शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कार्यक्रमाचा आयोजक कन्हय्याच- हायकोर्टात दावा

By admin | Updated: February 25, 2016 03:00 IST

देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हय्या कुमार हा विद्यापीठातील देशविरोधी घोषणा देणाऱ्या कार्यक्रमात केवळ सहभागीच झाला नाही

नवी दिल्ली : देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हय्या कुमार हा विद्यापीठातील देशविरोधी घोषणा देणाऱ्या कार्यक्रमात केवळ सहभागीच झाला नाही, तर त्यानेच प्रत्यक्षात हा कार्यक्रम आयोजित केला होता, असा दावा दिल्ली पोलिसांनी बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात केला. मंगळवारी रात्री ताब्यात घेतलेल्या उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पाच तासांच्या चौकशीनंतर अटक केली.दिल्ली पोलिसांनी न्या. प्रतिभा राणी यांच्या समक्ष सादर केलेल्या १३ पानी स्थिती अहवालात ९ फेब्रुवारी रोजीच्या घडामोडींची माहिती दिली. कन्हय्या आणि अन्य आरोपींसह चेहरे झाकून घेतलेले काही विदेशी लोकही या कार्यक्रमाला उपस्थित होते, असा दावाही पोलिसांनी केला. न्यायालयाने अहवाल विचारात घेत कन्हय्याच्या जामिनावर २९ फेब्रुवारी रोजी सुनावणी निश्चित केली आहे.भाजप आमदारावर गुन्हा जेएनयूसंबंधी भूमिकेबाबत राहुल गांधी यांना देशद्रोही म्हणणारे राजस्थानचे आमदार कैलाश चौधरी आणि अन्य चौघांविरुद्ध मंगळवारी अमेठी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जेएनयूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी...पोलिसांनी जेएनयूच्या अधिकाऱ्यांनी पुरविलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी चालविली आहे. देशात देशविरोधी मोहीम चालविण्याशी संबंध असलेल्या व्यक्तीने विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला होता काय, याचा पोलिसांनी तपास चालविला आहे. चेहरे झाकलेले लोक कोण आहेत, याचा उलगडा व्हायचा आहे.खालिद कुठे दडला होता? पोलिसांनी पाच तासांच्या चौकशीत खालीद आणि अनिर्बन कुठे दडून होते याची चौकशी केली. या दोघांचा देशद्रोहाच्या प्रकरणाशी संबंध आहे काय, याचा तपास केला जात आहे. पोलिसांना आता रामा नागा, आशुतोष कुमार आणि अनंत प्रकाश या तीन विद्यार्थ्यांच्या शरणागतीची प्रतीक्षा आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात सरकार व भाजपविरोधी कार्यक्रम नकोतअलिगढ : विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांना कोणताही सरकारविरोधी, भाजपविरोधी आणि राष्ट्रविरोधी कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देऊ नका, असे इशारेवजा पत्र भारतीय जनता पक्षाचे खासदार सतीश गौतम यांनी अलिगढ विद्यापीठाचे कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जमीरउद्दीन काझी यांना पाठवले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादग्रस्त कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्र लिहिले आहे.