शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या तडाख्यात दरवर्षी २१३० लोकांचा मृत्यूृ

By admin | Updated: September 6, 2016 04:14 IST

बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानसह देशभरात गेल्या ६२ वर्षांत पुराच्या तडाख्यात दरवर्षी सरासरी २१३० लोकांचा मृत्यू झाला

नवी दिल्ली : बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानसह देशभरात गेल्या ६२ वर्षांत पुराच्या तडाख्यात दरवर्षी सरासरी २१३० लोकांचा मृत्यू झाला, तसेच १.२ लाख पशुधनाचे आणि सरासरी ८२.०८ लाख हेक्टरमधील पिकाचे नुकसान झाले.माहिती अधिकारातहत जलसंसाधन, नदी विकास मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार १९५३ ते २०१२ या दरम्यान विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत सरासरी १,४९९ कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले, तसेच १४ लाख घरांची पडझड झाली. पुरामुळे सरासरी ४६.४६ लाख हेक्टर शेतीतील पिके हातची गेली. त्यामुळे सरासरी ७३९ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला. या सहा दशकांत सार्वजनिक सेवांचेही २५८६ कोटी रुपयांचे नुकसान झाले.१९५३ ते २०१२ दरम्यान महाराष्ट्रात पुराच्या तडाख्यात सरासरी ८९ लोकांचा मृत्यू झाला, तर ५७ लाख हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याने ६ कोटी रुपयांचे नुकसान झाले.यावर्षी बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानसह काही राज्यांतील पूरस्थिती गंभीर आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या २५ आॅगस्टच्या आकडेवारीनुसार ६ कोटी ६३ लाख लोकांना पुराचा तडाखा बसला. या राज्यातील एकूण १२६ जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून, पुरात ६०० लोकांचा बळी गेला, तसेच ४२ लाख हेक्टवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले.यावर्षी उत्तर प्रदेशातील २९ जिल्हे पूरग्रस्त असून, ५२ लोक मृत्युमुखी पडले आहेत, तसेच एक हजार कोटींचे नुकसान झाले आहे. बिहारमधील २४ पूरग्रस्त जिल्ह्यात १२७ जणांचा बळी गेला आहे. मध्यप्रदेशातील २६ पूरग्रस्त जिल्ह्यांत शंभराहून अधिक लोक ठार झाले असून, ४० हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)