शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

आजच्या काळातही गांधीजींचे विचारच प्रासंगिक

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

आजच्या काळातही गांधीजींचे विचारच प्रासंगिक

आजच्या काळातही गांधीजींचे विचारच प्रासंगिक

जागतिक अहिंसा दिवस आयोजन समिती : महात्मा गांधीजींचा आदरांजली

नागपूर :
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ६८ व्या पुण्यतिथीनिमित्त जागतिक अहिंसा दिवस आयोजन समिती आणि नगर काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी नागपुरात अहिंसा दिन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली.
सीताबर्डी येथील व्हेरायटी चौकातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, आजच्या काळातच नव्हे तर भविष्यातही केवळ आणि केवळ गांधीजींचे विचारच प्रासंगिक राहतील. जगात आजवर यशस्वी झालेली आंदोलने ही केवळ गांधीजींच्या मार्गानेच यशस्वी झाल्याचे प्रतिपादित करतांना दहशतवादामुळे कुठलेही आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही, या शब्दांमध्ये मुत्तेमवारांनी आपली शब्दपुष्पांजली अर्पण केली. माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व डॉ. सतीश चतुर्वेदी यांनीही आपले विचार व्यक्त केले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, माजी आमदार अशोक धवड, अविनाश वारजूरकर, यादवराव देवगडे, प्रफुल्ल गुडधे पाटील, अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, शहर महिला काँगेसच्या अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक व्यासपीठावर होते.
कार्यक्रमाची सुरुवात सचिन आणि सुरभी ढोमणे द्वारा संचालित सुरसंगम संस्थेने सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी झाली. या गीतांच्या सादरीकरणाचे संचालन किशोर गलांडे यांनी केले तर सोहळ्याचे संचालन डॉ. गजराज हटेवार यांनी केले.
कार्यक्रमाला माजी मंत्री मधुकरराव किंमतकर, स्वातंत्र्य सेनानी पुंडलिकराव जौंजाळ, अ.भा. सेवादल संघटक कृष्णकुमार पांडे, राजू व्यास, तानाजी वनवे, डॉ. राजू देवघरे, बंडोपंत टेंभुर्णे, प्रा. अनिल शर्मा, विनोद सोनकर, शहर सेवादल संघटक रामगोविंद खोब्रागडे, डॉ. सूर्यकांत भगत, नगरसेवक प्रशांत धवड, देवा उसरे, अरुण डवरे, योगेश तिवारी, अमान उल्लाह खान, दीपक कापसे, प्रसन्ना बोरकर,नगरसेविका हर्षला साबळे, शीला मोहोड आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बॉक्स..
गोडसेचा निषेध करणाऱ्या पत्रकांचे वाटप

कार्यक्रमादरम्यान बहुजन संघर्ष समितीचे नागेश चौधरी, बबन नाखले, प्रा. अरविंद देशमुख, प्रमोद मून, गिरीश वडदकर, जगन वंजारी यांनी महात्माजींचा खून करणाऱ्या नाथुराम गोडसेचा निषेध करणारी पत्रके वाटलीत.