शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

आजही लोक मला कपबशीवाले गुरुजी म्हणूनच ओळखतात

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

नागपूर : काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि सर्वात शेवटी उमेदवारी अर्ज भरला. अर्जामध्ये जे निवडणूक चिन्ह टाकले होते ते चिन्ह सर्व उमेदवारांना वाटप झाले होते. शेवटी आयोगाने मला बोलावून कपबशी, इंजिन हे दोन चिन्ह आहेत, यापैकी कुठलेही एक निवडा, असे सांगितले. सुरुवातीला इंजिन निवडले. परंतु काही वेळाने विचार करून कपबशीला फायनल केले. कपबशी हे चिन्ह निवडणारा मी सर्वात पहिला उमेदवार होतो. कपबशीवर मी भरघोस मताने निवडून आल्यानंतर हे चिन्ह पुढे निवडणुकीत चांगलेच फेमस झाले. मी नंतर अनेक निवडणुका लढविल्या. परंतु आजही लोक मला कपबशीवाले गुरुजी म्हणूनच ओळखतात, असे माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर गुरुजी यांनी सांगितले.

नागपूर : काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि सर्वात शेवटी उमेदवारी अर्ज भरला. अर्जामध्ये जे निवडणूक चिन्ह टाकले होते ते चिन्ह सर्व उमेदवारांना वाटप झाले होते. शेवटी आयोगाने मला बोलावून कपबशी, इंजिन हे दोन चिन्ह आहेत, यापैकी कुठलेही एक निवडा, असे सांगितले. सुरुवातीला इंजिन निवडले. परंतु काही वेळाने विचार करून कपबशीला फायनल केले. कपबशी हे चिन्ह निवडणारा मी सर्वात पहिला उमेदवार होतो. कपबशीवर मी भरघोस मताने निवडून आल्यानंतर हे चिन्ह पुढे निवडणुकीत चांगलेच फेमस झाले. मी नंतर अनेक निवडणुका लढविल्या. परंतु आजही लोक मला कपबशीवाले गुरुजी म्हणूनच ओळखतात, असे माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर गुरुजी यांनी सांगितले.
प्रचाराच्या दृष्टिकोनातून कपबशी हे चिन्ह निवडले होते. त्यावेळी खिशात पैसा नव्हता. प्रचारात भिंती रंगविल्या जात होत्या. भिंतीवर कपबशी रंगविणे खूप सोपे होते. कपबशी चिन्ह मिळाल्यामुळे मित्र हसलेही, पण हीच कपबशी वेगाने घराघरात पोहोचली. लोकांनी त्यावेळी भरभरून प्रेम दिले. शहरात दुसऱ्या क्रमांकाच्या लीडने निवडून आलो. मतमोजणी केंद्रावर विजयाची घोषणा झाली. प्रमाणपत्र घेऊन बाहेर पडल्यावर खिशात एकही रुपया नव्हता. एका मित्राने लाडू भरविला व दोन हजार रुपये खिशात टाकले. मिरवणूक रॅली काढण्यासाठी एक जीप मोफत दिली. प्रचार रॅली अर्ध्यावर असताना जीपही बंद पडली. कार्यकर्त्यांनी किमान १० किलो जीप ढकलत नेली. याच मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी संदल लावला होता. मिरवणूक आटोपल्यानंतर सर्व आपापल्या घरी गेले. शेवटी संदलवाले जायचे थांबले होते. त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, पेमेंट व्हायचा आहे. खिशात मित्राने टाकलेले दोन हजार रुपये त्या संदलवाल्यांना दिले. तीनही निवडणुकीत मी भरघोस मतांनीच निवडून आलो. पुढे उपहापौर बनलो. त्यावेळी शहर विकासाच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक असे काम केले. शहरातील पाणीपुरवठ्याच्या सर्व टाक्या स्वच्छ केल्या. टँकरचालकांकडून होणारी पाण्याची चोरी थांबविली. २००५ नंतर टँकरचालक कधीही संपावर गेले नाही. उपमहापौरपदाच्या कारकीर्दीच्या शेवटच्या दिवशी कला, क्रीडा, साहित्य या मंडळीसोबत अख्खा दिवस घालविला. अनेक पत्रकारांचे मला सहकार्य मिळाले. लोकांनी पक्षाच्या नाही मालीकर गुरुजीच्या नावावर प्रेम दिले.