत्रीपद आले आहे.यादी निश्चितीमध्ये संघही सहभागी... नव्या मंत्र्यांची निवड विस्तृत विचार-विनिमयानंतर केली असल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले. या भेटीनंतर शाह रा.स्व. संघाच्या कार्यालयात गेले आणि मंत्रिमंडळाच्या नव्या यादीबाबत संघ नेत्यांशी चर्चा करून यादी निश्चित केली. मंगळवारी ज्यांचा शपथविधी झाला, त्या सर्वांनी सोमवारी पक्षाध्यक्ष अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. महत्त्वाचे बदल... अरुण जेटली यांच्याकडे माहिती व प्रसारण या जादा खात्याचा कार्यभार होता. ते खाते आता वेंकय्या नायडू यांना देताना, त्यांच्याकडील नगरविकास खाते कायम ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांचे संसदीय कार्य खाते अनंतकुमार यांना मिळाले आहे. अनंतकुमार यांच्याकडे रसायन व खते हे खातेही असेल.

स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ विकास खाते प्रकाश जावडेकर यांना दिले असून, इराणी या आता वस्त्रोद्योग हे तुलनेने कमी महत्त्वाचे खाते दिलेले आहे. सदानंद गौडा यांच्याकडून कायदा खाते काढून घेण्यात आले असून, त्यांनाही कमी महत्त्वाचे सांख्यिकी व योजना अमलबजावणी खाते दिले आहे. माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे कायदा खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.या पाच राज्यमंत्र्यांना का काढले? 1)रामशंकर कथेरिया : संसदेत आणि बाहेर केलेली वादग्रस्त वक्तव्ये2)निहालचंद : बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप3)संवरलाल जाट : संसदेतील गैरहजेरी आणि अकार्यक्षमता4)मोहनभाई कुंडेरिया : योगा कार्यक्रमात लहान मुलांच्या अंगावरून चालत असल्याची चित्रफीत 5)मनसुखभाई वसावा : अकार्यक्षमता