शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
4
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
5
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
6
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
7
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
8
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
9
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
10
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
11
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
12
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
13
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
14
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
15
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
16
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
17
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
18
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
19
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
20
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कार्यक्रमाचा आयोजक कन्हय्याच- हायकोर्टात दावा

By admin | Updated: February 25, 2016 03:00 IST

देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हय्या कुमार हा विद्यापीठातील देशविरोधी घोषणा देणाऱ्या कार्यक्रमात केवळ सहभागीच झाला नाही

नवी दिल्ली : देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हय्या कुमार हा विद्यापीठातील देशविरोधी घोषणा देणाऱ्या कार्यक्रमात केवळ सहभागीच झाला नाही, तर त्यानेच प्रत्यक्षात हा कार्यक्रम आयोजित केला होता, असा दावा दिल्ली पोलिसांनी बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात केला. मंगळवारी रात्री ताब्यात घेतलेल्या उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पाच तासांच्या चौकशीनंतर अटक केली.दिल्ली पोलिसांनी न्या. प्रतिभा राणी यांच्या समक्ष सादर केलेल्या १३ पानी स्थिती अहवालात ९ फेब्रुवारी रोजीच्या घडामोडींची माहिती दिली. कन्हय्या आणि अन्य आरोपींसह चेहरे झाकून घेतलेले काही विदेशी लोकही या कार्यक्रमाला उपस्थित होते, असा दावाही पोलिसांनी केला. न्यायालयाने अहवाल विचारात घेत कन्हय्याच्या जामिनावर २९ फेब्रुवारी रोजी सुनावणी निश्चित केली आहे.भाजप आमदारावर गुन्हा जेएनयूसंबंधी भूमिकेबाबत राहुल गांधी यांना देशद्रोही म्हणणारे राजस्थानचे आमदार कैलाश चौधरी आणि अन्य चौघांविरुद्ध मंगळवारी अमेठी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जेएनयूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी...पोलिसांनी जेएनयूच्या अधिकाऱ्यांनी पुरविलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी चालविली आहे. देशात देशविरोधी मोहीम चालविण्याशी संबंध असलेल्या व्यक्तीने विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला होता काय, याचा पोलिसांनी तपास चालविला आहे. चेहरे झाकलेले लोक कोण आहेत, याचा उलगडा व्हायचा आहे.खालिद कुठे दडला होता? पोलिसांनी पाच तासांच्या चौकशीत खालीद आणि अनिर्बन कुठे दडून होते याची चौकशी केली. या दोघांचा देशद्रोहाच्या प्रकरणाशी संबंध आहे काय, याचा तपास केला जात आहे. पोलिसांना आता रामा नागा, आशुतोष कुमार आणि अनंत प्रकाश या तीन विद्यार्थ्यांच्या शरणागतीची प्रतीक्षा आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात सरकार व भाजपविरोधी कार्यक्रम नकोतअलिगढ : विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांना कोणताही सरकारविरोधी, भाजपविरोधी आणि राष्ट्रविरोधी कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देऊ नका, असे इशारेवजा पत्र भारतीय जनता पक्षाचे खासदार सतीश गौतम यांनी अलिगढ विद्यापीठाचे कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जमीरउद्दीन काझी यांना पाठवले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादग्रस्त कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्र लिहिले आहे.