शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शंभरावर भाविकांनी प्राण गमावूनही केरळमधील मंदिरात फटाक्यांवर बंदी नाहीच

By admin | Updated: April 11, 2016 16:26 IST

केरळच्या कोल्लम शहरालगत परवूरच्या पुत्तिंगल मंदिरात फटाक्यांमुळे आग लागून १००हून अधिक नागरिक ठार झाल्यानंतरही मंदिर प्रशासनाने फटाक्यांच्या आतीषबाजीवर बंदी घालण्यास नकार देण्यात आला

ऑनलाइन लोकमत
तिरूअनंतपुरम, दि. ११ - केरळच्या कोल्लम शहरालगत परवूरच्या प्रसिद्ध  पुत्तिंगल मंदिरात फटाक्यांमुळे आग लागून १००हून अधिक नागरिक ठार झाल्यानंतरही मंदिर प्रशासनाला अद्यापही जाग आली नसून मंदिरातील फटाक्यांच्या आतीषबाजीवर बंदी घालण्यास नकार देण्यात आला आहे. राज्यातील १,२५५ मंदिरांचा कारभार सांभाळणा-या त्रावणकोर देवास्वोम बोर्डाने हा निर्णय घेतला असून फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.  वार्षिक उत्सवांदरम्यान मंदिरात फटाक्यांची आतीषबाजी करणं हा परंपरेचा एक भाग असल्याने देवस्थान मंडळ फटक्यांवर बंदी घालण्याच्य निर्णयाच्या विरोधात असल्याचे त्रावणकोर देवास्वोम बोर्डाचे अध्यक्ष प्रयार गोपालकृष्णन यांनी सांगितले. मात्र असे असले तरी सरकार व न्यायालयाने दिलेले आदेश व पुरेशी सुरक्षा व्यवस्थेची उपाययोजना करूनच ही आतिषबाजी करण्यात यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या आतीषबाजीच्या बंदीच्या मुद्यावरून बोर्डाच्या सदस्यांमध्येही मतभेद असल्याचे दिसून आले. 'फटाक्यांच्या आतीषबाजीवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी' या निर्णयाचे आपण समर्थन करतो असे मत बोर्डाचे अधिकारी अजय थरायिल यांनी नोंदवले.
दरम्यान त्रावणकोर देवास्वोम बोर्डातर्फे सर्व मंदिरांना तातडीने एक पत्रक पाठवण्यात आले असून सर्व अटी व नियमांचे पालन करूनच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात यावी असे त्यात नमूद करण्यात आले आहे. 
रविवारी पहाटे कोल्लममधील पुत्तिंगल मंदिरात फटाक्यांमुळे लागलेल्या भीषण आगीत 108 भाविकांचा होरपळून मृत्यू झाला तर २००हून अधिक भाविक जखमी झाले. नवरात्रोस्तवामुळे मंदिरात भाविकांची अलोट गर्दी जमली होती, त्यावेळी ही आग दुर्घटना घडली आणि अनेक भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या अग्नीतांडवाप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आतीषबाजीला जिल्हा प्रशासनाने अधिकृतरीत्या परवानगी दिली नव्हती; मात्र वार्षिक उत्सवाच्या वेळी परंपरेनुसार आतीषबाजी केली गेली.
पहाटे ३.३० वाजतादरम्यान आतशबाजी बघण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराजवळील ‘कंबपुरा’ गोदामावर आगीची ठिणगी पडली आणि स्फोट होऊन एकाचवेळी भीषण कर्णभेदी आवाजांनी परिसर दणाणून गेला. स्फोट एवढा भीषण होता की, आवाज किमान १ किलोमीटरच्या परिसरात ऐकू आला. लगेच वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे परिसर अंधारात बुडाला असताना लोक जिवाच्या आकांताने पळू लागले. त्यातच चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाले.