शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अखेर रवींद्र गायकवाडांनी एअर इंडियाच्या विमानाने केला प्रवास

By admin | Updated: April 21, 2017 09:43 IST

शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी अखेर गुरुवारी एअर इंडियाच्या विमानातून प्रवास केला.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 21 - शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी अखेर गुरुवारी एअर इंडियाच्या विमानातून प्रवास केला. हवाई प्रवासावरील बंदी हटवल्यानंतर त्यांनी प्रथमच हैदराबाद ते दिल्ली असा बिझनेस क्लासमधून प्रवास केला. बिझनेस क्लासचे तिकीट असतानाही इकॉनॉमी क्लासमध्ये बसवले म्हणून मागच्या महिन्यात 23 मार्चला त्यांनी एअर इंडियाच्या व्यवस्थापकाला चपलेने मारहाण केली होती. 
 
त्यांच्या या कृत्यानंतर  एअर इंडियासह अन्य भारतीय विमान कंपन्यांनी त्यांच्यावर बंदी घातली होती. त्यांचा नो फ्लाय लिस्टमध्ये समावेश केला होता. आपल्या वर्तनाबद्दल गायकवाड यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांच्याकडे खेद व्यक्त केल्यानंतर त्यांच्या हवाई प्रवासावरील बंदी हटवण्यात आली. पण त्यानंतर गायकवाड यांनी विमानाऐवजी रेल्वेने प्रवास केला होता. 
 
गुरुवारी त्यांनी प्रथमच हैदराबाद ते दिल्ली असा विमान प्रवास केला. शिवसेनेच्या खासदारांनीही लोकसभेत रवींद्र गायकवाड यांच्या बंदीवरुन जोरदार राडा केला होता. बंदी हटवली नाही तर, रालोअच्या बैठकीत सहभागी होणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला होता. या सर्व घडामोडींनंतर गायकवाड यांच्यावरील बंदी मागे घेण्यात आली. 
 
दरम्यान गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानात प्रवेश मिळाला असला तरी, एअर इंडियाने दिल्ली पोलिसांना पत्र लिहून गायकवाडांवर कारवाईला विलंब का होत आहे अशी विचारणा केली आहे. एअर इंडियाच्या व्यवस्थापकाला मारहाण केल्या प्रकरणी दिल्लीत गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेला महिना झाल्यानंतरही तुम्ही कोणतीही कारवाई करत नसल्याने कर्मचा-यांच्या मनोधौर्यावर परिणाम होत असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. 
 
काय आहे प्रकरण
खासदार रवींद्र गायकवाड संसदेच्या अधिवेशनासाठी एअर इंडियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला निघाले होते. त्यांच्याकडे बिझनेस क्लासचे ओपन तिकीट होते. पण आपणास इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आल्याची त्यांची तक्रार होती. मात्र या विमानात बिझनेस क्लास नाही आणि केवळ इकॉनॉमी क्लासच आहे, याची कल्पना खा. गायकवाड यांच्या स्वीय सचिवाला देण्यात आली होती, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी नमूद केले.
 
विमानात आल्यानंतर आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली. विमान दिल्लीला उतरल्यानंतर सर्व प्रवासी विमानातून खाली उतरले. मात्र खा. गायकवाड विमानातून खाली उतरण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. त्यावेळी खा. गायकवाड यांनी ६0 वर्षीय आर. सुकुमार या ड्युटी मॅनेजरला शिवीगाळ करीत चपलेने मारले.