शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

आजही लोक मला कपबशीवाले गुरुजी म्हणूनच ओळखतात

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

नागपूर : काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि सर्वात शेवटी उमेदवारी अर्ज भरला. अर्जामध्ये जे निवडणूक चिन्ह टाकले होते ते चिन्ह सर्व उमेदवारांना वाटप झाले होते. शेवटी आयोगाने मला बोलावून कपबशी, इंजिन हे दोन चिन्ह आहेत, यापैकी कुठलेही एक निवडा, असे सांगितले. सुरुवातीला इंजिन निवडले. परंतु काही वेळाने विचार करून कपबशीला फायनल केले. कपबशी हे चिन्ह निवडणारा मी सर्वात पहिला उमेदवार होतो. कपबशीवर मी भरघोस मताने निवडून आल्यानंतर हे चिन्ह पुढे निवडणुकीत चांगलेच फेमस झाले. मी नंतर अनेक निवडणुका लढविल्या. परंतु आजही लोक मला कपबशीवाले गुरुजी म्हणूनच ओळखतात, असे माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर गुरुजी यांनी सांगितले.

नागपूर : काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि सर्वात शेवटी उमेदवारी अर्ज भरला. अर्जामध्ये जे निवडणूक चिन्ह टाकले होते ते चिन्ह सर्व उमेदवारांना वाटप झाले होते. शेवटी आयोगाने मला बोलावून कपबशी, इंजिन हे दोन चिन्ह आहेत, यापैकी कुठलेही एक निवडा, असे सांगितले. सुरुवातीला इंजिन निवडले. परंतु काही वेळाने विचार करून कपबशीला फायनल केले. कपबशी हे चिन्ह निवडणारा मी सर्वात पहिला उमेदवार होतो. कपबशीवर मी भरघोस मताने निवडून आल्यानंतर हे चिन्ह पुढे निवडणुकीत चांगलेच फेमस झाले. मी नंतर अनेक निवडणुका लढविल्या. परंतु आजही लोक मला कपबशीवाले गुरुजी म्हणूनच ओळखतात, असे माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर गुरुजी यांनी सांगितले.
प्रचाराच्या दृष्टिकोनातून कपबशी हे चिन्ह निवडले होते. त्यावेळी खिशात पैसा नव्हता. प्रचारात भिंती रंगविल्या जात होत्या. भिंतीवर कपबशी रंगविणे खूप सोपे होते. कपबशी चिन्ह मिळाल्यामुळे मित्र हसलेही, पण हीच कपबशी वेगाने घराघरात पोहोचली. लोकांनी त्यावेळी भरभरून प्रेम दिले. शहरात दुसऱ्या क्रमांकाच्या लीडने निवडून आलो. मतमोजणी केंद्रावर विजयाची घोषणा झाली. प्रमाणपत्र घेऊन बाहेर पडल्यावर खिशात एकही रुपया नव्हता. एका मित्राने लाडू भरविला व दोन हजार रुपये खिशात टाकले. मिरवणूक रॅली काढण्यासाठी एक जीप मोफत दिली. प्रचार रॅली अर्ध्यावर असताना जीपही बंद पडली. कार्यकर्त्यांनी किमान १० किलो जीप ढकलत नेली. याच मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी संदल लावला होता. मिरवणूक आटोपल्यानंतर सर्व आपापल्या घरी गेले. शेवटी संदलवाले जायचे थांबले होते. त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, पेमेंट व्हायचा आहे. खिशात मित्राने टाकलेले दोन हजार रुपये त्या संदलवाल्यांना दिले. तीनही निवडणुकीत मी भरघोस मतांनीच निवडून आलो. पुढे उपहापौर बनलो. त्यावेळी शहर विकासाच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक असे काम केले. शहरातील पाणीपुरवठ्याच्या सर्व टाक्या स्वच्छ केल्या. टँकरचालकांकडून होणारी पाण्याची चोरी थांबविली. २००५ नंतर टँकरचालक कधीही संपावर गेले नाही. उपमहापौरपदाच्या कारकीर्दीच्या शेवटच्या दिवशी कला, क्रीडा, साहित्य या मंडळीसोबत अख्खा दिवस घालविला. अनेक पत्रकारांचे मला सहकार्य मिळाले. लोकांनी पक्षाच्या नाही मालीकर गुरुजीच्या नावावर प्रेम दिले.