शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

चीनला न जुमानता सैन्याचे सीमेवर तंबू सैनिकांना रसदपुरवठा करण्याचीही तयारी

By admin | Updated: July 10, 2017 05:55 IST

चीनच्या धमक्यांना न जुमानता सिक्कीम सीमेवरील डोकलाम भागात दीर्घकाळ घट्ट पाय रोवून राहण्याची तयारी भारताने केली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चीनच्या धमक्यांना न जुमानता सिक्कीम सीमेवरील डोकलाम भागात दीर्घकाळ घट्ट पाय रोवून राहण्याची तयारी भारताने केली असून, सैन्याने सीमेवर तंबू ठोकले आहेत. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी जोपर्यंत आपल्या सैनिकांना परत बोलवत नाही तोपर्यंत येथून हटणार नसल्याचे संकेतच भारताने यानिमित्ताने दिले आहेत. भारतीय सैन्याने ही भूमिका घेतली असताना चीननेही तडजोड करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सिमेवरील तणाव वाढला आहे. भारत, चीन आणि भूतानच्या सीमा एकत्र येतात त्या डोकलाम भागावरून हा वाद सुरू आहे. या ठिकाणाहून भारताने सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी चीन करीत आहे. त्यामुळे सिक्कीम सेक्टरमध्ये १० हजार फूट उंचीवरील या भागात तणाव वाढत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सैनिकांना रसदपुरवठा करण्याचीही सोय करण्यात आली आहे. भारतीय सैन्य चीनच्या कोणत्याही प्रकारच्या दबावात नसल्याचे हे संकेत आहेत. या वादावर राजनयिक तोडगा काढण्याचा आत्मविश्वासही व्यक्त केला जात आहे. >इशारे आणि धमक्या भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढत असताना संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, भारताची परिस्थिती आता १९६२ पेक्षा वेगळी आहे. त्यावर चीननेही प्रतिक्रिया देत स्पष्ट केले होते की, चीनही पूर्वीसारखा राहिलेला नाही, याची भारताने दखल घ्यावी. डोकलाम भागात चीनने रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर या भागात तणाव वाढला आहे. या भागाला भारतात डोका ला नावाने संबोधले जाते. चीन याला आपला डोंगलांग भाग असल्याचे सांगत आहे. ३,४८८ कि.मी.च्या भारत-चीन सीमेपैकी २२० कि.मी.चा भाग सिक्कीमला लागून आहे. काय आहे वाद? : डोकलाममध्ये चीन रस्त्याचे काम करत आहे. याच भागात भारत, चीन आणि भूतानच्या सिमा आहेत. भूतान व चीन या भागावर दावा करत आहेत. या वादात भारत भूतानच्या बाजूने आहे. त्यामुळे चीनचा संताप झाला आहे. यंत्रणा आतापर्यंत निष्फळ : चीन आक्रमकपणे सांगत आहे की, आपण कोणत्याही तडजोडीसाठी तयार नाहीत आणि चेंडू भारताच्या कोर्टात आहे. येथील सुरक्षाव्यवस्थेचे असे मत आहे की, तणाव कमी करण्यासाठी एकतर्फी दृष्टिकोन असून चालत नाही. सीमा वाद सोडविण्यासाठी २०१२ मध्ये दोन्ही देशांनी एका यंत्रणेवर सहमती दर्शविली होती; परंतु ही यंत्रणा आतापर्यंत निष्फळ ठरलेली आहे. तीन आठवड्यांपासून येथे तणाव आहे.