शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

Jammu And Kashmir : अनंतनाग परिसरात सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 08:42 IST

सुरक्षा यंत्रणांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर गोळीबार केला.

अनंतनाग - जम्मू काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी आपलं डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. अनंतनाग परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणेत जोरदार चकमक सुरु आहे. सुरक्षा यंत्रणांनी परिसरात शोधमोहीम हाती घेतली आहे. सोमवारी सकाळी अनंतनाग परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर गोळीबार केला. जवानांदेखील दहशतवाद्यांच्या गोळीबारीला चोख प्रत्युत्तर दिलं. 

शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होतं.  सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामा  जिल्ह्यातील अवंतीपोरामध्ये चकमक सुरू झाली होती. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं

शोपियान जिल्ह्यामध्येही जवान आणि दहशतवाद्यांमध्ये 3 जूनच्या पहाटेपासून चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. शोपियान जिल्ह्याच्या द्रागड सुगान भागात 31 मे रोजी दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक सुरु होती. यामध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. कुलगाममध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये 29 मे रोजी चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं

काही दिवसांपूर्वी अनंतनाग येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात 5 जवान शहीद झाले तर अन्य 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अनंतनाग दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड अहमद जरगर याला मानलं जातंय. या हल्ल्यामागे अल-उमर-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय भारतीय सुरक्षा यंत्रणांना आहे. सूत्रांची माहिती अशी आहे की, अल-उमर-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत एकट्याने असा हल्ला करण्याची क्षमता नाही. त्यामुळे जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी हातमिळवणी करुन अल-उमर-मुजाहिदीनने हा दहशतवादी हल्ला घडवून आणला असावा. जम्मू-काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरविण्यासाठी या दोन्ही दहशतवादी संघटना एकत्र आल्या आहेत. काश्मीर खोऱ्यात पुन्हा दहशतवाद अहमद जरगर हातपाय पसरण्याचं काम करत आहे.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान