शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आजही लोक मला कपबशीवाले गुरुजी म्हणूनच ओळखतात

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

नागपूर : काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि सर्वात शेवटी उमेदवारी अर्ज भरला. अर्जामध्ये जे निवडणूक चिन्ह टाकले होते ते चिन्ह सर्व उमेदवारांना वाटप झाले होते. शेवटी आयोगाने मला बोलावून कपबशी, इंजिन हे दोन चिन्ह आहेत, यापैकी कुठलेही एक निवडा, असे सांगितले. सुरुवातीला इंजिन निवडले. परंतु काही वेळाने विचार करून कपबशीला फायनल केले. कपबशी हे चिन्ह निवडणारा मी सर्वात पहिला उमेदवार होतो. कपबशीवर मी भरघोस मताने निवडून आल्यानंतर हे चिन्ह पुढे निवडणुकीत चांगलेच फेमस झाले. मी नंतर अनेक निवडणुका लढविल्या. परंतु आजही लोक मला कपबशीवाले गुरुजी म्हणूनच ओळखतात, असे माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर गुरुजी यांनी सांगितले.

नागपूर : काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि सर्वात शेवटी उमेदवारी अर्ज भरला. अर्जामध्ये जे निवडणूक चिन्ह टाकले होते ते चिन्ह सर्व उमेदवारांना वाटप झाले होते. शेवटी आयोगाने मला बोलावून कपबशी, इंजिन हे दोन चिन्ह आहेत, यापैकी कुठलेही एक निवडा, असे सांगितले. सुरुवातीला इंजिन निवडले. परंतु काही वेळाने विचार करून कपबशीला फायनल केले. कपबशी हे चिन्ह निवडणारा मी सर्वात पहिला उमेदवार होतो. कपबशीवर मी भरघोस मताने निवडून आल्यानंतर हे चिन्ह पुढे निवडणुकीत चांगलेच फेमस झाले. मी नंतर अनेक निवडणुका लढविल्या. परंतु आजही लोक मला कपबशीवाले गुरुजी म्हणूनच ओळखतात, असे माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर गुरुजी यांनी सांगितले.
प्रचाराच्या दृष्टिकोनातून कपबशी हे चिन्ह निवडले होते. त्यावेळी खिशात पैसा नव्हता. प्रचारात भिंती रंगविल्या जात होत्या. भिंतीवर कपबशी रंगविणे खूप सोपे होते. कपबशी चिन्ह मिळाल्यामुळे मित्र हसलेही, पण हीच कपबशी वेगाने घराघरात पोहोचली. लोकांनी त्यावेळी भरभरून प्रेम दिले. शहरात दुसऱ्या क्रमांकाच्या लीडने निवडून आलो. मतमोजणी केंद्रावर विजयाची घोषणा झाली. प्रमाणपत्र घेऊन बाहेर पडल्यावर खिशात एकही रुपया नव्हता. एका मित्राने लाडू भरविला व दोन हजार रुपये खिशात टाकले. मिरवणूक रॅली काढण्यासाठी एक जीप मोफत दिली. प्रचार रॅली अर्ध्यावर असताना जीपही बंद पडली. कार्यकर्त्यांनी किमान १० किलो जीप ढकलत नेली. याच मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी संदल लावला होता. मिरवणूक आटोपल्यानंतर सर्व आपापल्या घरी गेले. शेवटी संदलवाले जायचे थांबले होते. त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, पेमेंट व्हायचा आहे. खिशात मित्राने टाकलेले दोन हजार रुपये त्या संदलवाल्यांना दिले. तीनही निवडणुकीत मी भरघोस मतांनीच निवडून आलो. पुढे उपहापौर बनलो. त्यावेळी शहर विकासाच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक असे काम केले. शहरातील पाणीपुरवठ्याच्या सर्व टाक्या स्वच्छ केल्या. टँकरचालकांकडून होणारी पाण्याची चोरी थांबविली. २००५ नंतर टँकरचालक कधीही संपावर गेले नाही. उपमहापौरपदाच्या कारकीर्दीच्या शेवटच्या दिवशी कला, क्रीडा, साहित्य या मंडळीसोबत अख्खा दिवस घालविला. अनेक पत्रकारांचे मला सहकार्य मिळाले. लोकांनी पक्षाच्या नाही मालीकर गुरुजीच्या नावावर प्रेम दिले.