शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

Exit Poll: उत्तर प्रदेशमध्ये 26 वर्षांनी फुलणार कमळ

By admin | Updated: March 9, 2017 19:51 IST

उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. टाइम्स नाऊ आणि व्हिएमआरने केलेल्या एक्झीट पोलमधून आलेल्या आकडेवारीनुसार भाजपाची सत्ता

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 9 - देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारं राज्य अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेसाठी 7 टप्प्यांमध्ये मतदान पूर्ण झालं असून आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर यायला सुरूवात झाली आहे.  टाइम्स नाऊ आणि व्हिएमआरने केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये 26 वर्षांनी कमळ फुलण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागू शकतं.  उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता स्थापन होईल अशी आकडेवारी या एक्झिट पोलमध्ये समोर आली आहे. 

या एक्झिट पोलमध्ये 403 जागांपैकी भारतीय जनता पक्षाला 190 ते 210 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुमतासाठी 202 जागा मिळण्याची आवश्यकता असल्याने एक्झिट पोलनुसार भाजपाची एकहाती सत्ता येऊ शकते.  एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर उत्तरप्रदेशमध्ये जवळपास 26 वर्षांनी भाजपाची एकहाती सत्ता येईल.  टाइम्स नाऊ आणि व्हिएमआरने जाहिर केलेल्या एक्झीट पोलमध्ये समाजवादी पक्ष - कॉंग्रेसला 110 ते 130 जागा, बहुजन समाज पक्षाला 54 ते 57 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एक नजर इतर Exit Poll वर- 

- नेटवर्क- 18 च्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजपा 185 जागा मिळवून लर्वात मोठा पक्ष बनेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर समाजवादी पक्ष -काँग्रेसला 120 जागा आणि बसपला 90 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- एबीपी माझा-सीएसडीएस'च्या एक्झिट पोलमधील आकडेवारी वेगळी आहे. यामध्ये भाजपला 164-176 जागा, सपा-काँग्रेसला 156-169 जागा , बसपला 60-72 जागा आणि इतरांना 2 ते 6 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
- इंडिया टीव्ही-सीव्होटरने केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठी पार्टी बनेल. यानुसार भाजपाला 185 जागा , समाजवादी पक्षाला 120 जागा आणि बसपाला 90  जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  
 
उत्तर प्रदेशमध्ये 2012 च्या निवडणुकीसाठी 59.40 % मतदान झालं होतं, तर यावेळेस   60.03% टक्के मतदान झालं. नेमका निकाल काय लागतो हे 11 मार्चला कळेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यांच्या समाजवादी पक्षाला 224 जागा, बहुजन समाज पक्षाला 80 जागा , भाजपाला 47 जागा आणि कॉंग्रेसला 28 जागा मिळाल्या होत्या. तर  24 जागा अपक्ष आणि इतर पक्षांना मिळाल्या होत्या. त्यातही केवळ 6 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.