शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

ईव्हीएममध्ये छेडछाड करून निवडणूक जिंकली

By admin | Updated: April 6, 2017 04:29 IST

भाजपने ईव्हीएममध्ये गडबड करून जिंकल्याचा आरोप, राज्यसभेत बसप, सप, काँग्रेससह सर्व विरोधकांनी बुधवारी राज्यसभेत केला

सुरेश भटेवरा,नवी दिल्ली- उत्तरप्रदेशची निवडणूक भाजपने ईव्हीएममध्ये गडबड करून जिंकल्याचा आरोप, राज्यसभेत बसप, सप, काँग्रेससह सर्व विरोधकांनी बुधवारी राज्यसभेत केला. सरकारविरोधी घोषणा देत विरोधक आसनासमोर आल्याने उपसभापतींना कामकाज तहकूब करावे लागले. काँग्रेसचे दिग्विजयसिंग व प्रमोद तिवारी तसेच सपाचे रामगोपाल यादव व नरेश अग्रवाल यांनी ईव्हीएम मशिनच्या कथित छेडछाडीवर चर्चेसाठी नोटिसा दिल्या होत्या. उपसभापतींनी त्या फेटाळल्या, मात्र सदस्यांना थोडक्यात बोलण्याची अनुमती दिली. ईव्हीएममध्ये कोणताही बदल करता येत नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे त्यांनी दाद मागावी, असे नमूद करीत सत्ताधारी पक्षाने विरोधकांचे तमाम आरोप फेटाळले.मायावती म्हणाल्या की, सुरुवातीची १00 ते १५0 मते नोंदवल्यानंतर मतदाराने कोणालाही मत दिले तर ते भाजपलाच मिळेल, असे बदल ईव्हीएममध्ये करण्यात आले. हा आरोप ऐकताच सत्ताधारी सदस्य संतापून उठले. यावेळी मायावतींची काही विधाने कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश उपसभापतींनी दिले. संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले, विरोधकांना पराभव पचवता आलेला नाही. हताशेपोटी ते वाटेल ते आरोप करीत आहेत. याच यंत्रांद्वारे २00४ व २00९ साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या. अलीकडेच बिहार, दिल्ली, पंजाब मणिपूर, गोवा आदी राज्यातही निवडणुका झाल्या, प्रत्येक ठिकाणी ईव्हीएमच वापरण्यात आली. गुलाम नबी आझाद म्हणाले, निवडणुका पाच राज्यांत झाल्या. मात्र चर्चा उत्तर प्रदेशबाबत होते आहे याचे कारण काय हे समजावून घेतले पाहिजे. तिथे मतांची चोरी अत्यंत सफाईदारपणे करण्यात आली. दिग्विजयसिंग यांनी मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या ईव्हीएम यंत्रांची तपासणी करताना मतदान कोणालाही केले तर भाजपच्या उमेदवारालाच ते मिळेल अशी व्यवस्था केल्याचे आढळून आल्याचा उल्लेख केला. >मतपत्रिकाच हव्यातगुलाम नबी आझाद म्हणाले, वर्षअखेरीला गुजराथ आणि हिमाचल प्रदेशात विधानसभेची निवडणूक आहे. मध्यप्रदेशात काही पोटनिवडणुका आहेत. ईव्हीएम मशिन्स ऐवजी त्याठिकाणी मतपत्रिकांचा वापर झाला पाहिजे.