शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

जगातील प्रत्येक तिसरी बालवधू भारतातील

By admin | Updated: July 22, 2014 11:11 IST

येत्या काही काळात महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणा-या भारतात बालविवाहाचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २२ - येत्या काही काळात जगातील महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणा-या भारतात बालविवाहाचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार जगातील प्रत्येक तिसरी बालवधू ही भारतातील असते. 'एंडिग चाईल्ड मॅरेज - प्रोग्रेस अँड प्रॉस्पेक्ट' या अहवालानुसार दक्षिण आशिया, उप सहारा आफ्रिका आणि भारत हे बालविवाहाच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत. जगभरातील बालवधूंपैकी सुमारे ४२ टक्के बालवधू दक्षिण आशियातील असून जगभरातील एक तृतियांश बालवधू भारतातील आहेत. 
जगभरातील ७० कोटींहून अधिक महिलांचा १८ व्या वर्षाआधीच विवाह झाल्याचे या अहवालत म्हटले आहे. तर २५ कोटींहून अधिक महिलांचा विवाह वयाची १५ वर्षे पूर्ण करण्याआधीच पार पडला आहे. 
जगातील ज्या देशांमध्ये बालविवाह होतो त्यातील पहिल्या दहांत नायजेरिया, बांग्लादेश, चाड, माली, मध्य आफ्रिकी गणराज्ये, भारत, गिनी, इथोपिया, बुरकिना फासो आणि नेपाळ यांचा समावेश होतो. भारतात २० ते ४९ वर्षांदरम्यानच्या २७ टक्के स्त्रियांचा विवाह १५ वर्षांच्या आधीच झाल्याचेही या अहवालात म्हटले आह.