शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

ईव्हीएममध्ये छेडछाड करून निवडणूक जिंकली

By admin | Updated: April 6, 2017 04:29 IST

भाजपने ईव्हीएममध्ये गडबड करून जिंकल्याचा आरोप, राज्यसभेत बसप, सप, काँग्रेससह सर्व विरोधकांनी बुधवारी राज्यसभेत केला

सुरेश भटेवरा,नवी दिल्ली- उत्तरप्रदेशची निवडणूक भाजपने ईव्हीएममध्ये गडबड करून जिंकल्याचा आरोप, राज्यसभेत बसप, सप, काँग्रेससह सर्व विरोधकांनी बुधवारी राज्यसभेत केला. सरकारविरोधी घोषणा देत विरोधक आसनासमोर आल्याने उपसभापतींना कामकाज तहकूब करावे लागले. काँग्रेसचे दिग्विजयसिंग व प्रमोद तिवारी तसेच सपाचे रामगोपाल यादव व नरेश अग्रवाल यांनी ईव्हीएम मशिनच्या कथित छेडछाडीवर चर्चेसाठी नोटिसा दिल्या होत्या. उपसभापतींनी त्या फेटाळल्या, मात्र सदस्यांना थोडक्यात बोलण्याची अनुमती दिली. ईव्हीएममध्ये कोणताही बदल करता येत नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे त्यांनी दाद मागावी, असे नमूद करीत सत्ताधारी पक्षाने विरोधकांचे तमाम आरोप फेटाळले.मायावती म्हणाल्या की, सुरुवातीची १00 ते १५0 मते नोंदवल्यानंतर मतदाराने कोणालाही मत दिले तर ते भाजपलाच मिळेल, असे बदल ईव्हीएममध्ये करण्यात आले. हा आरोप ऐकताच सत्ताधारी सदस्य संतापून उठले. यावेळी मायावतींची काही विधाने कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश उपसभापतींनी दिले. संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले, विरोधकांना पराभव पचवता आलेला नाही. हताशेपोटी ते वाटेल ते आरोप करीत आहेत. याच यंत्रांद्वारे २00४ व २00९ साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या. अलीकडेच बिहार, दिल्ली, पंजाब मणिपूर, गोवा आदी राज्यातही निवडणुका झाल्या, प्रत्येक ठिकाणी ईव्हीएमच वापरण्यात आली. गुलाम नबी आझाद म्हणाले, निवडणुका पाच राज्यांत झाल्या. मात्र चर्चा उत्तर प्रदेशबाबत होते आहे याचे कारण काय हे समजावून घेतले पाहिजे. तिथे मतांची चोरी अत्यंत सफाईदारपणे करण्यात आली. दिग्विजयसिंग यांनी मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या ईव्हीएम यंत्रांची तपासणी करताना मतदान कोणालाही केले तर भाजपच्या उमेदवारालाच ते मिळेल अशी व्यवस्था केल्याचे आढळून आल्याचा उल्लेख केला. >मतपत्रिकाच हव्यातगुलाम नबी आझाद म्हणाले, वर्षअखेरीला गुजराथ आणि हिमाचल प्रदेशात विधानसभेची निवडणूक आहे. मध्यप्रदेशात काही पोटनिवडणुका आहेत. ईव्हीएम मशिन्स ऐवजी त्याठिकाणी मतपत्रिकांचा वापर झाला पाहिजे.