शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शंभरावर भाविकांनी प्राण गमावूनही केरळमधील मंदिरात फटाक्यांवर बंदी नाहीच

By admin | Updated: April 11, 2016 16:26 IST

केरळच्या कोल्लम शहरालगत परवूरच्या पुत्तिंगल मंदिरात फटाक्यांमुळे आग लागून १००हून अधिक नागरिक ठार झाल्यानंतरही मंदिर प्रशासनाने फटाक्यांच्या आतीषबाजीवर बंदी घालण्यास नकार देण्यात आला

ऑनलाइन लोकमत
तिरूअनंतपुरम, दि. ११ - केरळच्या कोल्लम शहरालगत परवूरच्या प्रसिद्ध  पुत्तिंगल मंदिरात फटाक्यांमुळे आग लागून १००हून अधिक नागरिक ठार झाल्यानंतरही मंदिर प्रशासनाला अद्यापही जाग आली नसून मंदिरातील फटाक्यांच्या आतीषबाजीवर बंदी घालण्यास नकार देण्यात आला आहे. राज्यातील १,२५५ मंदिरांचा कारभार सांभाळणा-या त्रावणकोर देवास्वोम बोर्डाने हा निर्णय घेतला असून फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.  वार्षिक उत्सवांदरम्यान मंदिरात फटाक्यांची आतीषबाजी करणं हा परंपरेचा एक भाग असल्याने देवस्थान मंडळ फटक्यांवर बंदी घालण्याच्य निर्णयाच्या विरोधात असल्याचे त्रावणकोर देवास्वोम बोर्डाचे अध्यक्ष प्रयार गोपालकृष्णन यांनी सांगितले. मात्र असे असले तरी सरकार व न्यायालयाने दिलेले आदेश व पुरेशी सुरक्षा व्यवस्थेची उपाययोजना करूनच ही आतिषबाजी करण्यात यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या आतीषबाजीच्या बंदीच्या मुद्यावरून बोर्डाच्या सदस्यांमध्येही मतभेद असल्याचे दिसून आले. 'फटाक्यांच्या आतीषबाजीवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी' या निर्णयाचे आपण समर्थन करतो असे मत बोर्डाचे अधिकारी अजय थरायिल यांनी नोंदवले.
दरम्यान त्रावणकोर देवास्वोम बोर्डातर्फे सर्व मंदिरांना तातडीने एक पत्रक पाठवण्यात आले असून सर्व अटी व नियमांचे पालन करूनच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात यावी असे त्यात नमूद करण्यात आले आहे. 
रविवारी पहाटे कोल्लममधील पुत्तिंगल मंदिरात फटाक्यांमुळे लागलेल्या भीषण आगीत 108 भाविकांचा होरपळून मृत्यू झाला तर २००हून अधिक भाविक जखमी झाले. नवरात्रोस्तवामुळे मंदिरात भाविकांची अलोट गर्दी जमली होती, त्यावेळी ही आग दुर्घटना घडली आणि अनेक भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या अग्नीतांडवाप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आतीषबाजीला जिल्हा प्रशासनाने अधिकृतरीत्या परवानगी दिली नव्हती; मात्र वार्षिक उत्सवाच्या वेळी परंपरेनुसार आतीषबाजी केली गेली.
पहाटे ३.३० वाजतादरम्यान आतशबाजी बघण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराजवळील ‘कंबपुरा’ गोदामावर आगीची ठिणगी पडली आणि स्फोट होऊन एकाचवेळी भीषण कर्णभेदी आवाजांनी परिसर दणाणून गेला. स्फोट एवढा भीषण होता की, आवाज किमान १ किलोमीटरच्या परिसरात ऐकू आला. लगेच वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे परिसर अंधारात बुडाला असताना लोक जिवाच्या आकांताने पळू लागले. त्यातच चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाले.