शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

पुराच्या तडाख्यात दरवर्षी २१३० लोकांचा मृत्यूृ

By admin | Updated: September 6, 2016 04:14 IST

बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानसह देशभरात गेल्या ६२ वर्षांत पुराच्या तडाख्यात दरवर्षी सरासरी २१३० लोकांचा मृत्यू झाला

नवी दिल्ली : बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानसह देशभरात गेल्या ६२ वर्षांत पुराच्या तडाख्यात दरवर्षी सरासरी २१३० लोकांचा मृत्यू झाला, तसेच १.२ लाख पशुधनाचे आणि सरासरी ८२.०८ लाख हेक्टरमधील पिकाचे नुकसान झाले.माहिती अधिकारातहत जलसंसाधन, नदी विकास मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार १९५३ ते २०१२ या दरम्यान विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत सरासरी १,४९९ कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले, तसेच १४ लाख घरांची पडझड झाली. पुरामुळे सरासरी ४६.४६ लाख हेक्टर शेतीतील पिके हातची गेली. त्यामुळे सरासरी ७३९ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला. या सहा दशकांत सार्वजनिक सेवांचेही २५८६ कोटी रुपयांचे नुकसान झाले.१९५३ ते २०१२ दरम्यान महाराष्ट्रात पुराच्या तडाख्यात सरासरी ८९ लोकांचा मृत्यू झाला, तर ५७ लाख हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याने ६ कोटी रुपयांचे नुकसान झाले.यावर्षी बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानसह काही राज्यांतील पूरस्थिती गंभीर आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या २५ आॅगस्टच्या आकडेवारीनुसार ६ कोटी ६३ लाख लोकांना पुराचा तडाखा बसला. या राज्यातील एकूण १२६ जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून, पुरात ६०० लोकांचा बळी गेला, तसेच ४२ लाख हेक्टवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले.यावर्षी उत्तर प्रदेशातील २९ जिल्हे पूरग्रस्त असून, ५२ लोक मृत्युमुखी पडले आहेत, तसेच एक हजार कोटींचे नुकसान झाले आहे. बिहारमधील २४ पूरग्रस्त जिल्ह्यात १२७ जणांचा बळी गेला आहे. मध्यप्रदेशातील २६ पूरग्रस्त जिल्ह्यांत शंभराहून अधिक लोक ठार झाले असून, ४० हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)