शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चीनला न जुमानता सैन्याचे सीमेवर तंबू सैनिकांना रसदपुरवठा करण्याचीही तयारी

By admin | Updated: July 10, 2017 05:55 IST

चीनच्या धमक्यांना न जुमानता सिक्कीम सीमेवरील डोकलाम भागात दीर्घकाळ घट्ट पाय रोवून राहण्याची तयारी भारताने केली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चीनच्या धमक्यांना न जुमानता सिक्कीम सीमेवरील डोकलाम भागात दीर्घकाळ घट्ट पाय रोवून राहण्याची तयारी भारताने केली असून, सैन्याने सीमेवर तंबू ठोकले आहेत. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी जोपर्यंत आपल्या सैनिकांना परत बोलवत नाही तोपर्यंत येथून हटणार नसल्याचे संकेतच भारताने यानिमित्ताने दिले आहेत. भारतीय सैन्याने ही भूमिका घेतली असताना चीननेही तडजोड करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सिमेवरील तणाव वाढला आहे. भारत, चीन आणि भूतानच्या सीमा एकत्र येतात त्या डोकलाम भागावरून हा वाद सुरू आहे. या ठिकाणाहून भारताने सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी चीन करीत आहे. त्यामुळे सिक्कीम सेक्टरमध्ये १० हजार फूट उंचीवरील या भागात तणाव वाढत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सैनिकांना रसदपुरवठा करण्याचीही सोय करण्यात आली आहे. भारतीय सैन्य चीनच्या कोणत्याही प्रकारच्या दबावात नसल्याचे हे संकेत आहेत. या वादावर राजनयिक तोडगा काढण्याचा आत्मविश्वासही व्यक्त केला जात आहे. >इशारे आणि धमक्या भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढत असताना संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, भारताची परिस्थिती आता १९६२ पेक्षा वेगळी आहे. त्यावर चीननेही प्रतिक्रिया देत स्पष्ट केले होते की, चीनही पूर्वीसारखा राहिलेला नाही, याची भारताने दखल घ्यावी. डोकलाम भागात चीनने रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर या भागात तणाव वाढला आहे. या भागाला भारतात डोका ला नावाने संबोधले जाते. चीन याला आपला डोंगलांग भाग असल्याचे सांगत आहे. ३,४८८ कि.मी.च्या भारत-चीन सीमेपैकी २२० कि.मी.चा भाग सिक्कीमला लागून आहे. काय आहे वाद? : डोकलाममध्ये चीन रस्त्याचे काम करत आहे. याच भागात भारत, चीन आणि भूतानच्या सिमा आहेत. भूतान व चीन या भागावर दावा करत आहेत. या वादात भारत भूतानच्या बाजूने आहे. त्यामुळे चीनचा संताप झाला आहे. यंत्रणा आतापर्यंत निष्फळ : चीन आक्रमकपणे सांगत आहे की, आपण कोणत्याही तडजोडीसाठी तयार नाहीत आणि चेंडू भारताच्या कोर्टात आहे. येथील सुरक्षाव्यवस्थेचे असे मत आहे की, तणाव कमी करण्यासाठी एकतर्फी दृष्टिकोन असून चालत नाही. सीमा वाद सोडविण्यासाठी २०१२ मध्ये दोन्ही देशांनी एका यंत्रणेवर सहमती दर्शविली होती; परंतु ही यंत्रणा आतापर्यंत निष्फळ ठरलेली आहे. तीन आठवड्यांपासून येथे तणाव आहे.